शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

राणेंनी वडिलांना स्मगलर म्हटल ते विसरला का?, रूपेश राऊळांचा मंत्री दीपक केसरकर यांना सवाल

By अनंत खं.जाधव | Updated: February 8, 2024 17:40 IST

महासंस्कृती महोत्सव म्हणजे उधळपट्टी

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तुमच्या वडिलांवर “स्मगलर” म्हणून गंभीर आरोप केला तो  तुम्ही राजकारणासाठी  विसरू शकता  पण येथील जनता विसरलेली नाही. याचा हिशेब जनता चुकता करेलच पण राजकारणासाठी तुम्ही वडिलांवरील खालच्या पातळीवरील टीका विसरता आणि राणेंचे गोडवे गाता हे तुम्हाला कसे जमत अशी जोरदार टीका शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी मंत्री केसरकर यांच्यावर केली.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, अशोक परब, अशोक धुरी, सुनिल गावडे, बाळु माळकर आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी एक कोटी पक्षाला दिल्याचे सांगता मग शिवसेनेच्या कार्यक्रमांना पैसे का देत नव्हता असा सवाल ही त्यांनी केला.राऊळ म्हणाले, शिवसेनेने मंत्रीपदासाठी एक कोटी तुमच्याकडे मागितले. मग तुम्ही त्याचवेळी आमदारकीचा राजीनामा देवून बाहेर का पडला नाही? याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. नाहक खोटे बोलून त्यांनी जनतेची दिशाभूल करू नये, ते खोेटारडे आहेत. आपण हा प्रकल्प आणला तो प्रकल्प आणला असे सांगुन त्यांनी नेहमी जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांना आता जनता ओळखू लागली आहे. त्यांनी आणलेले प्रकल्प, कारखाने, पर्यटन प्रकल्प, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे नेमके काय झाले? याचे उत्तर आता त्यांना जनतेला द्यावेच लागेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.राऊळ पुढे म्हणाले, या ठिकाणी राजकीय फायद्यासाठी मंत्री केसरकर कुठल्याही थराला जावू शकतात. ज्या राणेंनी यांच्या वडिलांना स्मगलर म्हटले आणि अत्यंत खालच्या पातळीवर जावून टिका केली त्यांच्याच पाया पडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शिवसेनेत असताना राणेंना कंटाळून आपण या ठिकाणी आलो असे सांगणारे केसरकर आता मात्र त्यांचे गुणगान गात आहेत. मात्र त्यांनी कितीही रुपे बदलण्याचा प्रयत्न केला तरी या ठिकाणची जनता सर्व काही ओळखून आहे. आणि त्यांना ती कदापिही माफ करणार नाही. 

महासंस्कृती महोत्सव म्हणजे उधळपट्टी राऊळ यांनी सावंतवाडीत सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवावर टिका केली. तब्बल दोन कोटी रुपये खर्च करुन पैशाची उधळपट्टी या ठिकाणी केली जात आहे. त्यात शंभर सुध्दा प्रेक्षक उपस्थित नव्हते. मात्र शिवसेनेच्या संवाद सभेला मोठी गर्दी होत आहे. याचा अर्थ आता मंत्री केसरकरांचा जनाधार संपला आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर