शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानाचा दैनंदिन वापर अत्यावश्यक

By admin | Updated: December 25, 2014 00:06 IST

मुक्ता दाभोलकर : भारतीय संविधानाला प्रमाण मानून कार्य सुरु

राजापूर : विज्ञानाने जगाकडे कसे पाहावे, याची दृष्टी आपल्याला दिली असल्याने त्याचा वापर दैनंदिन जीवनात होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वागण्यात तसा बदल केल्यास खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलन होईल, असा आशावाद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या व नरेंद्र दाभोलकर यांच्या सुकन्या मुक्ता दाभोलकर यांनी पाचल येथे व्यक्त केला.पाचलमध्ये दिवंगत स्वातंत्र्यसैनिक गो. बा. तथा आबा नारकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून अंधश्रद्धा निर्मूलनावर पाचलमधील ग्रामसचिवालयाच्या सभागृहात कार्यशाळा व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.समाज परिवर्तनाच्या चळवळीशी प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. त्यातूनच अंश्रद्धा निर्मूलनासाठी व्यापक समाज परिवर्तन घडवता येईल. त्यामुळे जगाचे निश्चितच कल्याण होईल, असे सांगून मुक्ता दाभोलकर यांनी विज्ञानावर मत मांडले.आपण विज्ञानाची सृष्टी घेतली, पण दृष्टी घेतली नाही. एकीकडे मंगळावर जाण्याची तयारी चालवली जाते, तर दुसरीकडे मंगळ असलेल्या मुलीच्या विवाहात समाजाकडून असलेला विरोध घालवण्यासाठी आपण वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.भारतीय संविधानाला प्रमाण मानून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य सुरु आहे. सर्व जाती धर्मांचा आपण आदर करत आलो आहोत. तथापि धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अघोरी प्रथा व अनिष्ठ रुढी, परंपरा यांना आळा बसावा, यासाठी समितीने लढा उभारताच जादुटोणा कायदा अस्तित्त्वात आला. त्यातूनच वर्षभरात सहा नरबळी टळले, ही डॉ. दाभोलकरांना श्रद्धांजली ठरली आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.या कार्यशाळेदरम्यान सर्पांविषयी वाटणारी भीती कशी अनाठायी आहे. त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. पाचल परिसरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयप्रकाश नारकर होते. या कार्यक्रमाला पाचल गावच्या सरपंच अपेक्षा मासये, स्नेहा नेने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)दाभोलकर म्हणतात..., व्यापक समाज परिवर्तनासाठी अंधश्रध्दा निर्मूलन आवश्यक.विज्ञानाची आपण सृष्टी घेतली, पण दृष्टी घेतली नाही.वागण्यात बदल केल्यास खऱ्या अर्थाने अंधश्रध्दा निर्मूलन होईल.