शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:19 IST

कुडाळ : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी सर्वप्रथम मागणी राज्यपालांकडे शिवसेनेनेच केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. ...

कुडाळ : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी सर्वप्रथम मागणी राज्यपालांकडे शिवसेनेनेच केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जास्तीत जास्त व तत्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी लवकरच राज्यपालांची भेट घेणार आहे, असे आश्वासन युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी कुडाळ तालुक्यातील शेतकºयांना दिले. लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकणातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ठाकरे यांनी शेतबांधावर बसूनच शेतकºयांशी संवाद साधला.यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, संदेश पारकर, जिल्हा परिषद सदस्य व गटनेते नागेंद्र्र परब, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, अमरसेन सावंत, तहसीलदार रवींद्र्र नाचणकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, पंचायत समिती सदस्य जयभारत पालव, बबन बोभाटे, अतुल बंगे, नगरसेवक सचिन काळप, राजू जांभेकर, सुशील चिंदरकर, योगेश धुरी तसेच इतर अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे येथील शेती बागायतींसह मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पर्यटन व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला आहे. या सर्व नुकसानीची पाहणी करण्यासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौºयावर आले होते. यावेळी त्यांनी कुडाळ तालुक्यातील निवजे, माणगाव येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली व शेतकºयांशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वप्रथम आम्ही शिवसेनेच्यावतीने राज्यपालांकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार प्रथम कोकणातील शेतकरी व मच्छिमार बांधवांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी करण्यासाठी मी आलो आहे. सध्या मराठवाडा दौºयावर असलेले उद्धव ठाकरे लवकरच कोकणात येऊन येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत, असेही ठाकरे यांनी सांगितले.