शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

देवबाग, मिठमुंबरीत समुद्राचे पाणी

By admin | Updated: July 6, 2016 00:30 IST

संततधार : कुडाळ आंबेडकरनगर, मळेवाडमधील घरांना पाण्याने वेढले; जनजीवन विस्कळीत

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पडलेल्या पावसाने कुपवडे, शिवापूर, आसोली, होडावडे-वेंगुर्ले या पुलांवर पाणी आल्याने त्या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली, तसेच भूस्खलन होण्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. मसुरे मार्गावरील मायनेवाडी व तळाणीवाडी डोंगर भाग खचल्याने घरांना धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी सायंकाळी समुद्रात उधाणसदृश स्थिती असल्याने लाटांचा वेग वाढला होता. देवबाग मोंडकरवाडी येथील लोकवस्तीत पाणी घुसण्याची घटना घडली आहे. सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड चराटकरवाडी येथील रेवती पांडुरंग चराटकर, आरोंदा मार्गावरील विनायक यशवंत चराटकर आणि कुडाळ शहरातील आंबेडकरनगरातील सहा घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे, तर वेगुर्ले येथील आनंद रघुनाथ खोत यांच्या घरातील मातीच्या दोन भिंती कोसळल्याने २५ हजारांचे नुकसान झाले होते. देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी येथील सहा घरांमध्ये पाणी शिरले. मुसळधार पावसामुळे व समुद्राला उधाण आल्यामुळे समुद्राचे पाणी घरांमध्ये शिरल्याने रत्नमाला हरी नेसवणकर या वयोवृद्ध व अपंग महिलेला तिच्या घरामधून दुसऱ्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे. सिंधुदुर्गात गेल्या आठ दिवसांत पावसाची संततधार सुरू असून नदी, नाले, धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात पडझडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, ७० पेक्षा जास्त घरांची पडझड झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये पाचजणांचा मृत्यू झाला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. केवळ अशा बाधित कुटुंबांना स्थलांतरित करण्याच्या नोटिसांपलीकडे प्रशासन याचे गांभीर्य बाळगत नसल्याचेच दिसून येत आहे. प्रशासनाच्या या धोरणामुळे संबंधितांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)बांदा, शेर्ले परिसरात पुराचे पाणी शिरलेबांदा शहर व परिसराला मंगळवारी पहाटे मुसळधार पावसाने झोडपून काढले. तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बांदा शहरातील आळवाडी परिसरात तसेच शेर्ले परिसरातील पुराचे पाणी शिरल्याने स्थानिकांची एकच तारांबळ उडाली. इन्सुली-सावंतटेंब येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने महामार्गावरील वाहतूक अर्धा तास बंद होती. महामार्गावर बांदा-सटमटवाडी येथे दरडीची माती पुन्हा रस्त्यावर आल्याने येथून एकेरी वाहतूक सुरू होती. शेर्ले येथील जुने कापई पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले.मसुरेत दोन डोंगर खचलेमालवण तालुक्यात सोमवारी रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने अनेक रस्तेमार्गावरील पूल पाण्याखाली गेले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळच्या सत्रात दोन ते तीन तास वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पडझडीच्या घटनाही वाढल्या असून, मसुरे मार्गावरील मायनेवाडी व तळाणीवाडी डोंगर भाग खचल्याने घरांना धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी सायंकाळी समुद्रात उधाणसदृश स्थितीने लाटांचा वेग वाढला होता. देवबाग मोंडकरवाडी येथील लोकवस्तीत पाणी घुसण्याची घटना घडली आहे. ठिकठिकाणी पूरजन्य परिस्थितीपावसामुळे कसाल नदीची पाणीपातळी वाढून संभाव्य पूरस्थिती निर्माण झाली होती. तसेच कुपवडे-शिवापूर येथील पुलावर पाणी आल्याने वाहतूक खोळंबली. होडावडे-वेंगुर्ले मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. वेगुर्ले खवणे येथील आनंद खोत यांच्या घराच्या भिंती कोसळल्याने २५ हजारांचे नुकसान, तर रामगड येथील सहदेव जाधव यांच्या घरावर घळणीचा भाग कोसळून २२ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.