शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

corona virus : जनतेची काळजी घेण्यास लोकप्रतिनिधी अपयशी, परशुराम उपरकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 13:55 IST

कुडाळ : सिंधुदुर्गात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार, पालकमंत्री जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची ...

ठळक मुद्दे जनतेची काळजी घेण्यास लोकप्रतिनिधी अपयशी, परशुराम उपरकर यांची टीकासत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्र्यांवर टीका

कुडाळ : सिंधुदुर्गात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार, पालकमंत्री जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यास अपयशी ठरले आहेत, असा आरोप मनसे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना साथीच्या सुरुवातीला प्रत्येक तालुक्यात जाऊन कोरोनाबाबत आढावा घेण्यासाठी पालकमंत्री, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींनी बैठका घेतल्या.

त्यावेळी त्यांच्या बातम्या आणि बैठकांचे फोटो सर्वत्र झळकत होते. परंतु या नियोजन बैठकांचा जनतेला व जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणताही लाभ झाला नाही. हे सिंधुदुर्गात सध्या वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिद्ध झाले आहे.गेले सहा महिने सरकार म्हणून सत्ताधारी आमदार-खासदारांना कोरोना साथरोगाचे नियंत्रण करण्यासाठी योग्य नियोजन करता न आल्याने रुग्णांची संख्या वाढली व त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ५५ लोक मृत्युमुखी पडले आहेत. याला जनतेने निवडून दिलेले आमदार, खासदार व पालकमंत्री जबाबदार आहेत.सर्वच लोकप्रतिनिधी मोठमोठ्या घोषणा करतात. त्या बातम्या वृत्तपत्रांतून छापून येतात. ते केवळ दिखाऊपणा करतात. आमदार वैभव नाईक यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदार संघात जात १० व्हेंटिलेटर दिल्याची घोषणा केली. परंतु हे व्हेंटिलेटर आल्यानंतर त्यांना अपुरा कर्मचारीवर्ग देण्याची ते घोषणा करू शकले नाहीत. त्यामुळे हे व्हेंटिलेटर धूळखात पडण्याची भीती आहे. कारण १० वर्षांपूर्वी कणकवली व सावंतवाडी येथे ट्रामाकेअर सेंटर सुरू झाले. पण डॉक्टर व कर्मचारी दिले नसल्याने ते धूळखात पडले आहे.

कुडाळ येथे महिलांसाठी उभारण्यात आलेले रुग्णालय चार महिन्यांत सुरू होणार असे सांगून आमदार नाईक यांनी या रुग्णालयाला १ कोटीचा निधी मिळाल्याची घोषणा केली. त्यानंतर मंत्र्यांकडे जाऊन त्यासाठी निधीची मागणी केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. जर निधी आला असेल तर पुन्हा मागणी करण्याची गरजच काय होती? असा सवालही परशुराम उपरकर यांनी केला आहे.विकास झाल्याचे सांगण्याचा खोटा प्रयत्नपालकमंत्र्यांनी महामार्गबाधितांना दोन दिवसांत पैसे देण्याची घोषणा केली होती. त्याचे काय झाले? आठ दिवसांत महामार्गाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून देणार होते त्याचे काय झाले ? रुग्णालयात कर्मचारी नेमण्याची घोषणा केली होती. त्याचे काय झाले ? विजयदुर्ग किल्ल्याची डागडुजी व स्मारके उभारण्याची घोषणा पालकमंत्री आणि खासदारांनी केली.परंतु शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना वेगवेगळया कामांच्या घोषणा करून जनतेची दिशाभूल करुन वृत्तपत्रातून बातम्या व फोटो प्रसिद्ध करीत जनतेला विकास झाल्याचे सांगण्याचा खोटा प्रयत्न का केला जात आहे? असा परखड सवाल उपरकर यांनी केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग