शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

corona virus : कोरोनाबाबत व्यापक जनजागृतीची गरज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 18:38 IST

कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात कोरोनाची लागण झाली नसूनही अनावश्यक भीतीमुळे अनेकांचा हृदयविकारासारख्या कारणांनी मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात समोर येत आहेत. त्यामुळे असे मृत्यू होवू नयेत यासाठी आरोग्य विभागाला ठोस उपाययोजना करावी लागणार आहे.तसेच कोरोनाबाबत व्यापक जनजागृतीची अजूनही गरज आहे.

ठळक मुद्देकोरोनाबाबत व्यापक जनजागृतीची गरज !नागरिकांच्या मनात अनावश्यक भीती; उपाययोजना आवश्यक

सुधीर राणे कणकवली : कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात कोरोनाची लागण झाली नसूनही अनावश्यक भीतीमुळे अनेकांचा हृदयविकारासारख्या कारणांनी मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात समोर येत आहेत. त्यामुळे असे मृत्यू होवू नयेत यासाठी आरोग्य विभागाला ठोस उपाययोजना करावी लागणार आहे.तसेच कोरोनाबाबत व्यापक जनजागृतीची अजूनही गरज आहे.एखाद्याला साथीचा आजार झाला आणि तो जर रुग्णालय अथवा खासगी दवाखान्यात उपचारांसाठी गेला , तर त्याला प्रथम कोरोनाची चाचणी करण्यास अनेक डॉक्टरांकडून सांगितले जाते. रुग्ण अगोदर त्याला होणाऱ्या त्रासाने बेजार असतो .

अशा अवस्थेत ' कोरोनाची चाचणी करा ' म्हटल्यानंतर तो निम्मा गारद होतो. त्याच्या मनामध्ये चाचणी अहवाल ' पॉझिटिव्ह ' तर येणार नाही ना ? याची भीती असते . अशा भीतीमुळेसुद्धा कोरोना ' निगेटिव्ह ' असणारे रुग्ण ह्रदय विकाराच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.इतर आजारावर उपचार घ्यायचे झाले , तर नागरिकांनी कुठे जायचे ? आणि हे उपचार घेतांना त्यांना कोरोनाची चाचणी करावी लागणार का ? या गोष्टीही आरोग्यविभागाने स्पष्ट करण्याची गरज आहे .पावसाळ्यातील वातावरणामध्ये हवामानात पालट होतो . अनेक नागरिक कामानिमित्त बाहेर जात असल्याने त्यांचे कधी कधी पावसात भिजणे होते . त्यामुळे सर्दी , खोकला आणि ताप यांचा त्रास होतो . कोरोनामध्येही ही लक्षणे असल्यामुळे नागरिकांमध्ये याविषयी भीती आहे . ती दूर करण्यासाठी शास्त्रीय दृष्टकोणातून कोरोनाबाबतची परिपूर्ण माहिती दिली गेली पाहिजे.कोरोनामुळे अन्य साथीचे रोग तसेच हृदयरोग , मधुमेह यांसारख्या अन्य आजारांकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे . सर्दी , ताप , खोकला यांसारखे आजार तसेच डेंग्यू , मलेरिया यांसारख्या आजारांत पावसाळ्यात अधिक भर पडते . या आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णांनी कोणत्या रुग्णालयात अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचे ? याविषयी नागरिक अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट जाणवत आहे .

शासनाने कोरोनासमवेत अन्य आजारांवरील उपचारांसाठी राज्यातील संबंधित शासकीय रुग्णालये तसेच खासगी रुग्णालये यांना सूचना देऊन उपचारांची सोय करावी अन्यथा कोरोनाच्या ऐवजी अन्य साथीच्या आजाराने उपचारांविना रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग