शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आमचं ठरलंय..; टोल मुक्त सिंधुदुर्गसाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार!, कणकवलीत कृती समितीची बैठक

By सुधीर राणे | Updated: December 28, 2022 17:37 IST

कणकवली: सिंधुदुर्गच्या उपपरिवहन प्रादेशिक विभागाकडे नोंदणी असलेल्या सर्व वाहनांना बिनशर्थ टोलमुक्ती मिळावी. यासाठी सर्वप्रथम सामोपचाराने अधिकाऱ्यांशी चर्चा करणे, निवेदने ...

कणकवली: सिंधुदुर्गच्या उपपरिवहन प्रादेशिक विभागाकडे नोंदणी असलेल्या सर्व वाहनांना बिनशर्थ टोलमुक्ती मिळावी. यासाठी सर्वप्रथम सामोपचाराने अधिकाऱ्यांशी चर्चा करणे, निवेदने देणे, न्यायालयीन लढाई  लढणे व त्यानंतर आवश्यकता भासल्यास अहिंसक मार्गाने रस्त्यावरील लढाई करणे. असे सर्वोतोपरी प्रयत्न करीत तीव्र लढा उभारण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. तसेच सिंधुदुर्ग पासिंगच्या सर्व वाहनांना बिनशर्थ टोलमुक्ती मिळावी. अथवा ओसरगाव येथील टोलनाका  जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर नेण्यात यावा, असा ठरावही सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ प्रणित टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. हे शक्य नसल्यास सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांसाठी एक स्वतंत्र लेन द्यावी किंवा २० किलोमीटर परिघाची सवलतची मर्यादा ६० किलोमीटर करावी. अन्यथा टोल नाक्याजवळ राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्वतंत्र रस्ते तयार करावेत अशी मागणी करण्याचे ठरविण्यात आले.  टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीची बैठक कणकवली महाविद्यालयाच्या  एचपीसीएल सभागृहात अस्थायी समितीचे अध्यक्ष सतीश लळीत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यापारी महासंघाचे नितीन वाळके, द्वारकानाथ घुर्ये, नंदन वेंगुर्लेकर, अशोक करंबेळकर, दिपक चव्हाण, अॅड. विलास परब, मनोज वालावलकर, दिपक बेलवलकर, निलेश धड़ाम आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जिल्ह्यातील विविध संघटना प्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी व इतरांनी मनोगत व्यक्त केले. टोलमुक्त समितीच्या माध्यमातून प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढावी लागली तरीही सर्वांनी एकत्रित येत लढण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच रस्त्यासाठी जागा संपादीत करण्यात आलेली आहे, अशा ठिकाणी सर्व्हिस रोड असणे बंधनकारक आहे. मात्र, तशी कार्यवाही झालेली नाही. टोल लागू न करण्याची यावेळी प्रमुख कारणे मांडण्यात आली. यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोलमुक्त रस्त्याची घोषणा केलेली होती. या महामार्गाचे काम अद्याप सुरू असून ४५ टक्के काम शिल्लक आहे. तसे नसल्यास त्याबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी टोलमुक्तीसाठीचे ठराव घ्यावेत. जिल्ह्यातील एकूण नोंदणीकृत ३ लाख २८ हजार ७११ वाहनांपैकी सुमारे ४० हजारहून अधिक वाहने या टोलवसुलीमुळे अडचणीत येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहनांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे. तसे न झाल्यास टोल जिल्ह्याच्या सिमेवर खारेपाटण येथे नेण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळा झालेल्या चर्चेत नितीन वाळके, द्वारकानाथ घुर्ये, मनोज वालावलकर, नंदन वेंगुर्लेकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राष्ट्रवादीचे नेते अबिद नाईक, अनंत पिळणकर, संजय भोगटे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,  कन्हैया पारकर, राजन नाईक, मनोज रावराणे, अॅड. विलास परब, दादा कुडतरकर, अॅड. किशोर शिरोडकर, रवी तोरसकर, संतोष नाईक, रंजन चिके, दिपक चव्हाण व  इतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी टोल मुक्ती कृती अस्थायी  समितीचे रूपांतर स्थायी समितीत करण्यात आले.त्यामध्ये अजूनही काही सदस्यांचा समावेश करण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtollplazaटोलनाका