शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

क्रीडा विभागाच्या चौकशीची मागणी

By admin | Updated: August 25, 2014 22:14 IST

स्पर्धक खेळाडूंच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा क्रीडा विभागाच्या मनमानी व भोंगळ कारभारामुळे स्पर्धेसाठी आलेले स्पर्धक विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. याबाबत सोमवारी स्पर्धक खेळाडूंच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तर क्रीडा विभागाचा कारभार सुधारावा अन्यथा स्पर्धा आयोजित करू नये, अशी मागणी करीत जिल्हा क्रीडा विभागाच्या कारभाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.जिल्हा क्रीडा विभागामार्फत सोमवारी येथील क्रीडा संकुलामध्ये धर्नुविद्या, व्हॉलिबॉल अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. मात्र स्पर्धेच्या ठिकाणी क्रीडा विभागाचे अधिकारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत कोणीच फिरकलेले नाहीत. त्यामुळे स्पर्धक विद्यार्थ्यांच्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच क्रीडा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे स्पर्धक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा.धनुर्विद्या, व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी आलेल्या जिल्ह्याभरातील खेळाडूंच्या कोणत्याही सोयीसुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असले तरी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित हे सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे या स्पर्धांच्या नियोजनाला कोणीच वाली नाही. तर स्पर्धा नियोजनाची जबाबदारी घेणारा कोणीही अधिकारी दुपारपर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी फिरकलेला नाही. त्यामुळे स्पर्धक व त्यांच्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सकाळी १० वाजता स्पर्धा सुरू होईल. म्हणून सकाळी ६ वाजता जिल्हाभरातून निघालेले स्पर्धक विद्यार्थ्यांची उपासमार झाली. याबाबत काही पालकांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे लक्ष वेधले आहे.जिल्हा क्रीडा विभागामार्फत वर्षभरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यासाठी या स्पर्धांसाठी लाखो रूपये शासनाचा निधी कागदोपत्री खर्चही दाखविण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात येथे येणाऱ्या खेळाडूंना सोयीसुविधा पुरविण्यात येतात का? हा प्रश्न आहे. केवळ शासनाचा निधी खर्च घालण्यासाठीच स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. वारंवार स्पर्धांच्या वेळेत बदल कणे, ठिकाणे बदलणे, जेवण- नाश्तासारख्या सोयी न पुरविणे, वेळेत स्पर्धांचे उद्घाटन न करणे, खेळाडू आणि स्पर्धेकडे दुर्लक्ष करणे अशा या क्रीडा विभागाच्या भोंगळ कारभाराचा त्रास प्रत्येक स्पर्धेवेळी खेळाडूंना सहन करावा लागत आहे. जिल्हा क्रीडा विभागाचा भोंगळ कारभार सुधारावा, खेळाडूंना आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी वारंवार स्पर्धकांकडून होत असते. जिल्हा प्रशासनही या अनागोंदी कारभाराकडे दुर्लक्षच करीत असल्याचा आरोप खेळाडूंकडून होत आहे. अशाचप्रकारे आजच्या स्पर्धेबाबत खेळाडूंच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधलेआहे. (प्रतिनिधी)