शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 15:49 IST

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ करून ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी प्रशासनाकडे प्रसिध्दीपत्रकातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केली असून याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असेही सांगितले.

ठळक मुद्दे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करा : रणजित देसाई यांची मागणी

कुडाळ : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ करून ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी प्रशासनाकडे प्रसिध्दीपत्रकातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केली असून याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असेही सांगितले.या प्रसिध्दीपत्रकात रणजित देसाई यांनी नमुद केले की, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे भात शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली असून काही ठिकाणी तर अक्षरश: कुजायला लागली आहे.

कोरोनाच्या कालावधीत अनेक सुशिक्षित बेरोजगार, चाकरमानी व शेतकरीवर्गाने आत्मनिर्भर होण्याच्यादृष्टीने वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जमिनीवर शेती केली होती. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी भात शेती मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती.जिल्ह्यातील शेतकरी हा आपल्याला संपूर्ण वर्षभर लागणारे तांदूळ व इतर धान्य हे स्वत:च्या शेतातच पिकवतात व त्यावर त्यांची गुजराण चालते. स्वत:चा उदरनिर्वाह करता लागणारे धान्य राखून उर्वरित सर्व धान्य हे विक्री करून त्यातच त्यांचा वर्षभराचा संसार चालतो. मात्र दुदैर्वाने गेल्या महिन्याभरात वारंवार होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या सर्वांचे तोंडचे पाणी पळाले आहे.त्यामुळे शासनाने तातडीने या सर्व नुकसानीचे पंचनामे करावेत व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी