शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

डीएड बेरोजगारांना नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार - शिक्षणमंत्री दीपक केसरकर 

By सुधीर राणे | Updated: November 27, 2023 16:10 IST

वैयक्तिक संघर्ष नव्हता - नारायण राणे

कणकवली : केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर घेत असतो. यापूर्वीच आम्ही दोघांनीही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र काम करणार असे जाहीर केलेले आहे. डीएड बेरोजगार त्यांना भेटायला आले होते, त्यामुळे त्यांनी मला भेटायला बोलावले. रत्नागिरीत तासिका तत्वावर डीएड बेरोजगारांची भरती केली. तशी भरती प्रस्ताव तयार करुन अर्थ खात्याकडे पाठवून दिला जाईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटुन बेरोजगारांच्या कामयस्वरुपी नोकरीबाबत विचार केला जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत सोमवारी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, कणकवली तालुकाप्रमुख भुषण परुळेकर, उपतालुकाप्रमुख दामोदर सावंत आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, डीएड बेरोजगार सर्वांना नोकरी देण शक्य नाही. राज्यात २ लाख ४० हजार बेरोजगार आहेत. केवळ ३० हजार लोकांनाच नोकरी मिळू शकते. बाकींना नोकरी देणे कठीण आहे. यासाठी त्यांच्या गावातच थोड्या फार कमी खर्चात त्यांना मानधन तत्वावर नोकरी देण्याचा प्रयत्न आहे. रत्नागिरीत ९ हजार रुपये मानधन तत्वावर डीएड बेरोजगारांची भरती केली आहे. त्याच धरतीवर सिंधुदुर्गात भरती करता येईल का? याबाबत निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.नारायण राणेंचे चांगले मार्गदर्शन केंद्रीय मंत्री नारायण राणे हे चांगले मार्गदर्शन करत असतात. जिल्ह्यामध्ये नवीन काय करायचे? हे आम्ही ठरवणार आहोत. राजकीय चर्चेपेक्षा मी राणेंना भेटत असतो. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही दोघे एकत्र काम करणार हे आम्ही पुर्वी एकदा जाहीर केले होते. गणेशोत्सवात आम्ही भेटलो होतो. त्यामुळे तुम्ही ही राजकीय भेट समजण्याची गरज नाही. गैरसमज नको, माझ्या मनात मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल यापुर्वी जेवढा आदर होता तोच आदर कायम असल्याचेही केसरकरांनी सांगितले.  वैयक्तिक संघर्ष नव्हता - नारायण राणेपक्ष वेगवेगळे असल्याने वैचारिक मतभेद होते. आमच्यात आता मतभेद कोणतेही नाहीत. हा डीएड विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यांना नोकरी मिळावी म्हणून मी मंत्री दीपक केसरकर यांना बोलावले होते. ज्या पध्द्तीने रत्नागिरीत डिएड बेरोजगारांना नोकरीत घेण्याचा  निर्णय झाला, तो निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हावा यावर चर्चा झाली. केसरकर आणि राणेंमधील राजकीय संघर्ष हा केवळ एखाद्या मुद्द्यावर, विषयावरुन असेल. वैयक्तिक केव्हाही केला नाही असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणे