शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

हापूसची मागणीत वट, पण उत्पादनात घट

By admin | Updated: April 18, 2015 00:01 IST

आणखी एक संकट... : अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान

रत्नागिरी : फळमाशीचे कारण देत युरोपीय देशांनी गतवर्षी आंबा आयातीवर बंदी घातली होती. यावर्षी परदेशातून आंब्याला मागणी असूनही उत्पादनाअभावी निर्यातीवर परिणाम झाला आहे. रत्नागिरी पणन विभागाकडे ५०० किलो आंबा युरोपला पाठवण्यासाठी दाखल झाला आहे. बाष्पजल प्रक्रियेसाठी हा आंबा उद्या (शनिवारी) मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे.युरोपीय देशांनी यावर्षी काही अटी ठेवून निर्यातीवरील बंदी उठविली आहे. निर्यातीसाठी उष्णजल प्रक्रियेस मान्यता देण्यात आली होती. मात्र, अद्याप संशोधन पूर्ण होऊ शकलेले नसल्याने बाष्पजल प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे. वाशी येथे बाष्पजल प्रक्रिया युनिट आहे. वाशीतून युरोपला आंबा पाठवताना बाष्पजल प्रक्रिया करून पाठविली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून दत्तात्रय दामले यांची पहिली ५०० किलोची कन्साईटमेंट मुंबईकडे शनिवारी रवाना होणार आहे. आंबा सध्या रत्नागिरी पणन मंडळाकडे असून तो अर्धवट पिकवून पाठवायचा असल्याने उद्यापर्यंत आंबा ठेवण्यात येणार आहे.आंबा हे भारतातील नगदी पीक असून, राष्ट्रीय फळ म्हणून आळखले जाते. कोकणातील आंब्याची हापूस जात जगामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. फळाची गोडी, चव, स्वाद, रंग, आकार आदी गुणवैशिष्ट्यांमुळे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ही जात लोकप्रिय आहे. आंब्यावर ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया एक तास केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात, असे मत संशोधकांनी वर्तविले होते. बैंगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे.वास्तविक आंब्यावर १५ एप्रिलनंतर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. परंतु यासंबंधी तातडीने अहवाल पाठवण्यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे. परंतु सध्या अवकाळीतून वाचलेला आंबा शेतकऱ्यांनी बाजारपेठेत पाठवण्यास सुरूवात केली आहे. परंतु उष्णजलचा अहवाल प्राप्त होण्यास उशीर झाल्याने बाष्पजल प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे. बाष्पजल प्रक्रियेमध्ये साडेसत्तेचाळीस अंश सेल्सियस इतके तापमान आंब्याला दिले जाते. नंतर थंड पाण्याव्दारे हळूहळू तापमान खाली आणले जाते. त्यामुळे फळमाशीच्या अळ्या मरून जातात. वाशी मार्केटमधील ४०० डझन आंबा विकत घेऊन त्यावर उष्णजल प्रक्रिया करून आंबा युरोपीय देशात पाठवण्यात आला होता.मॉरिशस, न्युझीलंड, युरोप, अमेरिका, जपान आदी देशातून आंब्याला मागणी होत आहे. मात्र, अवकाळीमुळे जिल्ह्यातील २० हजार ५१८.३० हेक्टर क्षेत्रावरील आंबा पीक नष्ट झाले. शिवाय अद्याप अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळेही आंबा पिकावर परिणाम होत आहे. त्यामुळे निर्यातीला मागणी असूनही शेतकरी पुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहेत. यंदा अवकाळी पाऊस, बदलते वातावरण यामुळे हापूस व्यवसाय अडचणीत आल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)रत्नागिरी जिल्ह्यातून गेल्या दहा वर्षात निर्यात करण्यात आलेल्या आंबा पिकाची आकडेवारी (मेट्रिक टनमध्ये) पुढीलप्रमाणे : वर्षनिर्यात२००५-०६९.५२००६-०७ -२००७-०८४०.८२२००८-०९८४.५२२०१०-११११.०९२०११-१२१६.८२०१२-१३१८२०१३-१४१५.६४३