शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

पर्यटन विकासासाठी नवनवीन संकल्पना राबवणार

By admin | Updated: May 6, 2015 00:18 IST

सुभाष देसाई : रत्नागिरी पर्यटन महोत्सवाची उत्साहात सांगता

रत्नागिरी : कोकण हा सर्वांचाच आवडता प्रदेश आहे, निसर्ग, देवदेवता यांच्यासाठी प्रसिध्द असा प्रदेश असणाऱ्या कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम केल्यास चांगले काम होऊ शकेल. कोकणाच्या पर्यटन विकासाच्या धोरणात यापुढील काळात पर्यटनवृद्धीसाठीच्या नवनवीन संकल्पना राबविण्यात येतील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. येथे गोगटे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित रत्नागिरी पर्यटन महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, सभापती प्रकाश साळवी उपस्थित होते. महोत्सव यशस्वी केल्याबद्दल लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे कौतुक करुन देसाई म्हणाले की, महोत्सवाची ही परंपरा अशीच अखंडितपणे सुरू राहायला हवी. यामुळेच पर्यटन वाढून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. पालकमंत्री वायकर म्हणाले, जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा पर्यटनदृष्ट्या विकसित करुन पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. यासाठी पर्यटन महोत्सवासारखे पूरक उपक्रम जिल्हा पातळीप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणीही आयोजित करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पर्यटन महोत्सव दरवर्षी चालू राहणार आहे. जिल्ह्याचा पर्यटनदृष्टीने विकास हाच आपला संकल्प असून पर्यटन आराखड्यासाठी पाठपुरावा करुन त्या माध्यमातून आवश्यक निधी प्राप्त करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राधाकृष्णन बी. यांनी आयोजनासाठी सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.यावेळी पाककला स्पर्धेतील विजेत्यांना आणि कलागुण सादर करणाऱ्या स्थानिक कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच महोत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या विविध स्वयंसेवी, खासगी संस्था आणि व्यक्तिंचा सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)