शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘त्या’ अधिकाºयांवर गुन्हे दाखल होतील- : उपलोकायुक्तांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 20:09 IST

येथील नारायण तलाव भ्रष्टाचाराच्या सुनावणीवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वेंगुर्ले नगरपरिषदेच्या कारभारावर उपलोकायुक्त शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात आर्थिक घोटाळ््यावर कारवाई न करणाºया शासकीय अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असे त्यांनी सांगितले

ठळक मुद्दे वेंगुर्लेतील नारायण तलाव भ्रष्टाचार प्रकरणाची सुनावणी
वेंगुर्ले : येथील नारायण तलाव भ्रष्टाचाराच्या सुनावणीवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वेंगुर्ले नगरपरिषदेच्या कारभारावर उपलोकायुक्त शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात आर्थिक घोटाळ््यावर कारवाई न करणाºया शासकीय अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी १४ जून २०१९ रोजी ठेवली असून, प्रतिवादींनी सुनावणीत समोर आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सादर करावीत, अशी सूचना केली आहे.वेंगुर्ले येथील नारायण तलाव भ्रष्टाचाराची सुनावणी मंगळवारी सकाळी उपलोकायुक्त शर्मा यांच्या दालनात पार पडली. तक्रारदार अतुल हुले सुनावणीला उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यातर्फे आनंद हुले यांनी बाजू मांडली, तर प्रतिवादी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता मनीषा पालांडे, कार्यकारी अभियंता रमेश मठकर तसेच वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव साबळे सुनावणीला उपस्थित होते.नारायण तलाव दुरुस्तीतील घोटाळा कसा दडपला गेला याबाबत तक्रारदारांनी बाजू मांडल्यावर उपलोकायुक्त शर्मा यांनी महाराष्ट्र शासनाच्या भ्रष्टाचाराला पाठिंबा देणाºया प्रवृत्तीवर कडक ताशेरे ओढत सर्व गैरअधिकाºयांना चांगलेच फैलावर घेतले.निकृष्ट काम करणाºया कंत्राटदारावर शासनाने गुन्हा दाखल का केला नाही? संबंधित गैरअधिकाºयांची खातेनिहाय चौकशी पूर्ण का झाली नाही? महाराष्ट्र शासनाचे नुकसान झाले, ते कंत्राटदाराकडून का वसूल करण्यात येत नाही? निकृष्ट काम करणाºया कंत्राटदाराला काळ््या यादीत का टाकले नाही? काम असमाधानकारक असताना वाढीव रकमेची बिले कशी मंजूर करण्यात आली? अशी प्रश्नांची सरबत्ती केली.काय आहे नारायण तलाव भ्रष्टाचार प्रकरण?वेंगुर्ले शहरातील बारमाही पाण्याचे स्रोत असलेला ब्रिटिशकालीन नैसर्गिक तलाव. शेजारील सूर्य मंदिरामुळे या तलावास नारायण तलाव नाव पडले. बांधकामात दगड व चुन्याचा वापर असलेला हा तलाव ब्रिटिशकालीन वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. याठिकाणी जलशुद्धीकरण व वितरण व्यवस्था होती.२००० सालापर्यंत संपूर्ण वेंगुर्ले शहरात गुरुत्वाकर्षणाने बारमाही पाणीपुरवठा होत होता. या तलावाची देखभाल होत नसल्याने तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता व त्यामुळे वेंगुर्लेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत गेला. २००४ मध्ये या तलावातील गाळ काढणे व दुरुस्तीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे हाती घेण्यात आले.बांधकाम करताना योग्य पद्धतीने काम होत नसल्याने तलावाच्या भिंतीची मोडतोड करण्यात आली व ब्रिटिशकालीन तांब्याच्या वॉल्वची चोरी केली. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार अतुल हुले यांनी संबंधित यंत्रणेकडे वारंवार केली होती. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचे काम संबंधित यंत्रणेने केले.
टॅग्स :fraudधोकेबाजीkonkanकोकण