शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

आधी आश्वासने आता दरात येऊनही अधिवेशनाकडे पाठ, शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण मंत्र्यांवर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 17:28 IST

सावंतवाडी : शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दीड वर्षात आमचे प्रश्न ऐकून घेतले पण सोडवले नाहीत पंधरा दिवसापूर्वी शिक्षकेतर ...

सावंतवाडी : शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दीड वर्षात आमचे प्रश्न ऐकून घेतले पण सोडवले नाहीत पंधरा दिवसापूर्वी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवतो असे  पुन्हा आश्वासन दिले. परंतु त्यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे दुसरीकडे मागून मिळत नाही घरी आल्यानंतर तरी देतात का नाही ते बघूया म्हणून आम्ही त्यांच्या दारात येवून अधिवेशन घेण्या

चा निर्णय घेतला. परंतु तेच आले नाहीत, अशा शब्दात आपली नाराजी राज्य संघटनेचे सचिव शिवाजी खांडेकर यांनी अधिवेशनात बोलून दाखवली सावंतवाडीतील जिमखाना मैदानावर रविवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ५१ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते.यावेळी अधिवेशनाला आमदार विक्रम काळे सह आमदार निरंजन डावखरे आदिनी भेट दिली तर उद्योजक विशाल परब अर्चना घारे-परब यांनी शुभेच्छा दिल्या अधिवेशना ला राज्यभरातून पदाधिकारी तसेच शिक्षकेतर कर्मचारी आले होते.

खांडेकर म्हणाले,मंत्री केसरकर यांनी आम्हाला दिलेली आश्वासने अर्धवट ठेवली. मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमतः आपण प्रश्न समजून घेतो, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे वर्षभर आम्ही गप्प राहिलो. परंतु आता कारकीर्द संपण्याची वेळ आली तरी आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आम्हाला नाराज केलात तर आम्ही योग्य ती भूमिका घेऊ, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आहेत. महाराष्ट्राचे आर्थिक गणित कोलमडेल असे काही मागत नाही. बारा, चोवीसचा प्रश्न किंवा दहा, वीस, तीसचा प्रश्न सोडवण्यासाठी आमची सकारात्मक भूमिका आहे. याबाबत मंत्री केसरकर यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत लेखी आश्वासन दिले होते. तसेच पंधरा दिवसात हे दोन्ही प्रश्न आपण सोडवतो, तसा शासन अध्यादेश काढतो, असे आश्वासन दिले होते. परंतु या घटनेला अनेक महिने उलटले तरी अद्याप पर्यंत कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे किमान त्यांच्या घरी गेल्यानंतर तरी ते देतील असे वाटल्यामुळे आम्ही सावंतवाडीत अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला. परंतु आजच्या अधिवेशनात ते आले नाहीत.अशा शब्दात नाराजी व्यक्त केली.

आमदार काळे यांनी  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीची भरती नको, तर पूर्णवेळ पदे भरा. त्यांना म्हातारपणाची काठी म्हणून जुनी पेन्शन योजना लागू करून त्यांना आधार द्या, असे आवाहन काळे यांनी केले तर आमदार निरंजन डावखरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ आहे. त्यामुळे समूह शाळेला आपला विरोध राहणार आहे, असे स्पष्ट केले.तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रश्न मोठे ते सोडवले गेले पाहिजेत असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर