शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus Lockdown : आचऱ्यातील गर्दी आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 14:37 IST

आचरा : आचरा तिठा ते आचरा बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लॉकडाऊनचा नियम मोडणाऱ्यांवर आचरा पोलिसांनी कारवाई ...

ठळक मुद्देआचऱ्यातील गर्दी आटोक्यातविनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

आचरा : आचरा तिठा ते आचरा बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लॉकडाऊनचा नियम मोडणाऱ्यांवर आचरा पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र, नियम मोडणाऱ्यांवर आचरा पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केल्यावर आचरा तिठा ते आचरा बाजारपेठमध्ये होणाऱ्या गर्दीला लगाम बसला आहे. यामुळे स्थानिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असतानाही दुचाकी घेऊन फिरणाऱ्यांना आचरा पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. गेल्या दोन दिवसांत ४४ जणांवर आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.कोरोनासारख्या महाभयंकर संकटामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सुरुवातीला १४ एप्रिलपर्यंत असणारी संचारबंदी आता ३ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी केली जात आहे. मुंबई बांद्रा येथील घटनेमुळे पोलीस प्रशासनाने कडक धोरण अवलंबिले आहे.शुक्रवारी खरेदी करण्याच्या निमित्ताने आचरा येथे आलेल्या दुचाकी वाहकांच्या कागदपत्रांची पोलिसांनी तपासणी केली. यावेळी अपुरी कागदपत्रे असलेल्या दुचाकी चालकांवर मोटारवाहन अधिनियम कायद्याखाली केसेस दाखल करून सुमारे चार हजार दंड वसूल केला.

याबाबत आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी विनाकारण गरज नसतानाही कोणी फिरत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देत ग्रामस्थांनी घरातच थांबावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग