शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

‘सीईटीपी’वर कारवाईची मागणी

By admin | Updated: December 30, 2014 23:34 IST

हनीफ परकार : मासेवारीवर शोककळा, ग्रामस्थ संतापले; आता माघार नाही

खेड : तालुक्यातील लोटे येथील सीईटीपीमधून सोडण्यात येणारे सांडपाणी न्यायालयाच्या आदेशानंतरही सोडलेच जात आहे. या पाण्यामुळे दाभोळ खाडी मोठ्या प्रमाणावर दूषित होत असून, मासे मरण्याचे प्रमाण वाढले आहे. याप्रकरणी लोटे सीईटीपीवर कारवाई करण्याची मागणी प्रदूषणविरोधी लढा देणारे हनिफ शरीफ परकार यांनी केली आहे. खेड येथील तहसीलदार आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे याबाबत वारंवार निवेदने देऊनही याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे. मच्छिमारी व्यवसायावर जगणाऱ्या येथील लोकांवर दूषित पाण्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता माघार न घेता सीईटीपीवर कारवाई करण्याबाबत आपण पावले उचलणार असल्याचे परकार यांनी सांगितले आहे.लोेटे औद्यौगिक वसाहतीमधील सर्व रासायनिक कंपन्या आपले सांडपाणी सीईटीपी या सांडपाणी यंत्रणेद्वारे सोडीत आहेत. १९९७ पासून आजतागायत हे सांडपाणी दाभोळ खाडीत सोडणे सुरूच आहे. या दूषित सांडपाण्यामुळे जगबुडी, वाशिष्ठी, दाभोळ खाड्या दूषित होत आहेत. सीईटीपीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन १९९७पासून पर्यावरणासह येथील तहसीलदारांना तीन वेळा देण्यात आले. मात्र, कुणीही लक्ष दिले नाही. याच दाभोळ खाडीत मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. मात्र, दूषित पाण्यामुळे मासे मरून ते खाडीच्या किनाऱ्यावर पसरत आहेत. त्यामुळे येथील मच्छिमार संकटात सापडला आहे. याप्रकरणी न्यायालयामध्ये जनहीत याचिका दाखल करण्यात आली असून, न्यायालयाने दिलेला बंदी आदेश मोडून दाभोळ खाडीत पुन्हा मासे मरून पडत आहेत. विषारी पाण्यामुळे माशांची मरतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. न्यायालयाचा अनेक वेळा अवमान करणाऱ्या लोटे येथील सीईटीपीवर कारवाई करावी, अशी मागणी हनिफ परकार यांनी केली आहे.कोट्यवधी रूपये खर्च करून लोटे औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी, रासायनिक कारखान्यामधून सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून ते सोडले जात आहे की नाही, यावर लक्ष ठेवणाऱ्या संबंधीत यंत्रणेचे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे, असा खाडीपट्ट्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे. येथील प्रदूषण न थांबवता उद्दाम अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचवण्याचा प्रकार वाढायला लागला. खेड, चिपळूण, दाभोळ खाडीपट्ट्यातील बांधवांना अनेक वर्षे माशांच्या संकटाला तोंड द्यावे लागत असल्याने या यंत्रणेबाबत तक्रारी वाढू लागल्या आहेत. (प्रतिनिधी)प्रदूषणाने खेड तालुक्यातील पारंपरिक व्यवसाय ठप्प होण्याची भीती.कोकणात प्रदूषणावर ठोस उपाय योजना नसल्यानेच खाडीपट्ट्यात असंतोष. आंदोलनांनंतर केली जाते तात्पुरती कारवाई. नद्या झाल्या दूषित, नागरिकांचे हाल कोण खातो. प्रदूषण नियंत्रण मंडळ करते काय ?लोटे औद्योगिक क्षेत्रात असलेल्या रासायनिक कारखानदारांच्या संघटनांनीही यात लक्ष घालून जनतेला न्याय द्यायला हवा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, सीईटीपीची जबाबदारी या सर्वात महत्त्वाची आहे.यावर उपायकाय?गेले अनेक महिने आम्ही येथील प्रदूषणावर ठाम आहोत. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा सामूहिक सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन केंद्राच्या कारभारावर वारंवार संताप व्यक्त करीत आहोत.