शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

देवरुख शहरवासियांना मुबलक पाणी

By admin | Updated: April 27, 2015 00:13 IST

भरपूर पाणीसाठा : पर्शुरामवाडी धरणातील गाळ उपसल्याचा चांगला परिणाम--शहरांचं पाणी देवरुख

सचिन मोहिते - देवरुख  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्शुरामवाडी आणि धावडेवाडीतील येथील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्याने देवरुख शहराला पाणीटंचाई जाणवत नाही. २५ वर्षांपूर्वी बांधलेल्या पर्शुराम वाडीतील धरणातून देवरुखवासियांना पाणीपुरवठा होत आहे. गेल्या २-३ वर्षांपूर्वी देवरूखला पाणीटंचाई भासत होती. मात्र, धरणातील गाळ उपसल्यानंतर आता पाण्याचा साठा मुबलक आहे.ऐन उन्हाळ्याच्या अखेर मात्र देवरूख शहरातील मोगरवणे या वाडीला पाणीटंचाई निर्माण होते. मात्र, या मोगरवणे वाडीला अशावेळी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. देवरूखवासियांना पर्शुरामवाडीतील धरणातून नळपाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पूर्वी देवरूखला ग्रुप ग्रामपंचायत होती. आता तीन वर्षांपासून नगरपंचायत झाली आहे. आता हा सारा कारभार आणि नळपाणी योजना नगरपंचायतीकडे हस्तांतरीत झाल्या आहेत. मात्र, नळपाणी योजनेचा विचार करता येणारी पाणीपट्टी आणि नळपाणी योजनेवर होणारा खर्च याचा विचार केल्यास ही नळपाणी योजना तोट्यातच चालवली जाते आहे. मेंटेनन्स, पाणी विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार आणि वीजभाडे यांचा विचार करता तब्बल ६५ लाखांचा खर्च होतो आणि पाणीपट्टी १०० टक्के वसूल झाल्यास ४५ लाखांच्या घरात येते. यातील फरकाचा विचार केल्यास तब्बल २० लाखांच्या फरकात योजना तोट्यात चालवली जाते.देवरूखवासियांना दिवसातून एक वेळ पाऊण तास पाणी सोडले जाते. १७६० नळपाणी कनेक्शन धारकांना तब्बल १६ लाख लिटर पाणी दिवसाकाठी लागते. मात्र, हे पाणी सोडताना पर्शुरामवाडी धरणातून नजीकच्या फिल्ट्रेशन प्लँटमध्ये सोडले जाते. फिल्ट्रेशन प्लॅण्टच्या टाकीची क्षमता ३ लाख लिटर आहे आणि हे पाणी प्लॅण्टमध्ये फिल्टर होते.या दोन्ही धरणांचा विचार केल्यास धरणे सुस्थितीत असून २-३ वर्षांपूर्वी पाणी तुटवडा जाणवत असल्याने धरणातील गाळ उपसण्याचे काम करण्यात आले होते आणि गाळ उपसा झाल्यानंतर पाण्याच्या साठ्यामध्ये वाढ झाली. त्यावेळेपासून पाणी मुबलक आहे. तसेच १५ वर्षांपूर्वी पाईपलाईन बदलण्यात आली होती. ही पाईपलाईन नव्याने बदलण्याचे काम चालू होणार आहे. येऊ घातलेल्या २४ बाय ७ योजनेंतर्गत आणि पाण्याचा वाढती मागणी, वाढती कनेक्शन याचा विचार करुन हे पाईप्स वाढविण्याबाबत सध्या विचार करण्यात आला आहे. जेणेकरुन पाण्याच्या दाबाचा विचार करुन आणि वाढती कनेक्शन विचारात घेऊन मोठे पाईप लवकरच टाकण्यात येतील. अलीकडील काळात नळपाणी योजनेची दुरुस्ती झालेली नाही.याखेरीज मोगरवणे, हसमवाडी, पठारवाडी आणि कोल्हेवाडी या वाड्यांना तेथीलच सार्वजनिक विहिरीवरून पाणीपुरवठा होत आहे. मात्र, ऐन उन्हाळ्यात मोगरवणे येथील आडामधील पाणी आटून आड कोरडा होतो. यावेळी मात्र या वाडीसमोर पाण्याचा प्रश्न उभा राहून मोगरवणे येथे पाणीटंचाई निर्माण होते. तर भौगोलिक रचनेमुळे पाण्याच्या दाबामुळे दत्तनगर आणि काही वाड्यांना पाणी कमी प्रमाणात मिळते. मात्र, देवरूख शहरामध्ये पाण्याच्या नियोजनाचा योग्य विचार होताना दिसतो आहे. देवरूखमध्ये सुमारे ५० टक्के लोकांकडे स्वत:च्या मालकी हक्काच्या विहिरी आहेत. तसेच काही नागरिकांकडे स्वत:च्या खासगी बोअरवेल आहेत.मात्र, मोगरवणे वगळता अन्य वाड्यांमध्ये तितकासा पाणीप्रश्न दिसत नाही. देवरुख नगरपंचायतीच्यावतीने २४ बाय ७ म्हणजेच २४ तास मीटर पद्धतीने पाणी देण्याची योजना सध्या प्रस्तावित असल्याची माहिती नगरपंचायतीकडून उपलब्ध झाली आहे. तसेच मोगरवणे येथील आडातील पाणी आटल्याने त्यांना टँकर सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनीष सावंत यांनी दिली.शहरातील पर्शुरामवाडी, मोगरवणे, पठारवाडी, घोरपीवाडी, बागवाडी, कांजीवरा, क्रांतीनगर, रोहिदास आळी, कुंभ्यांचा दंड, नेहरुनगर, मोहल्ला, बौद्धवाडी, भोईवाडी, बाजारपेठ, खालची आळी, दत्तनगर, केशवसृष्टी, भुवड कॉलनी, अमृतनगर, कांगणेवाडी, हसमवाडी, बोटकेवाडी, कोल्हेवाडी, तेलीवाडी, तांबळवाडी, भायजेवाडी, कुंभारवाडी, भोरपवणे, गेल्येवाडी, वरचीआळी, मोरेवाडी, शिंदेवाडी, मधलीवाडी, मांडवकरवाडी, वाणीवाडी आदी ३५ वाड्यांना देवरुख नगरपंचायतीकडून नळपाणी योजनेद्वारे पाऊण तास पाणीपुरवठा केला जातो. मे महिन्याअखेर १५ मिनिटे पाणी कपात करण्यात येते.बोअरवेलचा निश्चित आकडा नाही देवरुख शहराची लोकसंख्या १३,०८५ इतकी असून ही जवळजवळ ३५ वाड्यांमध्ये विभागली आहे. या देवरुख शहरात १७६० नळकनेक्शनधारक आहेत. तर सुमारे ४२७ खासगी विहिरींचा समावेश आहे तर ३ विहिरी सार्वजनिक आहेत. तर ३ सार्वजनिक बोअरवेल आहेत. तसेच खासगी बोअरवेलचा निश्चित आकडा उपलब्ध नाही. देवरूख नगरपंचायत झाल्यानंतर या भागाला शहराचा दर्जा देण्यात आला असून शहरवासियांना आता परशुरामवाडी धरणातील पाण्याचा साठा मुबलक असल्यामुळे या भागात पाणी टंचाई बासत नाही.