शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बांद्यात मगरींची दहशत !

By admin | Updated: June 8, 2014 01:13 IST

वनखात्याची असमर्थता : हल्ल्यांच्या संख्येत वाढ

नीलेश मोरजकर - बांदा तेरेखोल नदिपात्रात मगरींच्या संख्येत गेल्या दोन वर्षात लक्षणीय वाढ झाली असून या मगरींची पिल्ले आता भर वस्तीतही येऊ लागल्याने हा चिंतेचा विषय होऊ लागला आहे. गेल्या दोन वर्षात मगरींकडून होणाऱ्या हल्ल्यांत वाढ झाल्याने तेरेखोल नदिकिनाऱ्यालगत असलेल्या गावातील लोकांना या मगरींच्या दहशतीच्या छायेखाली रहावे लागत आहे. तेरेखोल नदिपात्रात मगरींचे वाढते प्रस्थ असूनही वन खाते मात्र कायद्याकडे बोट दाखवून या मगरींच्या बंदोबस्ताबाबत असमर्थतता दाखवत आहे. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना मगरींना पकडण्याचे तंत्र अवगत नसल्याने या मगरींचा वावर मानवी वस्तीत वाढला आहे. आतातर पाळीव प्राण्यांबरोबरच माणसांवरही मगरींकडून हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या दोन वर्षात तब्बल दहा वेळा मगरींकडून हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये जनावरे तसेच स्थानिक शेतकरी जखमी झाले आहेत. मगरींची दहशत गेल्या दोन वर्षात मडुरा, पाडलोस, शेर्ले, कास परिसरात पाळीव गुरे, कुत्रे यांचा मगरींनी फडशा पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. गतवर्षी मडुरा येथे मगरीने शेतकऱ्यावर हल्ला केल्याने शेतकरी गंभीररित्या जखमी झाला होता. मात्र, वनखाते केवळ पंचनामा करण्याचे काम करत असल्याने वनखात्याबाबत स्थानिकांमध्ये प्रचंड रोष आहे. या मगरींची दहशत नदिपात्रात वाढल्याने शेतकऱ्यांना नदितिरालगत शेती करणे देखिल जीवावर बेतणारे ठरत आहे. मगरींची पैदास ही तेरेखोल नदिपात्रात झपाट्याने होत आहे. जानेवारी ते एप्रिल महिना हा मगरींच्या प्रजननाचा काळ असतो. मगर मादी ही एका वेळेला २0 ते २५ पिल्लांना जन्म देते. यामुळे तेरेखोल नदिपात्रात मगरींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तेरेखोल नदिपात्रात ओटवणे, सरमळे, बांदा, शेर्ले, कास, वाफोली, मडुरा, सातोसे पर्यंत मगरींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वनखात्याच्या अंदाजानुसार तेरेखोल नदिपात्रात ५00 च्या वर छोट्या व मोठ्या मगरी आहेत. यातील काही मगरी या १५ फुटाहून अधिक लांबीच्या आहेत. या मगरींचा वावर दिवसाढवळ्या नदिकिनाऱ्यालगत असल्याने घबराटीचे वातावरण आहे. गतवर्षी बांदा शहरासह शेर्ले, वाफोली येथे मगरींची पिल्ले मानवी वस्तीत सापडली होती. पावसाळयात पुराच्या पाण्याबरोबर वाहत आल्याने ही पिल्ले मानवी वस्तीत शिरली. मगरींची पिल्ले मानवी वस्तीत सापडण्याच्या घटना सर्रासपणे घडत असल्याने तेरेखोल नदितील मगरींच्या संख्येत वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.