शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

देवगड-निपाणी राज्यमार्ग खड्डेमय

By admin | Updated: August 8, 2016 23:35 IST

फोंडा बाजारपेठेत १-१ फुटाचे खड्डे : वाहतुकीची कोंडी कायम; प्रशासन मात्र सुस्तच

विशाल रेवडेकर ल्ल फोंडाघाट सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेले फोंडाघाट हे गाव. ऐतेहासिक बाजारपेठेचा वारसा असलेल्या या बाजारपेठेतून जिल्ह्यातील इतर गावांना मालवाहतूक केली जाते. सोमवार आठवडा बाजार असला तरी शनिवारी रात्रभर या गावात पान बाजार चालतो. संपूर्ण जिल्ह्यातील पानांचे व्यापारी एकत्र या बाजारासाठी येतात. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात या गावाची ओळख असणारा ‘मध’ याच गावाचे नाव उज्ज्वल करतो. मात्र, सध्या याच ऐतिहासिक गावातील नागरिकांना अनेक समस्यांनी भेडसावले आहे. यातील प्रमुख समस्या म्हणजे रस्ता, वाहतूक व खड्डे होय. देवगड-निपाणी राज्य मार्गावर असलेली ही फोंडाघाटची ऐतिहासिक बाजारपेठ असंख्य खड्ड्यांमुळे चर्चेत आली आहे. मागील काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम झाल्यानेच या बाजारपेठेत तब्बल १-१ फुटांपेक्षा मोठे खड्डे या राज्यमार्गावर पडल्याचे ठिकठिकाणी दिसताहेत. याकडे स्थानिक पदाधिकारी व बांधकाम विभाग पूर्णत: दुर्लक्ष करीत आहेत. एकीकडे होत असलेली वाहतुकीची कोंडी व बाजारपेठेत असलेले भलेमोठे खड्डे यामुळे पादचारी व वाहन चालकांमध्ये प्रशासनविरोधात तीव्र नाराजी आहे. या बाजारपेठेतच एका निवृत्त एस.टी. कर्मचाऱ्याला वाहतुकीच्या कोंडी दरम्यान गंभीर इजा झाली होती. त्यानंतर एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याचा मालवाहू ट्रकची धडक लागून मृत्यू झाला होता. अशा गंभीर घटना घडूनही बांधकाम विभागाने याबाबत गंभीर दिसत नाही. येथील रस्ता रुंदीकरणाच्या व वाहतूक कोंडीच्या विषयात बांधकाम विभागाला आणखी किती बळी हवेत, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर आहे. मागील काही माहिन्यांपूर्वी पालकमंत्री दीपक केसरकर यांना याच बाजारपेठेतून जात असताना तब्बल एक तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर तत्काळ त्यांनी बांधकाम विभागाला धारेवर धरत फोंडाघाट बाजारपेठ रुंदीकरणाच्या सूचना दिल्या. तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी तातडीने फोंडाघाट बसस्थानकानजीकचे अतिक्रमण हटवत पुलाची रुंदी वाढवून घेतली. मात्र, एखाद्या नाटकावर पडदा पडावा तसा पालकमंत्र्यांची पाठ फिरताच या रस्ता रुंदीकरणाच्या विषयावर पडदा पडला व रस्ता रुंदीकरण फक्त कागदापुरतेच मर्यादित राहिले. पोलिसांचे कर्तव्य फोंडा आय.टी. आय.पर्यंतच? वाहनचालकांना शिस्त लागावी तसेच कोल्हापूर ते फोंडा अंतर ३ तासात पार व्हावे यासाठी वाहन चालकाला ५ मिनीटांची बाजारपेठ पार करायला तासन तास वाट पहावी लागते. त्यामुळे इथल्या व्यापारावर देखील याचा परिणाम होतो. स्थानिक ग्रामस्थ तसेच काही लोकप्रतिनिधींनी वाहतूक पोलिस मिळावा यासाठी कणकवली पोलिसांकडे वारंवार मागणी केली होती. पण अपुरेकर्मचारीचे कारण सांगत एकही वाहतूक पोलिस दिला नाही. केव्हातरी वाहतूक पोलिस येतात तेही ४ ते ५ जणांच्या गटाने मात्र बाजार पेठेच्या अलीकडे १ किलोमीटर असलेल्या आय.टी. आय.पर्यंत तेही माल, चिरे, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पावती करण्यासाठी कधी कधी तर बाजारपेठ पार करून जायची असेल आणि बाजारत वाहतुकीची कोंडी होत असेल तर हे वाहतूक पोलिस मागील रस्त्याचा वापर करतात. मात्र वाहतुकीची शिस्त लावण्याचा प्रयत्न यांच्याकडून होत नासल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते. गणेशाच्या आगमनापूर्वीच ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे काही दिवसांवर आलेल्या चतुर्थी सणापूर्वी रस्त्याची झालेली दुरवस्था दूर करावी कारण श्रींच्या मूर्तींची वाहतूक होताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच मुंबई-पुणे येथून येणारे चतुर्थी सणात येणारे चाकरमानी फोंडाघाट मार्गाला जिल्ह्यात येण्यास पसंती देतात. मात्र प्रवेश द्वारापाशीच असलेल्या या गावात होत असलेली वाहतूक कोंडीकडे गांर्भीयाने पोलिस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.