शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

धरण दुरुस्ती अधांतरीच!

By admin | Updated: November 16, 2014 23:49 IST

पानवलचे दुर्दैव : तीन वर्षांपूर्वीच पाटबंधारेकडे प्रस्ताव

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला गेल्या ४९ वर्षांपासून गुरुत्वबलाद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या नव्याने उभारणीचा वा दुरुस्तीचा प्रश्न अद्यापही अधांतरीच आहे. सध्या अस्तित्वात असलेले हे धरण खचलेले असून त्याला जमिनतळाशी मोठ्या प्रमाणात गळती आहे. त्यामुळे या धरणाच्या दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे या कामासाठी २०१२ मध्ये पालिकेने १ कोटी ५८ लाख रुपयांचा तयार केलेला प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे पाठविण्यात आला असून त्याबाबत अद्यापही गतीने हालचाली होत नसल्याने धरण दुरुस्तीचा प्रश्न रखडला आहे. आता हाच खर्च अडीच ते तीन कोटीपर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरी शहराला १९६५ पासून हातखंबाजवळ असलेल्या पानवल धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी कॉँक्रीटथर असलेली लोखंडी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या धरणाप्रमाणेच गेल्या दोन दशकांपासून रत्नागिरी शहराला शीळ धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. मात्र शीळ धरणातील पाणी उपसा करून ते रत्नागिरी शहरात पोेहोचविण्यासाठी प्रत्येक महिन्याला १५ ते २० लाख रुपये हे विजेसाठी खर्च करावे लागतात. मात्र पानवल धरणातील पाणी हे गुरुत्वबलाद्वारे शहराला पुरविले जाते. त्यामुळे या पाणीपुरवठ्यासाठी विजेचा खर्च नाही. सध्या या धरणातून शहराला २ ते ३ एमएलडी पुरविले जाते. त्याचबरोबर नाचणे तलावातूनही शहराला अर्धा एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. पानवल धरण व नाचणे तलावाच्या दुरुस्तीची गरज गेल्या काही वर्षांपासून असतानाही ही कामेच झालेली नाहीत. या दोन्ही कामांचा १ कोटी ५८ लाखांचा प्रस्ताव पालिकेने जीवन प्राधिकरणमार्फत पाटबंधारे खात्याकडे पाठविला होता. त्याबाबतच्या कागदपत्रांची पुर्तता अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे या कामाला विलंब झाल्याने आता या दुरुस्ती कामाचे फेरमुल्यांकन करून वाढीव खर्चाचे अंदाजपत्रक द्यावे लागणार आहे. हा वाढीव खर्च आता अडीच ते तीन कोटींवर जाणार आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामाचा हा खेळ अजून किती काळ सुरू राहणार असा प्रश्न यानिमित्ताने विचारण्यात येत आहे. (प्रतिनिधी)पानवलला समांतर जलवाहिनी आवश्यकरत्नागिरीनजीकच असलेल्या या पानवल धरणावरून रत्नागिरीकडे येणारी जलवाहिनी ही तब्बल ४९ वर्षांची जुनी असून आता जागोजागी फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या अस्तित्वात असलेल्या जलवाहिनीचा वापर करण्याबरोबरच या जलवाहिनीस दुसरी नवीन समांतर जलवाहिनी उभारणे आवश्यक आहे. त्यासाठीही गेल्या काही वर्षांपासून पालिकेत केवळ चर्चा होत आहे. या जलवाहिनीसाठी सहा कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. पावसाळ्यात अधिक पाणी उचलणे शक्यपानवल धरणाची दुरुस्ती न झाल्यास हे धरण पाण्यातच कोसळण्याची भीतीही आहे. त्यामुळे तातडीने या धरणाची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. ही दुरुस्ती झाल्यास पावसाळ्यात या धरणातून अधिक प्रमाणात पाणी उचलणे शक्य होईल. त्यामुळे शीळ धरणातून कमी पाणी उचलावे लागेल. परिणामी विजेच्या बिलात घट होऊन पालिकेचे पैसे वाचतील, असेही पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले. रत्नागिरी शहराला १९६५ पासून हातखंबाजवळ असलेल्या पानवल धरणातून पाणीपुरवठा.२०१२ मध्ये पालिकेने १ कोटी ५८ लाख रुपयांचा तयार केलेला प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे सादर.अद्यापही गतीने हालचाली होत नसल्याने धरण दुरुस्तीचा प्रश्न रखडला.