शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus Lockdown : नरडवे धरणावरील कामगार निघाले चालत गावी, कणकवली तहसीलदारांनी दिला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 17:48 IST

पावसाळा तोंडावर आल्याने तसेच उपासमार होऊ लागल्याने पुणे व लातूर जिल्ह्यात चालत निघालेल्या कामगारांना करूळ व दाजीपूरच्या चेकपोस्टवरून कणकवली तहसील कार्यालयात आणण्यात आले.

ठळक मुद्देनरडवे धरणावरील कामगार निघाले चालत गावीकणकवली तहसीलदारांनी दिला आधार

कणकवली : पावसाळा तोंडावर आल्याने तसेच उपासमार होऊ लागल्याने पुणे व लातूर जिल्ह्यात चालत निघालेल्या कामगारांना करूळ व दाजीपूरच्या चेकपोस्टवरून कणकवली तहसील कार्यालयात आणण्यात आले.

नरडवे धरण प्रकल्पाचे काम लॉकडाऊनमुळे बंद पडले आहे. त्यातच या प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून कामगारांशी संपर्क बंद झाला. त्यामुळे नरडवे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी तीन ते चारवेळा मोफत जीवनावश्यक साहित्य दिल्याने कशीतरी गुजराण तेथील कामगारांची सुरू होती. कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी या कामगारांच्या तात्पुरत्या निवार्‍याची व जेवणाची व्यवस्था केली. नरडवे धरण ठेकेदार व पाटबंधारे विभागाकडून बेदखल झालेल्या या कामगारांना कणकवली तहसीलदारानी आधार दिला आहे.नरडवे धरण प्रकल्पाच्या कामासाठी नाशिक येथील ठेकेदाराने पुणे जिल्ह्यातील शिरूर, चाकण व लातूर येथील कामगारांना कामासाठी आणले होते. धरण प्रकल्पामध्ये झोपड्या बांधून हे कामगार काम करत होते. दोन्ही जिल्ह्यातील मिळून ३७ महिला, पुरूष व लहान मुले नरडवे धरण प्रकल्पस्थळी राहत होती.

लॉकडाऊननंतर काही दिवस काम झाले, त्यानंतर प्रकल्पाचे काम पूर्ण बंद करण्यात आल्याने या कामगार कुटुंबांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. दोन महिने लॉकडाऊनमध्ये अडकल्यानंतर गावी कसे जायचे? हा प्रश्‍न या कुटुंबासमोर निर्माण झाला होता.दोन दिवसांपूर्वी नरडवे परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस कोसळला होता. त्यात कामगार कुटुंबांच्या झोपड्या कोसळल्या. पावसात भिजतच रात्र या कुटुंबांनी काढली. पावसाळा तोंडावर आल्याने येथे राहण्यापेक्षा गावी गेलेले बरे या विचारातून दोन दिवसांपूर्वी हे कामगार कुटुंबिय चालत निघाले होते. लातूरकडे जाणारे कामगार फोंडाघाटातून दाजीपूरला पोहोचले, तर पुणे जिल्ह्यात जाणारे कामगार पाचलच्या दिशेने निघाले होते.त्यांना चेकपोस्टवर अडविल्यानंतर त्यांची माहिती कणकवली तहसील कार्यालयाला देण्यात आली. त्यानंतर तहसीलदार आर. जे. पवार यांनी दोन मिनिबस पाठवून त्या कामगारांना कणकवली येथे आणले. त्यानंतर या सर्व कामगारांची कणकवली नगरपंचायतीच्या मुडेश्‍वर मैदानजवळील पर्यटन सुविधा केंद्रात व्यवस्था करण्यात आली. इमारतीची तातडीने साफसफाई करून तेथे कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. 

सर्व कुटुंबांना पुढील काही दिवसांसाठी पुरेल एवढे जीवनावश्यक साहित्य तसेच मुलांना खाऊ वितरित करण्यात आल्याचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी सांगितले. दरम्यान, या कामगारांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी आता व्यवस्था करण्यात येणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग