शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

धरणांचा घसा कोरडाच!

By admin | Updated: August 23, 2015 00:40 IST

कोकण विभाग : अनेक धरणांमध्ये ८० टक्क्यांपर्यंत साठा

रत्नागिरी : यावर्षी पाऊस कमी पडल्याने कोकणातील धरणांचा पाणीसाठा खालावला आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. कोकणातील १५८ मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे जलाशयात अद्याप ८० टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात ३ मोठे प्रकल्प आहेत. प्रकल्पाची पाणी साठवणुकीची क्षमता ७३३ दक्षलक्षघनमीटर इतकी असताना केवळ ६१२ दक्षलक्षघनमीटर इतकी आहे. मागील आठवड्यात ५८० (दलघमी) इतका साठा होता. गतवर्षी (२०१४ मध्ये) याचवेळी ६८७ (दलघमी) साठा असल्याने ९४ टक्के तर २०१३ मध्ये ७०४ (दलघमी) साठा असल्याने ९६ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्केने पाणीसाठा घटला आहे. मध्यम प्रकल्प ५ असून पाणीसाठा क्षमता ३८९ (दलघमी) इतकी असताना प्रत्यक्षात पाणीसाठा २९३ (दलघमी) इतके आहे. मागील आठवड्यात २८७ (दलघमी) पाणीसाठा होता त्यामध्ये ६ (दलघमी) ने वाढ झाली असल्यामुळे ७५ इतका पाणीसाठा आहे. २०१४ मध्ये ३२९ (दलघमी) अर्थात ८५ टक्के तर २०१३ मध्ये ३२८ (दलघमी) अर्थात ८४ पाणीसाठा आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत १० टक्के पाण्याची पातळी खालावलेली आहे. लघु प्रकल्प १५० असून, प्रकल्पांतील जलाशयांची पाणीसाठा क्षमता ५४७ (दलघमी) इतकी आहे. मात्र सध्या ४२९ (दलघमी) इतकेच पाणी आहे. गेल्या आठवड्यात ४२० (दलघमी) पाणी होते. पाऊसच कमी झाल्यामुळे जेमतेम ९ (दलघमी) पाणी वाढले आहे. त्यामुळे पाण्याचा साठा ७८ टक्के इतकाच राहिला आहे. गतवर्षी (२०१४) च्या तुलनेत एक (दलघमी) ने पाणीसाठा कमी आहे. परंतु २०१३ मध्ये ४५६ (दलघमी) इतका पाणी साठा होता. त्यामुळे त्यावेळी ८३ टक्के पाणीसाठा असताना यावर्षी पाच टक्केने पाणीसाठा कमी आहे. कोकणात लघु, मध्यम, मोठे प्रकल्प मिळून १५८ जलाशय आहेत. १६६९ (दलघमी) पाणीसाठा क्षमता असताना प्रत्यक्षात १३३४ (दलघमी) पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात १२८७ (दलघमी) पाणीसाठा होता त्यामध्ये ४७ (दलघमी) ने वाढ झाली आहे. त्यामध्ये ८० टक्के जलाशयात साठा झाला आहे. २०१४ मध्ये १४४६ (दलघमी) पाणी असल्याने ८७ टक्के तर २०१३ मध्ये १४८८ (दलघमी) पाणी असल्याने ८९ टक्के पाणीसाठा होता. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत ९ ते ७ टक्केने पाणीसाठा खालावलेला आहे. कोकणात जून-जुलैमध्ये साधारणत: ९०३७.९ मिलीमीटर इतका पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८३८२.९ मिलीमीटर इतका झाला आहे. आॅगस्टमध्ये २५१२.३ मिलीमीटर पडणे अपेक्षित असताना तो १०३०.३ मिलीमीटर इतकाच पडला आहे. पावसाचे प्रमाणच खालावलेले असल्यामुळे जलाशयातील पाण्याची पातळी घटली आहे. सप्टेंबरपासून पाऊस मंदावतो. त्यामुळे अशीच स्थिती कायम राहिली तर जलाशयाची पातळी आणखी खालावण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या भीषण संकटास सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)