शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:19 IST

कुडाळ : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी सर्वप्रथम मागणी राज्यपालांकडे शिवसेनेनेच केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. ...

कुडाळ : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी सर्वप्रथम मागणी राज्यपालांकडे शिवसेनेनेच केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जास्तीत जास्त व तत्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी लवकरच राज्यपालांची भेट घेणार आहे, असे आश्वासन युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी कुडाळ तालुक्यातील शेतकºयांना दिले. लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकणातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ठाकरे यांनी शेतबांधावर बसूनच शेतकºयांशी संवाद साधला.यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, संदेश पारकर, जिल्हा परिषद सदस्य व गटनेते नागेंद्र्र परब, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, अमरसेन सावंत, तहसीलदार रवींद्र्र नाचणकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, पंचायत समिती सदस्य जयभारत पालव, बबन बोभाटे, अतुल बंगे, नगरसेवक सचिन काळप, राजू जांभेकर, सुशील चिंदरकर, योगेश धुरी तसेच इतर अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे येथील शेती बागायतींसह मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पर्यटन व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला आहे. या सर्व नुकसानीची पाहणी करण्यासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौºयावर आले होते. यावेळी त्यांनी कुडाळ तालुक्यातील निवजे, माणगाव येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली व शेतकºयांशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वप्रथम आम्ही शिवसेनेच्यावतीने राज्यपालांकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार प्रथम कोकणातील शेतकरी व मच्छिमार बांधवांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी करण्यासाठी मी आलो आहे. सध्या मराठवाडा दौºयावर असलेले उद्धव ठाकरे लवकरच कोकणात येऊन येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत, असेही ठाकरे यांनी सांगितले.