शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

CoronaVirus Lockdown : मुंबईतून आलेले इन्स्टीट्यूशनसाठी अडीच तास ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 16:46 IST

वैभववाडी तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात खोल्याच शिल्लक नसल्यामुळे बुधवारी सायंकाळी उशिरा वैभववाडीत दाखल झालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. त्यांना तब्बल अडीच तास तहसील कार्यालयासमोर ताटकळत रहावे लागले. त्यामुळे संतप्त चाकरमान्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देप्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी क्वारंटाईनसाठी खोल्या नसल्याने चाकरमान्यांचे हाल

वैभववाडी : तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात खोल्याच शिल्लक नसल्यामुळे बुधवारी सायंकाळी उशिरा वैभववाडीत दाखल झालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. त्यांना तब्बल अडीच तास तहसील कार्यालयासमोर ताटकळत रहावे लागले. त्यामुळे संतप्त चाकरमान्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.मुंबईतून दोन खासगी वाहनातून मौदे आणि मांगवली गावातील १७ लोक सायंकाळी वैभववाडीत दाखल झाले. ते सर्व लोक संस्थात्मक क्वारंटाईन करून घेण्यासाठी सांगुळवाडी येथे गेले. परंतु, तेथील अधिकाऱ्यांनी येथे खोल्याच शिल्लक नसल्याचे सांगत त्यांना तहसील कार्यालयात पाठवले. त्यामुळे ते सर्व लोक पाच वाजता तहसील कार्यालयासमोर आले.

या लोकांना ठेवण्यासाठी खोल्याच नसल्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला. लहान मुलांसह हे सर्व लोक तब्बल अडीच तास तहसील कार्यालयासमोर उभे होते. परंतु, त्यांची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे आलेले सर्व लोक नाराज झाले.स्वत:हून संस्थात्मक क्वारंटाईन होण्यासाठी आम्ही आलो. परंतु, प्रशासनाकडून कोणतेच सहकार्य मिळत नाही. पहाटे तीन वाजता आम्ही घरातून निघालो आहोत. आता दिवसभर जेवलेलोसुध्दा नाही. लहान मुले उपाशी आहेत, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान, सायंकाळी उशिरा सांगुळवाडी येथील आधीच्या काही लोकांना अन्यत्र स्थलांतरित करून तेथील सहा खोल्या या लोकांना देण्यात येत असल्याचे सांगितले.परंतु, इतका त्रास का देता? आम्ही तेथे जाऊन आलो. त्याचवेळी आम्हाला तेथे थांबवायचे होते, अशी भूमिका घेत त्यांनी जाण्यास नकार दिला. त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घालून या चाकरमान्यांना सांगुळवाडीतील क्वारंटाईन केंद्रात नेण्यात आले.

विलंब होतोय; पण नियोजन सुरू आहेसांगुळवाडी येथे आलेल्या लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. लोक जास्त प्रमाणात येत असल्यामुळे त्यांची व्यवस्था करायला थोडासा विलंब लागतो. परंतु, आणखी काही इमारतींची व्यवस्था आम्ही करीत आहोत. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. याशिवाय मंगळवारी बैठक घेऊन गावातील सनियंत्रण समित्यांनासुध्दा आवश्यक त्या सूचना केलेल्या आहेत.- रामदास झळके,वैभववाडी तहसीलदार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग