शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 15:49 IST

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ करून ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी प्रशासनाकडे प्रसिध्दीपत्रकातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केली असून याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असेही सांगितले.

ठळक मुद्दे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करा : रणजित देसाई यांची मागणी

कुडाळ : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ करून ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी प्रशासनाकडे प्रसिध्दीपत्रकातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केली असून याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असेही सांगितले.या प्रसिध्दीपत्रकात रणजित देसाई यांनी नमुद केले की, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे भात शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली असून काही ठिकाणी तर अक्षरश: कुजायला लागली आहे.

कोरोनाच्या कालावधीत अनेक सुशिक्षित बेरोजगार, चाकरमानी व शेतकरीवर्गाने आत्मनिर्भर होण्याच्यादृष्टीने वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जमिनीवर शेती केली होती. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी भात शेती मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती.जिल्ह्यातील शेतकरी हा आपल्याला संपूर्ण वर्षभर लागणारे तांदूळ व इतर धान्य हे स्वत:च्या शेतातच पिकवतात व त्यावर त्यांची गुजराण चालते. स्वत:चा उदरनिर्वाह करता लागणारे धान्य राखून उर्वरित सर्व धान्य हे विक्री करून त्यातच त्यांचा वर्षभराचा संसार चालतो. मात्र दुदैर्वाने गेल्या महिन्याभरात वारंवार होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या सर्वांचे तोंडचे पाणी पळाले आहे.त्यामुळे शासनाने तातडीने या सर्व नुकसानीचे पंचनामे करावेत व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी