शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

दुखण्यापेक्षा इलाजच ठरतोय गंभीर

By admin | Updated: April 13, 2017 00:57 IST

सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयात गैरसोयी : मुलभूत सुविधांची उपेक्षा; वीज, पाणी अपुरे; दुर्गंधीच्या विळख्यात शौचालय

रूपेश हिराप ल्ल सावंतवाडी ऐन उन्हाळ्यात येथील उपजिल्हा रूग्णालयातील पंखे धूळ खात असल्याने आपल्या आजारावर उपचार करण्यासाठी आलेल्या रूग्णांना घाम फुटत आहे. शिवाय रूग्णालयात पाण्याअभावी कोंडी होत असून कधीकधी हात धुण्यासाठीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनतो. शौचालयांची अवस्था तर फारच बिकट असून दुर्गंधीचा विळखा या विभागाला कायमच पडला आहे. परिणामी उपचारासाठी आलेल्या रूग्णांना दुखण्यापेक्षा इलाजच गंभीर ठरत आहे. दरम्यान, निम्म्या जिल्ह्यातून दाखल होत असलेल्या रूग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असूनही रूग्णांच्या गैरसोयीकडे रूग्णालय प्रशासनाने सपशेल पाठ फिरविल्याने रूग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा असलेले हे रूग्णालय वेळोवेळी कुठल्या ना कुठल्या समस्येने चर्चेत असते. रूग्णालयातील स्वच्छतेचा विषय, डॉक्टरांचा विषय तसेच अन्य विषयावरून या रूग्णालयात प्रश्न उपस्थित केले जातात. स्वच्छतेच्या बाबतीत वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले असता तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम करून अधिकारी नंतर त्याकडे दुर्लक्ष करतात, ही वस्तुस्थिती आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला असून, दररोज तापमानात वाढ होत आहे. यामुळे उकाड्याने अंगाची लाही लाही होत असताना उपजिल्हा रूग्णालयातील अर्ध्याहून अधिक सिलिंग पंखे नादुरूस्त असल्याने बंद अवस्थेत आहे. त्यामुळे रूग्णांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येबाबत रूग्णालयातील कर्मचारी अथवा अधिकारी यांचे रूग्णांच्या नातेवाईकांनी वेळोवेळी लक्ष वेधले असता त्यांच्याकडून वेगवेगळी उत्तरे दिली जात असल्याने रूग्णांसह नातेवार्इंकांतून संताप व्यक्त होत आहे. शिवाय रूग्णालयातील बाथरूम, बेसीनमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, पाण्याअभावी रूग्णांची हेळसांड होत आहे. दरम्यान, वारंवार उद्भवला जाणारा शौचालयाचा प्रश्न यंदाही गंभीरच आहे. वास्तविक रोगराई पसरण्यास कारणीभूत असणारा हा विभाग असून येथे आवश्यक साफसफाई झालेली गेले वर्षभर पहावयास मिळालेली नाही. पाण्याअभावी ही गैरसोय होत असल्याने या विभागात अत्यावश्यक पाण्याची सोय करण्याची नितांत गरज आहे. साफसफाईच्या बाबतीत पाहिले असता स्वच्छतागृहामध्ये घाणीचे साम्राज्य आहे. बेसीनचे भांडे फुटलेले आहे. याबाबतीत काहीच दुरूस्ती केली जात नाही. बारा महिने दुर्गंधीने त्रस्त असणाऱ्या या विभागात जाताना रूग्णांसह नातेवाईकांना नाक धरूनच आत प्रवेश करावा लागतो, तरीही प्रशासनामार्फत याचे कसलेच गांभीर्य घेतले जात नाही. सद्यस्थितीत रूग्णालयाची पाण्याची अशी कुठलीच व्यवस्था नसल्याने त्यांना नगरपालिका नळयोजनेचाच आधार आहे. पण ऐन उन्हाळ्यात पाण्याची कपात असल्याने आणि पुरेसे पाणी मिळत नसल्याने नळयोजनेचे पाणी रूग्णालयातील दररोजच्या वापरासाठी पुरत नाही. परिणामी रूग्णांना पाण्याअभावी हाल सहन करावे लागत आहेत. रूग्णालय प्रशासनाला याबाबत विचारले असता पाण्याची तक्रार नाही, असे छातीठोकपणे सांगून वेळ मारून नेली जात आहे. पण ज्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना या विभागाचे काम करावे लागते त्यांना मात्र या समस्येला तोंड द्यावे लागते. वैद्यकीय सेवेचा विचार केला तर वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे रूग्णांना हवा तसा उपचार मिळत नाही. सद्यस्थितीत तीनच वैद्यकीय अधिकारी रूग्णालयात आहेत. मुळात अकरा वैद्यकीय अधिकाऱ्यांची मंजुरी या रूग्णालयाला मिळाली आहे. माकडतापाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रूग्ण तपासणीसाठी येत असताना त्यांना चांगली सेवा देताना अधिकाऱ्यांची कसरत होत आहे. त्यामुळे काहीवेळा लोकांच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागत आहे.