शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दीपक केसरकरांनी आतापर्यंत पालिकेला फुटकी कवडीही दिली नाही : संजू परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 18:30 IST

Dipak Kesarkar News- आमदार दीपक केसरकर राजशिष्टाचाराची भाषा करतात; पण त्यांनी ते नगराध्यक्ष असताना तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांना कितीवेळा कार्यक्रमाला बोलविले ते सांगावे आणि नंतर राजशिष्टाचाराची भाषा करावी. पालकमंत्री उदय सामंत ११ कोटी रुपये दिल्याचे सांगतात. मात्र, त्यांनी आतापर्यंत पालिकेला फुटकी कवडीही दिली नाही. घोेषणा तेवढ्या करतात, अशी जोरदार टीका सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे.

ठळक मुद्देदीपक केसरकरांनी आतापर्यंत पालिकेला फुटकी कवडीही दिली नाही : संजू परबआपल्या काळात कितीवेळा राजशिष्टाचार पाळला?

सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर राजशिष्टाचाराची भाषा करतात; पण त्यांनी ते नगराध्यक्ष असताना तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांना कितीवेळा कार्यक्रमाला बोलविले ते सांगावे आणि नंतर राजशिष्टाचाराची भाषा करावी. पालकमंत्री उदय सामंत ११ कोटी रुपये दिल्याचे सांगतात. मात्र, त्यांनी आतापर्यंत पालिकेला फुटकी कवडीही दिली नाही. घोेषणा तेवढ्या करतात, अशी जोरदार टीका सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे.ते  सावंतवाडी नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावले, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक उपस्थित होते.नगराध्यक्ष परब म्हणाले, सावंतवाडी नगरपालिका जी उद्घाटने करत आहेत, तो सर्व निधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे त्याचे श्रेय माजी मंत्री दीपक केसरकर यांनी घेऊ नये. नगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. त्यावर कोण दडपण आणू शकत नाही. तसेच केसरकर हे राजशिष्टाचाराबाबत सांगत आहेत; पण त्यांनी हा शिष्टाचार आपल्या काळात पाळला होता का? तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. त्यावेळी नगराध्यक्षपदी दीपक केसरकर काही काळ होते. तसेच त्यांचीच सत्ता होती. मग कोणत्या उद्घाटनाला राणे यांंना बोलावले याचे उत्तर केसरकर यांनी द्यावे, असेही परब म्हणाले.सावंंतवाडी नगरपालिका आपल्या वेगवेगळ्या निधीतून विकासकामे करीत आहे. पालकमंत्री उदय सामंत हे आपण ११ कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांंगतात पण हा निधी त्यांनी दाखवून द्यावा. अद्यापपर्यंत एक रुपयाचा निधीही मिळाला नसल्याचा उच्चार करीत मंत्री सामंत यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. आम्ही रितसर पालकमंत्री म्हणून उदय सामंंत तर आमदार म्हणून दीपक केसरकर यांचा निमंत्रणपत्रिकेत उल्लेख केला होता, तसे निमंत्रणही त्यांना दिले होते. पण ते येत नसतील तर आम्ही कार्यक्रम करून घेऊ, असेही परब यांनी सांगितले.

टॅग्स :Dipak Kesarkarदीपक केसरकरSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग