शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

corona virus : ओरोस जिल्हा रुग्णालयात स्वच्छता नसल्याने रुग्णांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 17:43 IST

ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे ७० टक्के रुग्ण बाहेरचे जेवण घेतात. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तींचा रुग्णालयात मुक्त संचार आहे. याखेरीज रुग्णालयात पुरेशी स्वच्छता राखली जात नसल्याने हे जिल्हा रुग्णालय कोरोनाचे प्रसारक झाल्याचा आरोप मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देओरोस जिल्हा रुग्णालयात स्वच्छता नसल्याने रुग्णांची गैरसोयजिल्हा रुग्णालयातील प्रकार, परशुराम उपरकर यांनी केला आरोप

कणकवली : ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे ७० टक्के रुग्ण बाहेरचे जेवण घेतात. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तींचा रुग्णालयात मुक्त संचार आहे. याखेरीज रुग्णालयात पुरेशी स्वच्छता राखली जात नसल्याने हे जिल्हा रुग्णालय कोरोनाचे प्रसारक झाल्याचा आरोप मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून वापरले जात आहे. मात्र, येथे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. ११ सप्टेंबरला तब्बल १० तास पाणी नव्हते.

याखेरीज पूर्वी उपचार घेऊन गेलेल्या रुग्णाच्या चादरी, उशा तशाच ठेवून तेथे आलेल्या दुसऱ्या रुग्णाला ठेवले जाते. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कर्मचाऱ्यांची कोणतीही काळजी घेत नाहीत. रुग्णांचे नातेवाईक, चहा व जेवण देणारे सुरक्षितता न बाळगता कोविड सेंटरमध्ये ये-जा करत आहेत. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका आणखीच वाढत आहे.जिल्हा रुग्णालयातील या गैरसोयीबाबत काही रुग्णांनी आपल्याकडे म्हणणे मांडले आहे. त्यानुसार शुक्रवारी रुग्णालयात तब्बल १० तास पाणी नव्हते. अशा स्थितीत आंघोळ व इतर स्वच्छतेची कामे कशी होणार ? या बाबींमुळे कोरोनाचा संसर्ग आणखीनच वाढत आहे.

कोविड सेंटरमध्ये गरम पाण्याची बाटली १५ रुपयाने घ्यावी लागत आहे. आॅक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या सिलिंडरची वाहतूक परिचारिका व नातेवाईकांना करावी लागत आहे. आॅक्सिजन संपला तर लक्षात येत नाही आणि लक्षात आल्यानंतर पळापळ केली जाते.कॅन्टीनमधील जेवण योग्य नसल्याने ७० टक्के लोक बाहेरच्या खानावळीतून जेवण मागवतात. कॅन्टीन व खानावळीतून जेवण घेऊन येणारे सुरक्षितता न बाळगता वॉर्डात फिरतात. पुन्हा ते आपल्या कॅन्टीनमध्ये जाऊन इतरांनाही नाश्ता देत असल्याने संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. मात्र, वॉर्ड फुल्ल करून ठेवलेला आहे. कोणी बघत नसल्याने नातेवाईक आत जातात. यामुळे संसर्ग वाढत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर