शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

CoronaVirus Lockdown :रेड झोन मधून येणाऱ्या लोकांना गावात सोडून नका ; प्रांताधिकाऱ्यांशी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 18:01 IST

एकाच वेळी गावागावात येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय झाल्यास वाद निर्माण होतील. तसेच गावात उद्रेक होईल . त्यामुळे प्रशासनाने आताच सावध होऊन योग्य नियोजन करावे. अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने प्रांतधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे केली .

ठळक मुद्देगावात उद्रेक होण्यापूर्वी नियोजन करावे ! भाजपा शिष्टमंडळाने केली प्रांताधिकाऱ्यांशी मागणी

कणकवली : कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. रेड झोन मधून येणाऱ्या लोकांना चुकीच्या पद्धतीने थेट होम क्वारंटाइन केले जात आहे.शाळामध्ये संस्थात्मक क्वारंटाइन करण्याची जी व्यवस्था केली आहे ती पुरेशी नाही. स्थानिक समितींना योग्य त्या सूचना दिलेल्या नाहीत.त्यामुळे एकाच वेळी गावागावात येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय झाल्यास वाद निर्माण होतील. तसेच गावात उद्रेक होईल . त्यामुळे प्रशासनाने आताच सावध होऊन योग्य नियोजन करावे. अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने प्रांतधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे केली .भाजपा शिष्टमंडळाने सोमवारी येथील तहसील कार्यालयात प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली , जिल्हा सचिव जयदेव कदम, कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे,राजन चिके, नासिर काझी,संतोष किंजवडेकर,देवगड नगराध्यक्षा प्रणाली माने,वैभववाडी नगराध्यक्ष अक्षता जैतापकर, पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, सदस्य मनोज रावराणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तहसीलदार आर. जे.पवार,गटविकास अधिकारी मनोज भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ हे प्रमुख अधिकारीही यावेळी उपस्थित होते.यावेळी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये अनेक व्यक्तींवर आरोग्य विभागाकडून होम क्वारंटाइन स्टॅम्प मारले जात नाहीत. रेड झोन मधून आलेले लोक थेट घरी जातात.खारेपाटण चेक नाक्याच्यापलीकडून तिथवली मार्गे लोक येतात. फोंडाघाट चेक पोस्ट ठरलेल्या जागी स्थलांतरीत केले नसल्याने लोक पळवाटा शोधून येत आहेत . दीड महिन्यात फारच अनुभव वाईट आहे. प्रशासन ही स्थिती आटोक्यात आणण्यास अपयशी ठरत आहे.शाळेत क्वारंटाइन केलेले लोक आताच ऐकत नाहीत. जेव्हा आणखीन लोक येतील तेव्हा नियंत्रण ठेवणे कठीण होईल.जिल्हापरिषदेच्या शाळा या सर्व व्यवस्थेसाठी कमी पडतात. शाळेत एक शौचालय, एक नळ,एक फॅन त्यात शेकडो लोकांची कशी व्यवस्था करणार ?त्यापेक्षा संबधित परिसरात व्हॉटल आहेत, ती भाड्याने घ्या आणि व्यवस्था करा.कोणत्याही नेत्यांचा फोन आला की बाहेर गावाहुन आलेल्याना चेक पोस्ट वरून सोडले जात असेल तर तसे करू नका. जेवणाचे डबे पोचविण्याची सोयही चुकीची तसेच धोकादायक आहे .शासन निधी त्यासाठी खर्च करा.अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी ग्रामसमितीवर सर्वच जबाबदारी दिली आहे .ज्या गावात महिला सरपंच आहेत त्यांच्या अडचणी प्रशासनाने समजून घ्याव्यात. आम्हाला जगायचे आहे म्हणून आम्ही बाहेरून आलेल्यांची गावात व्यवस्था करतो आहोत.राजन चिके म्हणाले , प्रत्येक गावात हजारो लोक येतील अशी स्थिती आहे ज्यांची मुंबईत सोय नाही त्यांनाच येथे आणा. तेथे स्थायिक आहेत त्यांना आधी आणू नका.  नगराध्यक्ष माने म्हणाल्या , मुंबईतुन आलेले थेट होम क्वारंटाइन केले जातात. रेड झोन मधून येणाऱ्यांना घरी पाठवणे चुकीचे आहे.जे लोक आमच्या परिसरात येणार त्याची माहिती नगरपंचायतला प्रथम द्या.दिलीप तळेकर म्हणाले , शाळेत क्वारंटाइन केलेले लोक पळून गेले तर काय करावे ? त्यांची रात्रीची जबाबदारी कोण घेणार? संतोष किंजवडेकर म्हणाले , हास्कुलमध्ये लोकांना ठेवण्यास संबधित संस्था तयार नाहीत . तिथे व्यवस्था नसल्याने रोष स्थानिक समितीवर येतो.मग काय करायचे ? नासिर काझी म्हणाले, ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन मधील लोक वेगवेगळे करा. तसेच आम्हाला कळवा की ते कोणत्या झोनमधले आहेत.गावातील बंद घरांना संस्थात्मक क्वारंटाइन करणार !तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रशासन चेकनाक्यावर प्राथमिक तपासणी करूनच पुढे सोडेल. रेड झोन मधून येणाऱ्यांना रेड कागदावर प्रतिज्ञापत्र देण्यात येईल. प्रत्येक तालुक्यात तीन स्तरावर काम केले जाईल.रेड झोन मधील व्यक्ती थेट संस्थात्मक क्वारंटाइन होईल.कोव्हीड टेस्ट सेन्टर, डेडिकेशन सेन्टर निर्माण केले आहेत. सर्व हायस्कुल,महाविद्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार व्यवस्था केली जाणार आहे. ज्या घरात कोणीही राहत नाहीत, त्याच घरात संस्थात्मक क्वारंटाइन करून नागरिकांना ठेवू शकतो . तशा सूचना संबंधितांना दिल्या असल्याचे प्रांतधिकारी वैशाली राजमाने यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग