शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

धरणांचा घसा कोरडाच!

By admin | Updated: August 23, 2015 00:40 IST

कोकण विभाग : अनेक धरणांमध्ये ८० टक्क्यांपर्यंत साठा

रत्नागिरी : यावर्षी पाऊस कमी पडल्याने कोकणातील धरणांचा पाणीसाठा खालावला आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. कोकणातील १५८ मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे जलाशयात अद्याप ८० टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात ३ मोठे प्रकल्प आहेत. प्रकल्पाची पाणी साठवणुकीची क्षमता ७३३ दक्षलक्षघनमीटर इतकी असताना केवळ ६१२ दक्षलक्षघनमीटर इतकी आहे. मागील आठवड्यात ५८० (दलघमी) इतका साठा होता. गतवर्षी (२०१४ मध्ये) याचवेळी ६८७ (दलघमी) साठा असल्याने ९४ टक्के तर २०१३ मध्ये ७०४ (दलघमी) साठा असल्याने ९६ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्केने पाणीसाठा घटला आहे. मध्यम प्रकल्प ५ असून पाणीसाठा क्षमता ३८९ (दलघमी) इतकी असताना प्रत्यक्षात पाणीसाठा २९३ (दलघमी) इतके आहे. मागील आठवड्यात २८७ (दलघमी) पाणीसाठा होता त्यामध्ये ६ (दलघमी) ने वाढ झाली असल्यामुळे ७५ इतका पाणीसाठा आहे. २०१४ मध्ये ३२९ (दलघमी) अर्थात ८५ टक्के तर २०१३ मध्ये ३२८ (दलघमी) अर्थात ८४ पाणीसाठा आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत १० टक्के पाण्याची पातळी खालावलेली आहे. लघु प्रकल्प १५० असून, प्रकल्पांतील जलाशयांची पाणीसाठा क्षमता ५४७ (दलघमी) इतकी आहे. मात्र सध्या ४२९ (दलघमी) इतकेच पाणी आहे. गेल्या आठवड्यात ४२० (दलघमी) पाणी होते. पाऊसच कमी झाल्यामुळे जेमतेम ९ (दलघमी) पाणी वाढले आहे. त्यामुळे पाण्याचा साठा ७८ टक्के इतकाच राहिला आहे. गतवर्षी (२०१४) च्या तुलनेत एक (दलघमी) ने पाणीसाठा कमी आहे. परंतु २०१३ मध्ये ४५६ (दलघमी) इतका पाणी साठा होता. त्यामुळे त्यावेळी ८३ टक्के पाणीसाठा असताना यावर्षी पाच टक्केने पाणीसाठा कमी आहे. कोकणात लघु, मध्यम, मोठे प्रकल्प मिळून १५८ जलाशय आहेत. १६६९ (दलघमी) पाणीसाठा क्षमता असताना प्रत्यक्षात १३३४ (दलघमी) पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात १२८७ (दलघमी) पाणीसाठा होता त्यामध्ये ४७ (दलघमी) ने वाढ झाली आहे. त्यामध्ये ८० टक्के जलाशयात साठा झाला आहे. २०१४ मध्ये १४४६ (दलघमी) पाणी असल्याने ८७ टक्के तर २०१३ मध्ये १४८८ (दलघमी) पाणी असल्याने ८९ टक्के पाणीसाठा होता. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत ९ ते ७ टक्केने पाणीसाठा खालावलेला आहे. कोकणात जून-जुलैमध्ये साधारणत: ९०३७.९ मिलीमीटर इतका पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८३८२.९ मिलीमीटर इतका झाला आहे. आॅगस्टमध्ये २५१२.३ मिलीमीटर पडणे अपेक्षित असताना तो १०३०.३ मिलीमीटर इतकाच पडला आहे. पावसाचे प्रमाणच खालावलेले असल्यामुळे जलाशयातील पाण्याची पातळी घटली आहे. सप्टेंबरपासून पाऊस मंदावतो. त्यामुळे अशीच स्थिती कायम राहिली तर जलाशयाची पातळी आणखी खालावण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या भीषण संकटास सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)