शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

उत्सुकता अवघ्या राज्याला

By admin | Updated: October 17, 2014 22:54 IST

नाराज राष्ट्रवादी व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते विजयी उमेदवारांसाठी निर्णायक

रजनीकांत कदम - कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. कारण या मतदारसंघातून पुन्हा एकदा काँग्रेसचे राज्याचे प्रचार प्रमुख व ज्येष्ठ नेते नारायण राणे हे रिंगणात असून, या मतदारसंघातील वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे कोणाचे विजयाचे फटाके फुटणार, याची उत्सुकता जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील मतदारांना लागून राहिली आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जवळ जवळ शेवटच्या टप्प्यात आली असून, आता फक्त निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. कुडाळ मतदारसंघातून ६८.५८ टक्के एवढे मतदान झाले आहे. लोकसभेत हेच मतदान ६६ टक्के होते. म्हणजेच दोन टक्क्यांनी यावेळी निवडणुकीत वाढ झाली आहे. या मतदारसंघातून काँग्र्रेसकडून नारायण राणे, शिवसेनेकडून वैभव नाईक, राष्ट्रवादीकडून पुष्पसेन सावंत, भाजपकडून विष्णू मोंडकर, बसपाकडून रवींद्र कसालकर, अपक्ष म्हणून स्नेहा केरकर असे सहा उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. कुडाळ मतदारसंघामध्ये मालवण व कुडाळ हे दोन तालुके येतात. या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या २ लाख ४ हजार ८०४ एवढी आहे. यामध्ये पुरुष १ लाख ७०६, तर महिला उमेदवार १ लाख ४० हजार ९९ मतदार आहेत. या निवडणुकीत येथील १ लाख ४० हजार ४५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ६६ टक्के मतदान झाले होते. या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र लोकसभेपेक्षा दोन टक्क्यांनी अधिक मतदान झाले. या मतदारसंघातून सर्व पक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे या ठिकाणी अपक्ष मिळून सहा उमेदवार असले, तरी या मतदारसंघातील मुख्य लढत ही काँगे्रेसचे नारायण राणे व शिवसेनेचे वैभव नाईक यांच्यातच मुख्यत्वे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुडाळ मतदारसंघातील कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात टाळंबा, आकारीपड, वनसंज्ञा तसेच कुडाळ येथील बंद एमआयडीसी, तसेच प्रकल्पग्रस्त, तर मालवण तालुक्यातील मच्छिमारांचे प्रश्न, सी-वर्ल्ड प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अशा प्रलंबित प्रश्नांवरच मोठ्या प्रमाणात प्रचार झाला असून, सर्व उमेदवारांकडून हे प्रश्न सोडविण्याची आश्वासने येथील मतदारांना देण्यात आली आहेत. याठिकाणी राष्ट्रवादी, भाजपा स्वतंत्र लढत असले, तरी काही नाराज राष्ट्रवादी व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते विजयी उमेदवारांसाठी निर्णायक ठरणार आहेत. या निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी व भाजप पक्षाचा प्रभाव अत्यंत कमी प्रमाणात दिसला. आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना असल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते विजयाच्या जल्लोषासाठी आतापासूनच तयारीला लागले आहेत.