शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

स्वतंत्र कोकण विद्यापीठाची मागणी : महेंद्र नाटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 15:48 IST

कोकणी माणूस बुद्धिमान आणि प्रतिभाशाली असतानाही केवळ पुरेशी शैक्षणिक सुविधा न मिळाल्याने कोकणची पिछेहाट होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसाठी ‘स्वतंत्र कोकण विद्यापीठ’ व्हावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदनकोकण विद्यापीठ जगात आघाडीवर राहील : प्रा. नाटेकर लोकप्रतिनिधी उदासीनशिक्षणमंत्र्यांनी लक्ष न दिल्याने कोकणी मुलांचे भवितव्य धोक्यात

 सिंधुदुर्गनगरी : कोकणी माणूस बुद्धिमान आणि प्रतिभाशाली असतानाही केवळ पुरेशी शैक्षणिक सुविधा न मिळाल्याने कोकणची पिछेहाट होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसाठी ‘स्वतंत्र कोकण विद्यापीठ’ व्हावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.  तसेच हे विद्यापीठ झाल्यास जगातील पहिल्या दोनशे विद्यापीठांच्या क्रमांकात कोकण विद्यापीठ आघाडीवर असेल, अशा विश्वास स्वतंत्र कोकण संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मागणीबाबत येथील पत्रकार कक्षात स्वतंत्र कोकण संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रा. कृष्णा दळवी, प्रा. गजानन परूळेकर, प्रा. शांताराम राणे, प्रा. श्रीपाद परब आदी उपस्थित होते. 

यावेळी प्रा. नाटेकर म्हणाले की, कोकणात स्वतंत्र विद्यापीठ नसल्याने येथील विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठावर अवलंबून रहावे लागते. मात्र या विद्यापीठात संपूर्ण देशातून विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे हे विद्यापीठ भारतीय विद्यापीठ झाले आहे. या विद्यापीठात प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या अनेकपटीने वाढली आहे. त्यामुळे या विद्यापीठाचे प्रशासन कोलमडू लागले आहे. याशिवाय आता या विद्यापीठाच्या करभारात सावळागोंधळ निर्माण झाला आहे.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोकणात वनस्पती, वनौषधी, खनिजे आणि जैवविविधता आहे. त्यामुळे येथे संशोधनाला भरपूर वाव आहे. मात्र मुंबई विद्यापीठाने अद्यापपर्यंत त्यादृष्टीने कोणतीही पावले उचलली नाहीत. मुंबई विद्यापीठाच्या कारभारातील गोंधळ पाहता त्यात सुधारणा झाली तरी कोकणच्या बहुसंख्य समस्या कायम राहणार आहेत. त्यामुळे कोकणचा विचार करता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांसाठी रत्नागिरी या मध्यवर्ती ठिकाणी ‘स्वतंत्र कोकण विद्यापीठ’ व्हावे अशी मागणी स्वतंत्र कोकण संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती प्रा. महेंद्र नाटेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  मागणी मान्य न झाल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

कोकण विद्यापीठ जगात आघाडीवर राहील : प्रा. नाटेकर 

जगातील पहिल्या दोनशे विद्यापीठांच्या गणनेत  भारतातील एकाही विद्यापीठाची गणना होत नाही. ही शरमेची बाब आहे. मात्र दहावी आणि बारावीचा स्वतंत्र कोकण बोर्ड निर्माण झाल्यापासून हा बोर्ड राज्यात आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे स्वतंत्र कोकण विद्यापीठ मंजूर झाल्यास हे विद्यापीठ जगातील दोनशे विद्यापीठांच्या गणनेत आघाडीवर राहील, असा विश्वास प्रा. महेंद्र नाटेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

लोकप्रतिनिधी उदासीन

कोकणी माणूस अत्यंत बुद्धिमान आणि प्रभावशाली असतानाही केवळ अपुºया शैक्षणिक सुविधांमुळे मागे रहात आहे. त्यासाठी कोकणाला विविध सुविधांसह स्वतंत्र कोकण विद्यापीठ होणे आवश्यक आहे. मात्र आजपर्यंत या मागणीकडे जिल्ह्यासह कोकणातील लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केला असल्याचा आरोपही प्रा. नाटेकर यांनी यावेळी केला आहे. 

शिक्षणमंत्र्यांनी लक्ष न दिल्याने कोकणी मुलांचे भवितव्य धोक्यात

अपुºया शैक्षणिक सुविधांमुळे कोकणी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र त्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. शिक्षणमंत्री हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याने ते कोकणाकडे लक्ष देतील अशी आशा होती. मात्र त्यांनीही कोकणातील विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केला आहे. या दुर्लक्षामुळे कोकणी मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात असल्याचेही स्वतंत्र कोकण संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी यावेळी सांगितले.