शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

निवती रॉक परिसरात स्कूबा डायव्हींग सुविधा सुरु करणार : दीपक केसरकर

By admin | Updated: May 24, 2017 16:04 IST

वेंगुर्ला नगरपालीकेच्या १४१ व्या वर्धापन दिन

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि २४ : निवती रॉक परिसरात पावसाळ्यानंतर स्कूबा डायव्हींग सुविधा सुरु केली जाईल. या बाबत वेंगुर्ल्यांतील युवकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. वेंगुर्ला बंदर ते निवती पर्यंत सबमरीन सेवा सुरु करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला येथे केले. वेंगुर्ला नगरपालीकेच्या १४१ व्या वर्धापन दिना- निमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्षा आस्मिता राऊळ पंचायत समिती सभापती यशवंत परब, मुख्याधिकारी रामदास कोकरे उपस्थितहोते. मालवण प्रमाणेच आंतर देशीय पर्यटक वेंगुर्ला येथे यावेत या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री म्हणाले की, वेंगुर्ला नजिकच शिरोडा व आरवली येथे पंचतारांकीत हॉटेल प्रकल्प सुरु आहेत. जेष्ठ नागरिकांनाही स्कूबा डायव्हींग करता यावे यासाठीही सुविधा वेंगुर्ला येथेनिर्माण केल्या जाणार आहेत. वेंगुर्ला नगरपालीकेच्या १४0 वर्षाच्या वाटचालीत योगदान देणा-या पदाधिकारी व अधिका-यांचा गौरवपूर्ण उल्लेख करुन पालकमंत्री केसरकर म्हणाले की, वेंगुर्ला शहराचा सर्वांगिण विकास होण्यासाठी सर्र्वानी एकत्र येवून प्रयत्न केले पाहिजेत. वेंगुर्ला शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अव्याहतपणे सुरु रहावा यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. यावेळी पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते वेंगुर्ला नगरपरिषदेतील माजी नगराध्यक्ष नगरसेवक, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच वेंगुर्ला शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच वर्धापन दिना- निमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रशिस्तीपत्र वितरीत करण्यात आले.राज्यस्तरीय आंबा- काजू परिषदेस भेटसिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित राज्यस्तरीय नैसर्गिक आंबा व काजू परिषदेस पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, जिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपत्तीच्या विकासावर आधारीत चांदा ते बांदा हा कार्यक्रम सिंधुदुर्गात सुरु केला आहे. सेंद्रीय शेतीच महत्व ओळखून काजू सेंद्रीय पध्दतीने लागवडीवर भर दिला जात आहे. कृषी विज्ञान केंद्राचे माध्यमातून कर्नल सुधीर सावंत यांनी अत्यंत स्तूत्य असा उपक्रम सुरु केला आहे. कृषी तज्ञ व पद्मश्री सुभाष पालेकर यांच उपयुक्त मार्गदर्शनाचा लाभ घेऊन शेतक-यांनी कृषी उत्पन्न वाढेल यासाठी प्रयत्नशील रहावे.