शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

खेड्यांचा विकास, शेतकऱ्यांचे कल्याण हेच ध्येय

By admin | Updated: February 10, 2015 00:26 IST

प्रमोद जठार : मांगवली ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन

वैभववाडी : जनतेच्या उत्कर्षासाठी सरकार चालविताना ज्याच्या माध्यमातून सिंधुदुर्गचा विकास होईल ते सर्व करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे खेड्यांचा विकास आणि शेतकऱ्यांचे कल्याण हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार यांनी मांगवली येथे ग्रामसचिवालयाच्या भूमिपूजन समारंभात केले. हा समारंभ शनिवारी पार पडला. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ग्रामसचिवालयासाठी २५ लाख रुपये खासदार निधी दिला आहे. ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रमोद रावराणे, सरपंच राजेंद्र राणे, कोकण विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीधर राणे, उपसरपंच सखाराम राणे, ग्रामविकास मंडळाचे सुरेश राणे, दत्ता गुरव, भास्कर संसारे, महेश संसारे, ग्रामसेवक उमेश राठोड, दिगंबर भागवत, संतोष इस्वलकर, पोलीसपाटील तानाजी आयरे, सुरेश आयरे, प्रज्ञा लिंगायत, हर्षदा संसारे, शारदा कांबळे, सुवर्णा लोकम, आदी उपस्थित होते.जठार म्हणाले, कोट्यवधीच्या कर्जातून मार्ग काढत फडणवीस सरकारने काम करायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची मुले सुखी व्हावीत, त्यांना रोजगार मिळावा, उद्योग- व्यवसायाला बळ देण्याच्यादृष्टीने सरकारची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे मी आमदार नसलो तरी सरकार आपले आहे. त्यामुळे विकासाचा एकही प्रश्न आम्ही शिल्लक ठेवणार नाही. मंत्री प्रकाश जावडेकर यांनी २५ लाख रुपयांचा निधी एका प्रयत्नात मांगवलीला दिला, हे ग्रामस्थांचे भाग्य आहे. ग्रामसचिवालयाचे उद्घाटन जावडेकर यांच्याच हस्ते होईल, असे म्हणाले.अतुल काळसेकर म्हणाले, आधीचे सरकार फक्त निवेदने घेत होते. निर्णय घेण्याची धमक त्यांच्यात नव्हती. त्यामुळेच १५ वर्षांत जिल्ह्याच्या विकासाची प्रक्रियाच कोलमडून पडली. मात्र, महायुतीचे सरकार जनहिताचे धाडसी निर्णय घेऊन कल्पकता दाखवत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापालट करतानाच मंत्री जावडेकर यांचे मूळ गाव म्हणून विकासाची गंगा मांगवलीपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे म्हणाले.यावेळी दत्ता गुरव, श्रीधर राणे, महेश संसारे यांनी विचार मांडले. सरपंच राजेंद्र राणे यांनी प्रास्ताविकात ग्रामविकासाचा आढावा मांडला. शरद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद जावडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)तुम्ही मित्र व्हाकार्यक्रमाच्या सूत्रसंचालनावेळी शरद कांबळे यांनी प्रमोद रावराणेंचा उल्लेख ‘आमचे मित्र’ असा केला. तो संदर्भ देत रावराणे यांनी, कांबळे आमचे आता मित्र झालेत, पूर्वी नव्हते. परंतु, केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार आहे. त्यामुळे तुम्ही आमचे मित्र व्हा, अशी आॅफर महेश संसारे यांना दिली. यावेळी ग्रामस्थांनी टाळ्यांनी या आॅफरला दाद दिली.