शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

corona virus : शिष्यवृत्ती परीक्षा ; ६८५० विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 13:37 IST

पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल ७ महिन्यांचा कालावधी होत आला तरी लागलेला नाही. त्यामुळे ही परीक्षा दिलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६८५० विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देइयत्ता ५वी, ८ वी ची शिष्यवृत्ती परीक्षेला कोरोनाचा फटकासिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सुधीर राणे कणकवली : पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल ७ महिन्यांचा कालावधी होत आला तरी लागलेला नाही. त्यामुळे ही परीक्षा दिलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६८५० विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.संपूर्ण राज्यभरातून सुमारे १० लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. हे सर्व विद्यार्थी या परीक्षेचा निकालाकडे डोळे लावून बसले आहेत. या परीक्षेसाठी तयार केलेली उत्तरपत्रिका ओएमआर पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाते. त्यामुळे फारसे मनुष्यबळ उत्तरपत्रिका तपासणीसाठी लागत नाही. मात्र, सात महिन्यांचा कालावधी परीक्षा घेऊन पूर्ण झाला असूनही अजूनही निकाल लागलेला नाही. त्यासाठी कोरोनाचा वाढता संसर्गही कारणीभूत आहे. असे सांगितले जात आहे.राज्यात २२ मार्चपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते. या लॉकडाऊनमध्ये कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम करावे, असे आदेश शासनाने दिले होते. त्याचा फटका शिक्षण विभागाच्या कामकाजाला बसला असून त्याचा परिणाम शिष्यवृत्ती परीक्षा निकालावर झाला आहे.

मात्र, लॉकडाऊन उठविल्याने आतातरी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागेल का ? असा सवाल आता विद्यार्थी व पालकांकडून विचारला जात आहे. या परीक्षेनंतर झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांचा निकाल उशिरा का होईना, लागलेला आहे. मात्र, या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अजून लागलेला नाही.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यापूर्वी ऑगस्ट त्यानंतर सप्टेंबरमध्ये या परीक्षेचा निकाल लागेल, असे जाहीर केले होते. मात्र, तसे झालेले नाही. राज्यभरातून ५ वीतील सुमारे ५ लाख ७४ हजार तर आठवीतील ३ लाख ९७ हजार विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ वीतील २५८८ व ८ वीतील ४२६२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी या निकालासंदर्भात संवाद साधला असता, ऑक्टोबर मध्ये निकाल जाहीर होईल, असे सांगण्यात आले.निकालाकडे लागले डोळे !सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २६२० विद्यार्थी ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील २५८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ३२ विद्यार्थी गैरहजर होते. ५ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला ४३०२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ४२६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ४० विद्यार्थी गैरहजर होते. अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. परीक्षेला बसलेल्या या सर्व विद्यार्थ्यांचे निकालाकडे डोळे लागले आहेत.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीsindhudurgसिंधुदुर्ग