शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

CoronaVirus Lockdown : कॅनिंग व्यावसायिकांकडून १४ रूपयांचा माफक दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 14:12 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देवगड आंबा बागायतदारांनी स्वत:च्या मालाची स्वत:च विक्री करून विक्रीचा एक नवीन पायंडा रचून दलालाच्या विळख्यातून सुटकेचा श्वास घेतला. मात्र असे असताना आंबा कॅनिंग व्यावसायिकांकडून १४ रुपये प्रतिकिलो माफक दराने आंबा खरेदी करून बागायतदारांची पूर्णत: पिळवणूक केली जात आहे.

ठळक मुद्देकॅनिंग व्यावसायिकांकडून १४ रूपयांचा माफक दरकोरोनाची पार्श्वभूमीवर बागायतदारांची पूर्णत: पिळवणूक

अयोध्याप्रसाद गावकर देवगड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देवगड आंबा बागायतदारांनी स्वत:च्या मालाची स्वत:च विक्री करून विक्रीचा एक नवीन पायंडा रचून दलालाच्या विळख्यातून सुटकेचा श्वास घेतला. मात्र असे असताना आंबा कॅनिंग व्यावसायिकांकडून १४ रुपये प्रतिकिलो माफक दराने आंबा खरेदी करून बागायतदारांची पूर्णत: पिळवणूक केली जात आहे.कोरोना विषाणूने देशामध्ये प्रवेश केल्यानंतर २२ मार्चपासून संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. सुरूवातीच्या लॉकडाऊनच्या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये बागायतदारांचे थोड्या फार प्रमाणात नुकसान झाले होते कारण वाशी मार्केट पूर्णत: बंद ठेवण्यात आले होते.

यानंतर राज्यभरातून व परराज्यातून देवगडमधील आंबा बागायतदारांना आंबा खरेदीसाठी थेट ग्राहक संपर्क करून आंब्यांची मागणी होऊ लागली. शेतकरी ते ग्राहक असे एक समीकरण बनले यातून बागायतदारांना दलाली नसल्याने फायदा होऊ लागला.कोरोनाने देवगडमधील आंबा बागायतदारांना स्वत:चा माल स्वत:च विक्री करून स्वावलंबी बनविले. मात्र कॅनिंग व्यावसायिकांकडून १४ रुपये प्रति किलो दराने आंबा खरेदी करून बागायतदारांची पिळवणूक केली जात आहे.

सुरूवातीला १० दिवसांपूर्वी देवगड तालुक्यातील कॅनिंग व्यवसाय सुरू झाला, त्यावेळी २० रुपये प्रति किलो कॅनिंग आंबा घेतला जात होता. कॅनिंगचा आंब्यांवर प्रक्रिया उद्योग करणारे कारखाने व घरगुती उपाय नसल्याचा फायदा घेऊन कॅनिंग कंपन्या बागायतदारांचा आंबा माफक दराने १४ रुपयेप्रमाणे खरेदी करीत आहेत.

लाखो व कोट्यवधी रुपये खर्च करून प्रत्येक तालुक्यामध्ये राज्य कृषी व पंचायत समिती कृषी विभागाची कार्यालये थाटली असताना माफक दरात कॅनिंग घेणाऱ्या कंपन्यांवर का कारवाई होत नाही असा सवाल बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.आंबा कॅनिंगचा दर किमान ३0 रूपये प्रति किलो हवागतवर्षी २८ रुपये प्रति किलोने कॅनिंगचा आंबा याचवेळी घेतला जात होता. हा आंबा पल्प, बर्फी, ज्युस व आंब्यावर बनविले जाणारे पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जातो.१ किलो आंब्यापासून आंबा पल्प बनविला तर तो ज्युस बाजारात प्रति १५० रुपये किलोने विकला जातो. आंब्यावर ज्युस बनविणाऱ्या प्रक्रियेला ४० रुपये प्रति किलो खर्च येतो व वाहतुकीचा खर्च प्रति बॉटलमागे ५ रुपये आहे. यामुळे १४ रुपये किलो आंबा, ४५ रुपये प्रक्रिया व वाहतूक खर्च एकूण निर्मितीमूल्य ५९ रुपये होते.मात्र याच आंब्याची ज्युसची बॉटल १५० रुपये किंमतीने विक्री केली जाते. कॅनिंग कंपनी व प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रति बॉटल ८० रुपये फायदा मिळत आहे. तर उत्पादन घेणारा बागायतदाराच्या हातात मात्र उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी स्थिती होत आहे. किमान ३० रुपये प्रति किलो दराने आंबा कॅनिंग घेण्यात यावी, अशी मागणी बागायतदारांमधून केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग