शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

हत्तींकडून नुकसानी सुरुच

By admin | Updated: December 14, 2014 23:51 IST

माणगाववासीयांमध्ये दहशत : एका रात्रीत ५१ माड जमीनदोस्त

विजय पालकर -माणगाव --कुडाळ तालुक्यातील हत्तींनी पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील नानेली येथे गेले दहा दिवसात लाखो रुपयांचे नुकसान या हत्तींनी केले आहे. हत्तींच्या हल्ल्यात आतापर्यंत २00६ पासून कुडाळातील पाच व्यक्तिंचा मृत्यू झाला असून आठ जणांना गंभीर केले आहे. माणगाव पंचक्रोशीतील सुरु असलेल्या त्रासाला नागरिक पुरते कंटाळले आहेत. मात्र, प्रशासनस्तरावरुन, लोकप्रतिनिधी तसेच वनविभागाकडून हे रोजचेच झाल्याच्या आविर्भावात दुर्लक्ष केले जात आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून हत्तींना प्रशिक्षित करण्याच्या मोहिमेकडे लक्ष पुरवले जातानाच हत्तींपासून ग्रामस्थांचे रक्षण करण्याच्या भूमिकेकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. शनिवारी रात्री माणगावात पुन्हा एकदा हत्तींनी सुमारे ५१ माड जमिनदोस्त करत शेतकऱ्यांना धक्काच दिलेला आहे. त्यामुळे नुकसानीबरोबराच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकला आहे. यासाठी वनविभागाने नागरिकांच्या सुरक्षेलाही प्राधान्य देणे आवश्यक असून यादृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.कुडाळ तालुक्यातील नानेली परिसरात डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासून तीन हत्तींच्या कळपाकडून नुकसानी करण्याचे सत्र सुरु झाले आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. नानेली गणेश मंदिराजवळील जंगलात या हत्तींचे वास्तव्य असून हे हत्ती सायंकाळी वस्तीत येऊन भाताची उडवी, माड बागायतींचे नुकसान करत आहेत. त्यामुळे हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीचा आकडाही वाढत चाललेला आहे. तर नानेलीवासीय हत्तीकडून होणाऱ्या नुकसानीला पाहत राहण्याशिवाय काहीही करु शकत नसल्याने भीतीच्या छायेत दिवस घालवत आहेत.नागरिकांची सुरक्षा महत्त्वाचीगेले काही दिवस माणगाव पंचक्रोशी तीन हत्तींच्या कळपाने पुरती हलवून सोडलेली आहे. वेताळबांबर्डे येथील नुकसानसत्रानंतर ग्रामस्थांनी रास्तारोकोही केला होता. मात्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस काहीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यानंतर हत्ती नानेली परिसरात आणि तेथून पुन्हा माणगावात दाखल झाले आहेत. हत्तींची नुकसानीही हत्तींप्रमाणेच अवाढव्य झालेली असल्यानेच शेतकऱ्यांच्या भावनांचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो. हत्तींचा वस्तीतील वावर हा नागरिकांसाठी धोक्याचीच घंटा असून वनविभागाने नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे अन्यथा आणखी एखादा बळी गेल्यास प्रकरण हाताबाहेर जाण्याचीही शक्यता आहे.हत्तींनी केलेली नुकसानी४ डिसेंबर : घावनळे परिसरातील हत्तींनी नानेली शेळकुंडवाडी येथील दशरथ सावंत यांच्या शेतमांगराकडे जात दरवाजा तोडून भात व नाचणीच्या उडव्यांची व पोत्यांची नुकसानी केली. भाताची उडवी मांगरातून बाहेर काढत पायाखाली तुडवून टाकली. घावनळे परिसरात दोन हत्तीनी गुरुवारी रात्री दोन वाजेपर्यंत दिलीपसिंग भोसले यांचे पाच माड, सुरेश शिवडावकर यांचे पाच माड, शंकर शिवडावकर यांचे तीन माड उन्मळून टाकले. हत्तींनी नार्वेकरवाडी येथील भगवान नार्वेकर यांच्या भाताच्या उडवीचे, बाळा गंगाराम धुरी यांचे दोन माड, सुरेश गंगाराम धुरी यांचे तीन माड मोडून जमिनदोस्त केले.७ डिसेंबर : रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास नानेली येथील शीतल नार्वेकर यांच्या खळ्यातील उडवी उद्ध्वस्त करून घराच्या सभोवतालचे माडही उद्ध्वस्त केले. तसेच नागेश नार्वेकर यांच्याही बागेतील माडांची नुकसानी करत राजाराम मंगेश नार्वेकर यांच्या भाताच्या उडव्यांचा समाचार घेतला. काळोख पडल्यावर हत्तींनी भरवस्तीत घुसून माड बायायतींची नुकसानी केली आहे. त्यामुळे नार्वेकरवाडीतील रहिवाशी भीतीग्रस्त आहेत. त्यानंतरही हत्ती नार्वेकरवाडीच्या परिसरातच धुडगूस घालत होते.९ डिसेंबर : नानेली नार्वेकरवाडीतील गोविंद नारायण नार्वेकर यांच्या बागायतीमध्ये शिरुन माड व केळीच्या झाडांची नासधूस केली.१0 डिसेंबर : नानेली येथील प्रमोद धुरी यांच्या शेतमांगरातील भाताच्या वासाने दरवाजा तोडून आत घुसून भातावर ताव मारला. ११ डिसेंबर : नानेली येथील वाचनालयाचा दरवाजा हत्तींनी तोडून टाकला. वाचनालयाच्या बाजूच्या खोलीतील भात हत्तींनी फस्त केले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली होती. १२ डिसेंबर : माणगाव गंगोत्री परिसरातील शेतकऱ्यांचे सुमारे ५१ माड या हत्तींनी जमिनदोस्त केले आहेत. आनंद सगुण बांदेकर यांच्या घरातील दोन भाताची उडवी दरवाजा फोडून आत घुसून फस्त केल्या आहे. तर त्यांच्या कुंपणातील तेरा माड, वीस केळ्यांची झाडेही पाडली आहेत. मधुसुदन तेली यांचे सात माड, मोहन तेली यांचे चार माड, विष्णू तेली यांचे नऊ माड व पंचवीस केळीची झाडे, सुभाष तेली यांचे आठ माड, अशोक तेली यांचे दोन माड, मोहन तेली यांचे तीन माड तर बाबी तेली यांचे दोन असे तब्बल ५१ माड एका रात्रीत पाडत शेतकऱ्यांना मोठा धक्का दिलेला आहे. शनिवारी एका रात्रीत हत्तींकडून करण्यात आलेले नुकसान पाहून नानेली ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. हत्ती हटाव मोहीम लवकर राबवून या त्रासातून मुक्ती देण्याची मागणी नानेलीवासीयांनी केली आहे. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही या भागात गस्त देण्याची मागणी केली आहे.मोहिमेसाठी निलगिरीझाडांचा शोधमाणगाव पंचक्रोशीत वावरणाऱ्या हत्तींना प्रशिक्षित करण्यासाठी वनविभाग मोहीम राबवित आहे. मात्र, हत्तींना प्रशिक्षण देण्यासाठी तयार कराव्या लागणाऱ्या क्रॉलसाठी २५ फूट उंच निलगिरीच्या सरळ झाडांची आवश्यकता आहे. मात्र, क्रॉलसाठी निलगिरीची झाडे शोधण्याचे काम सध्या सुरु असल्याने हत्तींना बंदीस्त करण्याची योजना बारगळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.