शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

धरणांचा घसा कोरडाच!

By admin | Updated: August 23, 2015 00:40 IST

कोकण विभाग : अनेक धरणांमध्ये ८० टक्क्यांपर्यंत साठा

रत्नागिरी : यावर्षी पाऊस कमी पडल्याने कोकणातील धरणांचा पाणीसाठा खालावला आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. कोकणातील १५८ मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे जलाशयात अद्याप ८० टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात ३ मोठे प्रकल्प आहेत. प्रकल्पाची पाणी साठवणुकीची क्षमता ७३३ दक्षलक्षघनमीटर इतकी असताना केवळ ६१२ दक्षलक्षघनमीटर इतकी आहे. मागील आठवड्यात ५८० (दलघमी) इतका साठा होता. गतवर्षी (२०१४ मध्ये) याचवेळी ६८७ (दलघमी) साठा असल्याने ९४ टक्के तर २०१३ मध्ये ७०४ (दलघमी) साठा असल्याने ९६ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्केने पाणीसाठा घटला आहे. मध्यम प्रकल्प ५ असून पाणीसाठा क्षमता ३८९ (दलघमी) इतकी असताना प्रत्यक्षात पाणीसाठा २९३ (दलघमी) इतके आहे. मागील आठवड्यात २८७ (दलघमी) पाणीसाठा होता त्यामध्ये ६ (दलघमी) ने वाढ झाली असल्यामुळे ७५ इतका पाणीसाठा आहे. २०१४ मध्ये ३२९ (दलघमी) अर्थात ८५ टक्के तर २०१३ मध्ये ३२८ (दलघमी) अर्थात ८४ पाणीसाठा आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत १० टक्के पाण्याची पातळी खालावलेली आहे. लघु प्रकल्प १५० असून, प्रकल्पांतील जलाशयांची पाणीसाठा क्षमता ५४७ (दलघमी) इतकी आहे. मात्र सध्या ४२९ (दलघमी) इतकेच पाणी आहे. गेल्या आठवड्यात ४२० (दलघमी) पाणी होते. पाऊसच कमी झाल्यामुळे जेमतेम ९ (दलघमी) पाणी वाढले आहे. त्यामुळे पाण्याचा साठा ७८ टक्के इतकाच राहिला आहे. गतवर्षी (२०१४) च्या तुलनेत एक (दलघमी) ने पाणीसाठा कमी आहे. परंतु २०१३ मध्ये ४५६ (दलघमी) इतका पाणी साठा होता. त्यामुळे त्यावेळी ८३ टक्के पाणीसाठा असताना यावर्षी पाच टक्केने पाणीसाठा कमी आहे. कोकणात लघु, मध्यम, मोठे प्रकल्प मिळून १५८ जलाशय आहेत. १६६९ (दलघमी) पाणीसाठा क्षमता असताना प्रत्यक्षात १३३४ (दलघमी) पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात १२८७ (दलघमी) पाणीसाठा होता त्यामध्ये ४७ (दलघमी) ने वाढ झाली आहे. त्यामध्ये ८० टक्के जलाशयात साठा झाला आहे. २०१४ मध्ये १४४६ (दलघमी) पाणी असल्याने ८७ टक्के तर २०१३ मध्ये १४८८ (दलघमी) पाणी असल्याने ८९ टक्के पाणीसाठा होता. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत ९ ते ७ टक्केने पाणीसाठा खालावलेला आहे. कोकणात जून-जुलैमध्ये साधारणत: ९०३७.९ मिलीमीटर इतका पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८३८२.९ मिलीमीटर इतका झाला आहे. आॅगस्टमध्ये २५१२.३ मिलीमीटर पडणे अपेक्षित असताना तो १०३०.३ मिलीमीटर इतकाच पडला आहे. पावसाचे प्रमाणच खालावलेले असल्यामुळे जलाशयातील पाण्याची पातळी घटली आहे. सप्टेंबरपासून पाऊस मंदावतो. त्यामुळे अशीच स्थिती कायम राहिली तर जलाशयाची पातळी आणखी खालावण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या भीषण संकटास सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)