शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : ओरोस जिल्हा रुग्णालयात स्वच्छता नसल्याने रुग्णांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 17:43 IST

ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे ७० टक्के रुग्ण बाहेरचे जेवण घेतात. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तींचा रुग्णालयात मुक्त संचार आहे. याखेरीज रुग्णालयात पुरेशी स्वच्छता राखली जात नसल्याने हे जिल्हा रुग्णालय कोरोनाचे प्रसारक झाल्याचा आरोप मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देओरोस जिल्हा रुग्णालयात स्वच्छता नसल्याने रुग्णांची गैरसोयजिल्हा रुग्णालयातील प्रकार, परशुराम उपरकर यांनी केला आरोप

कणकवली : ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे ७० टक्के रुग्ण बाहेरचे जेवण घेतात. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तींचा रुग्णालयात मुक्त संचार आहे. याखेरीज रुग्णालयात पुरेशी स्वच्छता राखली जात नसल्याने हे जिल्हा रुग्णालय कोरोनाचे प्रसारक झाल्याचा आरोप मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून वापरले जात आहे. मात्र, येथे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. ११ सप्टेंबरला तब्बल १० तास पाणी नव्हते.

याखेरीज पूर्वी उपचार घेऊन गेलेल्या रुग्णाच्या चादरी, उशा तशाच ठेवून तेथे आलेल्या दुसऱ्या रुग्णाला ठेवले जाते. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कर्मचाऱ्यांची कोणतीही काळजी घेत नाहीत. रुग्णांचे नातेवाईक, चहा व जेवण देणारे सुरक्षितता न बाळगता कोविड सेंटरमध्ये ये-जा करत आहेत. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका आणखीच वाढत आहे.जिल्हा रुग्णालयातील या गैरसोयीबाबत काही रुग्णांनी आपल्याकडे म्हणणे मांडले आहे. त्यानुसार शुक्रवारी रुग्णालयात तब्बल १० तास पाणी नव्हते. अशा स्थितीत आंघोळ व इतर स्वच्छतेची कामे कशी होणार ? या बाबींमुळे कोरोनाचा संसर्ग आणखीनच वाढत आहे.

कोविड सेंटरमध्ये गरम पाण्याची बाटली १५ रुपयाने घ्यावी लागत आहे. आॅक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या सिलिंडरची वाहतूक परिचारिका व नातेवाईकांना करावी लागत आहे. आॅक्सिजन संपला तर लक्षात येत नाही आणि लक्षात आल्यानंतर पळापळ केली जाते.कॅन्टीनमधील जेवण योग्य नसल्याने ७० टक्के लोक बाहेरच्या खानावळीतून जेवण मागवतात. कॅन्टीन व खानावळीतून जेवण घेऊन येणारे सुरक्षितता न बाळगता वॉर्डात फिरतात. पुन्हा ते आपल्या कॅन्टीनमध्ये जाऊन इतरांनाही नाश्ता देत असल्याने संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. मात्र, वॉर्ड फुल्ल करून ठेवलेला आहे. कोणी बघत नसल्याने नातेवाईक आत जातात. यामुळे संसर्ग वाढत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर