शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोरोनाबाबत व्यापक जनजागृतीची गरज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 18:38 IST

कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात कोरोनाची लागण झाली नसूनही अनावश्यक भीतीमुळे अनेकांचा हृदयविकारासारख्या कारणांनी मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात समोर येत आहेत. त्यामुळे असे मृत्यू होवू नयेत यासाठी आरोग्य विभागाला ठोस उपाययोजना करावी लागणार आहे.तसेच कोरोनाबाबत व्यापक जनजागृतीची अजूनही गरज आहे.

ठळक मुद्देकोरोनाबाबत व्यापक जनजागृतीची गरज !नागरिकांच्या मनात अनावश्यक भीती; उपाययोजना आवश्यक

सुधीर राणे कणकवली : कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात कोरोनाची लागण झाली नसूनही अनावश्यक भीतीमुळे अनेकांचा हृदयविकारासारख्या कारणांनी मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात समोर येत आहेत. त्यामुळे असे मृत्यू होवू नयेत यासाठी आरोग्य विभागाला ठोस उपाययोजना करावी लागणार आहे.तसेच कोरोनाबाबत व्यापक जनजागृतीची अजूनही गरज आहे.एखाद्याला साथीचा आजार झाला आणि तो जर रुग्णालय अथवा खासगी दवाखान्यात उपचारांसाठी गेला , तर त्याला प्रथम कोरोनाची चाचणी करण्यास अनेक डॉक्टरांकडून सांगितले जाते. रुग्ण अगोदर त्याला होणाऱ्या त्रासाने बेजार असतो .

अशा अवस्थेत ' कोरोनाची चाचणी करा ' म्हटल्यानंतर तो निम्मा गारद होतो. त्याच्या मनामध्ये चाचणी अहवाल ' पॉझिटिव्ह ' तर येणार नाही ना ? याची भीती असते . अशा भीतीमुळेसुद्धा कोरोना ' निगेटिव्ह ' असणारे रुग्ण ह्रदय विकाराच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.इतर आजारावर उपचार घ्यायचे झाले , तर नागरिकांनी कुठे जायचे ? आणि हे उपचार घेतांना त्यांना कोरोनाची चाचणी करावी लागणार का ? या गोष्टीही आरोग्यविभागाने स्पष्ट करण्याची गरज आहे .पावसाळ्यातील वातावरणामध्ये हवामानात पालट होतो . अनेक नागरिक कामानिमित्त बाहेर जात असल्याने त्यांचे कधी कधी पावसात भिजणे होते . त्यामुळे सर्दी , खोकला आणि ताप यांचा त्रास होतो . कोरोनामध्येही ही लक्षणे असल्यामुळे नागरिकांमध्ये याविषयी भीती आहे . ती दूर करण्यासाठी शास्त्रीय दृष्टकोणातून कोरोनाबाबतची परिपूर्ण माहिती दिली गेली पाहिजे.कोरोनामुळे अन्य साथीचे रोग तसेच हृदयरोग , मधुमेह यांसारख्या अन्य आजारांकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे . सर्दी , ताप , खोकला यांसारखे आजार तसेच डेंग्यू , मलेरिया यांसारख्या आजारांत पावसाळ्यात अधिक भर पडते . या आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णांनी कोणत्या रुग्णालयात अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचे ? याविषयी नागरिक अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट जाणवत आहे .

शासनाने कोरोनासमवेत अन्य आजारांवरील उपचारांसाठी राज्यातील संबंधित शासकीय रुग्णालये तसेच खासगी रुग्णालये यांना सूचना देऊन उपचारांची सोय करावी अन्यथा कोरोनाच्या ऐवजी अन्य साथीच्या आजाराने उपचारांविना रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग