शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

उत्सुकता अवघ्या राज्याला

By admin | Updated: October 17, 2014 22:54 IST

नाराज राष्ट्रवादी व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते विजयी उमेदवारांसाठी निर्णायक

रजनीकांत कदम - कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. कारण या मतदारसंघातून पुन्हा एकदा काँग्रेसचे राज्याचे प्रचार प्रमुख व ज्येष्ठ नेते नारायण राणे हे रिंगणात असून, या मतदारसंघातील वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे कोणाचे विजयाचे फटाके फुटणार, याची उत्सुकता जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील मतदारांना लागून राहिली आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जवळ जवळ शेवटच्या टप्प्यात आली असून, आता फक्त निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. कुडाळ मतदारसंघातून ६८.५८ टक्के एवढे मतदान झाले आहे. लोकसभेत हेच मतदान ६६ टक्के होते. म्हणजेच दोन टक्क्यांनी यावेळी निवडणुकीत वाढ झाली आहे. या मतदारसंघातून काँग्र्रेसकडून नारायण राणे, शिवसेनेकडून वैभव नाईक, राष्ट्रवादीकडून पुष्पसेन सावंत, भाजपकडून विष्णू मोंडकर, बसपाकडून रवींद्र कसालकर, अपक्ष म्हणून स्नेहा केरकर असे सहा उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. कुडाळ मतदारसंघामध्ये मालवण व कुडाळ हे दोन तालुके येतात. या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या २ लाख ४ हजार ८०४ एवढी आहे. यामध्ये पुरुष १ लाख ७०६, तर महिला उमेदवार १ लाख ४० हजार ९९ मतदार आहेत. या निवडणुकीत येथील १ लाख ४० हजार ४५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ६६ टक्के मतदान झाले होते. या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र लोकसभेपेक्षा दोन टक्क्यांनी अधिक मतदान झाले. या मतदारसंघातून सर्व पक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे या ठिकाणी अपक्ष मिळून सहा उमेदवार असले, तरी या मतदारसंघातील मुख्य लढत ही काँगे्रेसचे नारायण राणे व शिवसेनेचे वैभव नाईक यांच्यातच मुख्यत्वे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुडाळ मतदारसंघातील कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात टाळंबा, आकारीपड, वनसंज्ञा तसेच कुडाळ येथील बंद एमआयडीसी, तसेच प्रकल्पग्रस्त, तर मालवण तालुक्यातील मच्छिमारांचे प्रश्न, सी-वर्ल्ड प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अशा प्रलंबित प्रश्नांवरच मोठ्या प्रमाणात प्रचार झाला असून, सर्व उमेदवारांकडून हे प्रश्न सोडविण्याची आश्वासने येथील मतदारांना देण्यात आली आहेत. याठिकाणी राष्ट्रवादी, भाजपा स्वतंत्र लढत असले, तरी काही नाराज राष्ट्रवादी व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते विजयी उमेदवारांसाठी निर्णायक ठरणार आहेत. या निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी व भाजप पक्षाचा प्रभाव अत्यंत कमी प्रमाणात दिसला. आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना असल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते विजयाच्या जल्लोषासाठी आतापासूनच तयारीला लागले आहेत.