शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
2
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
3
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
4
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
5
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
8
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
9
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
10
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
11
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
12
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
13
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
14
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
15
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
16
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
17
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
18
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
19
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
20
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!

धरणांचा घसा कोरडाच!

By admin | Updated: August 23, 2015 00:40 IST

कोकण विभाग : अनेक धरणांमध्ये ८० टक्क्यांपर्यंत साठा

रत्नागिरी : यावर्षी पाऊस कमी पडल्याने कोकणातील धरणांचा पाणीसाठा खालावला आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. कोकणातील १५८ मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे जलाशयात अद्याप ८० टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात ३ मोठे प्रकल्प आहेत. प्रकल्पाची पाणी साठवणुकीची क्षमता ७३३ दक्षलक्षघनमीटर इतकी असताना केवळ ६१२ दक्षलक्षघनमीटर इतकी आहे. मागील आठवड्यात ५८० (दलघमी) इतका साठा होता. गतवर्षी (२०१४ मध्ये) याचवेळी ६८७ (दलघमी) साठा असल्याने ९४ टक्के तर २०१३ मध्ये ७०४ (दलघमी) साठा असल्याने ९६ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्केने पाणीसाठा घटला आहे. मध्यम प्रकल्प ५ असून पाणीसाठा क्षमता ३८९ (दलघमी) इतकी असताना प्रत्यक्षात पाणीसाठा २९३ (दलघमी) इतके आहे. मागील आठवड्यात २८७ (दलघमी) पाणीसाठा होता त्यामध्ये ६ (दलघमी) ने वाढ झाली असल्यामुळे ७५ इतका पाणीसाठा आहे. २०१४ मध्ये ३२९ (दलघमी) अर्थात ८५ टक्के तर २०१३ मध्ये ३२८ (दलघमी) अर्थात ८४ पाणीसाठा आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत १० टक्के पाण्याची पातळी खालावलेली आहे. लघु प्रकल्प १५० असून, प्रकल्पांतील जलाशयांची पाणीसाठा क्षमता ५४७ (दलघमी) इतकी आहे. मात्र सध्या ४२९ (दलघमी) इतकेच पाणी आहे. गेल्या आठवड्यात ४२० (दलघमी) पाणी होते. पाऊसच कमी झाल्यामुळे जेमतेम ९ (दलघमी) पाणी वाढले आहे. त्यामुळे पाण्याचा साठा ७८ टक्के इतकाच राहिला आहे. गतवर्षी (२०१४) च्या तुलनेत एक (दलघमी) ने पाणीसाठा कमी आहे. परंतु २०१३ मध्ये ४५६ (दलघमी) इतका पाणी साठा होता. त्यामुळे त्यावेळी ८३ टक्के पाणीसाठा असताना यावर्षी पाच टक्केने पाणीसाठा कमी आहे. कोकणात लघु, मध्यम, मोठे प्रकल्प मिळून १५८ जलाशय आहेत. १६६९ (दलघमी) पाणीसाठा क्षमता असताना प्रत्यक्षात १३३४ (दलघमी) पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात १२८७ (दलघमी) पाणीसाठा होता त्यामध्ये ४७ (दलघमी) ने वाढ झाली आहे. त्यामध्ये ८० टक्के जलाशयात साठा झाला आहे. २०१४ मध्ये १४४६ (दलघमी) पाणी असल्याने ८७ टक्के तर २०१३ मध्ये १४८८ (दलघमी) पाणी असल्याने ८९ टक्के पाणीसाठा होता. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत ९ ते ७ टक्केने पाणीसाठा खालावलेला आहे. कोकणात जून-जुलैमध्ये साधारणत: ९०३७.९ मिलीमीटर इतका पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८३८२.९ मिलीमीटर इतका झाला आहे. आॅगस्टमध्ये २५१२.३ मिलीमीटर पडणे अपेक्षित असताना तो १०३०.३ मिलीमीटर इतकाच पडला आहे. पावसाचे प्रमाणच खालावलेले असल्यामुळे जलाशयातील पाण्याची पातळी घटली आहे. सप्टेंबरपासून पाऊस मंदावतो. त्यामुळे अशीच स्थिती कायम राहिली तर जलाशयाची पातळी आणखी खालावण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या भीषण संकटास सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)