शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

पर्यटन विकासासाठी नवनवीन संकल्पना राबवणार

By admin | Updated: May 6, 2015 00:18 IST

सुभाष देसाई : रत्नागिरी पर्यटन महोत्सवाची उत्साहात सांगता

रत्नागिरी : कोकण हा सर्वांचाच आवडता प्रदेश आहे, निसर्ग, देवदेवता यांच्यासाठी प्रसिध्द असा प्रदेश असणाऱ्या कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम केल्यास चांगले काम होऊ शकेल. कोकणाच्या पर्यटन विकासाच्या धोरणात यापुढील काळात पर्यटनवृद्धीसाठीच्या नवनवीन संकल्पना राबविण्यात येतील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. येथे गोगटे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित रत्नागिरी पर्यटन महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, सभापती प्रकाश साळवी उपस्थित होते. महोत्सव यशस्वी केल्याबद्दल लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे कौतुक करुन देसाई म्हणाले की, महोत्सवाची ही परंपरा अशीच अखंडितपणे सुरू राहायला हवी. यामुळेच पर्यटन वाढून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. पालकमंत्री वायकर म्हणाले, जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा पर्यटनदृष्ट्या विकसित करुन पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. यासाठी पर्यटन महोत्सवासारखे पूरक उपक्रम जिल्हा पातळीप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणीही आयोजित करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पर्यटन महोत्सव दरवर्षी चालू राहणार आहे. जिल्ह्याचा पर्यटनदृष्टीने विकास हाच आपला संकल्प असून पर्यटन आराखड्यासाठी पाठपुरावा करुन त्या माध्यमातून आवश्यक निधी प्राप्त करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राधाकृष्णन बी. यांनी आयोजनासाठी सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.यावेळी पाककला स्पर्धेतील विजेत्यांना आणि कलागुण सादर करणाऱ्या स्थानिक कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच महोत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या विविध स्वयंसेवी, खासगी संस्था आणि व्यक्तिंचा सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)