शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

उत्सुकता अवघ्या राज्याला

By admin | Updated: October 17, 2014 22:54 IST

नाराज राष्ट्रवादी व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते विजयी उमेदवारांसाठी निर्णायक

रजनीकांत कदम - कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. कारण या मतदारसंघातून पुन्हा एकदा काँग्रेसचे राज्याचे प्रचार प्रमुख व ज्येष्ठ नेते नारायण राणे हे रिंगणात असून, या मतदारसंघातील वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे कोणाचे विजयाचे फटाके फुटणार, याची उत्सुकता जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील मतदारांना लागून राहिली आहे. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जवळ जवळ शेवटच्या टप्प्यात आली असून, आता फक्त निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. कुडाळ मतदारसंघातून ६८.५८ टक्के एवढे मतदान झाले आहे. लोकसभेत हेच मतदान ६६ टक्के होते. म्हणजेच दोन टक्क्यांनी यावेळी निवडणुकीत वाढ झाली आहे. या मतदारसंघातून काँग्र्रेसकडून नारायण राणे, शिवसेनेकडून वैभव नाईक, राष्ट्रवादीकडून पुष्पसेन सावंत, भाजपकडून विष्णू मोंडकर, बसपाकडून रवींद्र कसालकर, अपक्ष म्हणून स्नेहा केरकर असे सहा उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. कुडाळ मतदारसंघामध्ये मालवण व कुडाळ हे दोन तालुके येतात. या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या २ लाख ४ हजार ८०४ एवढी आहे. यामध्ये पुरुष १ लाख ७०६, तर महिला उमेदवार १ लाख ४० हजार ९९ मतदार आहेत. या निवडणुकीत येथील १ लाख ४० हजार ४५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ६६ टक्के मतदान झाले होते. या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र लोकसभेपेक्षा दोन टक्क्यांनी अधिक मतदान झाले. या मतदारसंघातून सर्व पक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे या ठिकाणी अपक्ष मिळून सहा उमेदवार असले, तरी या मतदारसंघातील मुख्य लढत ही काँगे्रेसचे नारायण राणे व शिवसेनेचे वैभव नाईक यांच्यातच मुख्यत्वे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुडाळ मतदारसंघातील कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात टाळंबा, आकारीपड, वनसंज्ञा तसेच कुडाळ येथील बंद एमआयडीसी, तसेच प्रकल्पग्रस्त, तर मालवण तालुक्यातील मच्छिमारांचे प्रश्न, सी-वर्ल्ड प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अशा प्रलंबित प्रश्नांवरच मोठ्या प्रमाणात प्रचार झाला असून, सर्व उमेदवारांकडून हे प्रश्न सोडविण्याची आश्वासने येथील मतदारांना देण्यात आली आहेत. याठिकाणी राष्ट्रवादी, भाजपा स्वतंत्र लढत असले, तरी काही नाराज राष्ट्रवादी व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते विजयी उमेदवारांसाठी निर्णायक ठरणार आहेत. या निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी व भाजप पक्षाचा प्रभाव अत्यंत कमी प्रमाणात दिसला. आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना असल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते विजयाच्या जल्लोषासाठी आतापासूनच तयारीला लागले आहेत.