शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पर्यटन विकासासाठी नवनवीन संकल्पना राबवणार

By admin | Updated: May 6, 2015 00:18 IST

सुभाष देसाई : रत्नागिरी पर्यटन महोत्सवाची उत्साहात सांगता

रत्नागिरी : कोकण हा सर्वांचाच आवडता प्रदेश आहे, निसर्ग, देवदेवता यांच्यासाठी प्रसिध्द असा प्रदेश असणाऱ्या कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम केल्यास चांगले काम होऊ शकेल. कोकणाच्या पर्यटन विकासाच्या धोरणात यापुढील काळात पर्यटनवृद्धीसाठीच्या नवनवीन संकल्पना राबविण्यात येतील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. येथे गोगटे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित रत्नागिरी पर्यटन महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, सभापती प्रकाश साळवी उपस्थित होते. महोत्सव यशस्वी केल्याबद्दल लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे कौतुक करुन देसाई म्हणाले की, महोत्सवाची ही परंपरा अशीच अखंडितपणे सुरू राहायला हवी. यामुळेच पर्यटन वाढून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. पालकमंत्री वायकर म्हणाले, जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा पर्यटनदृष्ट्या विकसित करुन पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. यासाठी पर्यटन महोत्सवासारखे पूरक उपक्रम जिल्हा पातळीप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणीही आयोजित करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पर्यटन महोत्सव दरवर्षी चालू राहणार आहे. जिल्ह्याचा पर्यटनदृष्टीने विकास हाच आपला संकल्प असून पर्यटन आराखड्यासाठी पाठपुरावा करुन त्या माध्यमातून आवश्यक निधी प्राप्त करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राधाकृष्णन बी. यांनी आयोजनासाठी सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.यावेळी पाककला स्पर्धेतील विजेत्यांना आणि कलागुण सादर करणाऱ्या स्थानिक कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच महोत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या विविध स्वयंसेवी, खासगी संस्था आणि व्यक्तिंचा सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)