शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

धरण दुरुस्ती अधांतरीच!

By admin | Updated: November 16, 2014 23:49 IST

पानवलचे दुर्दैव : तीन वर्षांपूर्वीच पाटबंधारेकडे प्रस्ताव

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला गेल्या ४९ वर्षांपासून गुरुत्वबलाद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या नव्याने उभारणीचा वा दुरुस्तीचा प्रश्न अद्यापही अधांतरीच आहे. सध्या अस्तित्वात असलेले हे धरण खचलेले असून त्याला जमिनतळाशी मोठ्या प्रमाणात गळती आहे. त्यामुळे या धरणाच्या दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे या कामासाठी २०१२ मध्ये पालिकेने १ कोटी ५८ लाख रुपयांचा तयार केलेला प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे पाठविण्यात आला असून त्याबाबत अद्यापही गतीने हालचाली होत नसल्याने धरण दुरुस्तीचा प्रश्न रखडला आहे. आता हाच खर्च अडीच ते तीन कोटीपर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरी शहराला १९६५ पासून हातखंबाजवळ असलेल्या पानवल धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी कॉँक्रीटथर असलेली लोखंडी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या धरणाप्रमाणेच गेल्या दोन दशकांपासून रत्नागिरी शहराला शीळ धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. मात्र शीळ धरणातील पाणी उपसा करून ते रत्नागिरी शहरात पोेहोचविण्यासाठी प्रत्येक महिन्याला १५ ते २० लाख रुपये हे विजेसाठी खर्च करावे लागतात. मात्र पानवल धरणातील पाणी हे गुरुत्वबलाद्वारे शहराला पुरविले जाते. त्यामुळे या पाणीपुरवठ्यासाठी विजेचा खर्च नाही. सध्या या धरणातून शहराला २ ते ३ एमएलडी पुरविले जाते. त्याचबरोबर नाचणे तलावातूनही शहराला अर्धा एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. पानवल धरण व नाचणे तलावाच्या दुरुस्तीची गरज गेल्या काही वर्षांपासून असतानाही ही कामेच झालेली नाहीत. या दोन्ही कामांचा १ कोटी ५८ लाखांचा प्रस्ताव पालिकेने जीवन प्राधिकरणमार्फत पाटबंधारे खात्याकडे पाठविला होता. त्याबाबतच्या कागदपत्रांची पुर्तता अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे या कामाला विलंब झाल्याने आता या दुरुस्ती कामाचे फेरमुल्यांकन करून वाढीव खर्चाचे अंदाजपत्रक द्यावे लागणार आहे. हा वाढीव खर्च आता अडीच ते तीन कोटींवर जाणार आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाचा हा खेळ अजून किती काळ सुरू राहणार असा प्रश्न यानिमित्ताने विचारण्यात येत आहे. (प्रतिनिधी)पानवलला समांतर जलवाहिनी आवश्यकरत्नागिरीनजीकच असलेल्या या पानवल धरणावरून रत्नागिरीकडे येणारी जलवाहिनी ही तब्बल ४९ वर्षांची जुनी असून आता जागोजागी फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या अस्तित्वात असलेल्या जलवाहिनीचा वापर करण्याबरोबरच या जलवाहिनीस दुसरी नवीन समांतर जलवाहिनी उभारणे आवश्यक आहे. त्यासाठीही गेल्या काही वर्षांपासून पालिकेत केवळ चर्चा होत आहे. या जलवाहिनीसाठी सहा कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. पावसाळ्यात अधिक पाणी उचलणे शक्यपानवल धरणाची दुरुस्ती न झाल्यास हे धरण पाण्यातच कोसळण्याची भीतीही आहे. त्यामुळे तातडीने या धरणाची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. ही दुरुस्ती झाल्यास पावसाळ्यात या धरणातून अधिक प्रमाणात पाणी उचलणे शक्य होईल. त्यामुळे शीळ धरणातून कमी पाणी उचलावे लागेल. परिणामी विजेच्या बिलात घट होऊन पालिकेचे पैसे वाचतील, असेही पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले. रत्नागिरी शहराला १९६५ पासून हातखंबाजवळ असलेल्या पानवल धरणातून पाणीपुरवठा.२०१२ मध्ये पालिकेने १ कोटी ५८ लाख रुपयांचा तयार केलेला प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे सादर.अद्यापही गतीने हालचाली होत नसल्याने धरण दुरुस्तीचा प्रश्न रखडला.