शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

‘त्या’ अधिकाºयांवर गुन्हे दाखल होतील- : उपलोकायुक्तांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 20:09 IST

येथील नारायण तलाव भ्रष्टाचाराच्या सुनावणीवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वेंगुर्ले नगरपरिषदेच्या कारभारावर उपलोकायुक्त शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात आर्थिक घोटाळ््यावर कारवाई न करणाºया शासकीय अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असे त्यांनी सांगितले

ठळक मुद्दे वेंगुर्लेतील नारायण तलाव भ्रष्टाचार प्रकरणाची सुनावणी
वेंगुर्ले : येथील नारायण तलाव भ्रष्टाचाराच्या सुनावणीवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वेंगुर्ले नगरपरिषदेच्या कारभारावर उपलोकायुक्त शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात आर्थिक घोटाळ््यावर कारवाई न करणाºया शासकीय अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी १४ जून २०१९ रोजी ठेवली असून, प्रतिवादींनी सुनावणीत समोर आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सादर करावीत, अशी सूचना केली आहे.वेंगुर्ले येथील नारायण तलाव भ्रष्टाचाराची सुनावणी मंगळवारी सकाळी उपलोकायुक्त शर्मा यांच्या दालनात पार पडली. तक्रारदार अतुल हुले सुनावणीला उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यातर्फे आनंद हुले यांनी बाजू मांडली, तर प्रतिवादी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता मनीषा पालांडे, कार्यकारी अभियंता रमेश मठकर तसेच वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव साबळे सुनावणीला उपस्थित होते.नारायण तलाव दुरुस्तीतील घोटाळा कसा दडपला गेला याबाबत तक्रारदारांनी बाजू मांडल्यावर उपलोकायुक्त शर्मा यांनी महाराष्ट्र शासनाच्या भ्रष्टाचाराला पाठिंबा देणाºया प्रवृत्तीवर कडक ताशेरे ओढत सर्व गैरअधिकाºयांना चांगलेच फैलावर घेतले.निकृष्ट काम करणाºया कंत्राटदारावर शासनाने गुन्हा दाखल का केला नाही? संबंधित गैरअधिकाºयांची खातेनिहाय चौकशी पूर्ण का झाली नाही? महाराष्ट्र शासनाचे नुकसान झाले, ते कंत्राटदाराकडून का वसूल करण्यात येत नाही? निकृष्ट काम करणाºया कंत्राटदाराला काळ््या यादीत का टाकले नाही? काम असमाधानकारक असताना वाढीव रकमेची बिले कशी मंजूर करण्यात आली? अशी प्रश्नांची सरबत्ती केली.काय आहे नारायण तलाव भ्रष्टाचार प्रकरण?वेंगुर्ले शहरातील बारमाही पाण्याचे स्रोत असलेला ब्रिटिशकालीन नैसर्गिक तलाव. शेजारील सूर्य मंदिरामुळे या तलावास नारायण तलाव नाव पडले. बांधकामात दगड व चुन्याचा वापर असलेला हा तलाव ब्रिटिशकालीन वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. याठिकाणी जलशुद्धीकरण व वितरण व्यवस्था होती.२००० सालापर्यंत संपूर्ण वेंगुर्ले शहरात गुरुत्वाकर्षणाने बारमाही पाणीपुरवठा होत होता. या तलावाची देखभाल होत नसल्याने तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता व त्यामुळे वेंगुर्लेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत गेला. २००४ मध्ये या तलावातील गाळ काढणे व दुरुस्तीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे हाती घेण्यात आले.बांधकाम करताना योग्य पद्धतीने काम होत नसल्याने तलावाच्या भिंतीची मोडतोड करण्यात आली व ब्रिटिशकालीन तांब्याच्या वॉल्वची चोरी केली. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार अतुल हुले यांनी संबंधित यंत्रणेकडे वारंवार केली होती. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचे काम संबंधित यंत्रणेने केले.
टॅग्स :fraudधोकेबाजीkonkanकोकण