शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीच्या पर्यटनाला कोरोनाचे ग्रहण, सलग दुसऱ्या वर्षी फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 12:24 IST

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लॉकडाऊन झाले. त्याचप्रमाणे ते आंबोलीतही लागू झाले. त्यामुळे मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांमध्ये आंबोलीतील पर्यटन पूर्णपणे बंद झाले.

ठळक मुद्देगतवर्षी रस्ता खचल्याने हंगाम बारगळलायावर्षी लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

महादेव भिसे आंबोली : कोरोना विषाणूच्या फैलावामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लॉकडाऊन झाले. त्याचप्रमाणे ते आंबोलीतही लागू झाले. त्यामुळे मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांमध्ये आंबोलीतील पर्यटन पूर्णपणे बंद झाले.निदान पावसाळ्यात तरी वर्षा पर्यटनाला प्रशासन मंजुरी देईल, अशी येथील स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना आशा होती. मात्र, कोरोना विषाणूचा फैलाव पाहता ही परवानगी स्थानिक प्रशासनाने नाकारली आहे. त्यामुळे येथील पर्यटन व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे आंबोलीत रविवारपासून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याठिकाणी नियम न पाळणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. आंबोली धबधब्याच्या ठिकाणी आणि प्रवेशद्वारावर पोलीस तैनात करण्यात आले असून धबधब्यावर जाण्यास प्रशासनाकडून आधीच बंदी घालण्यात आली आहे.गतवर्षी अतिवृष्टीमुळे घाटात दरड कोसळून तसेच कोल्हापूर, बेळगाव, पुणे, मुंबई महामार्ग अतिवृष्टीमुळे बंद झाल्याने आंबोलीतील वर्षा पर्यटन झालेच नव्हते. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायाचे गतवर्षी मोठे नुकसान झाले होते. यावर्षीही वर्षा पर्यटन होणार नाही अशी चिन्हे असल्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय चांगलाच अडचणीत आला आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे वर्षा पर्यटनाचे तीन महिने वाया गेले होते. त्यानंतर जेमतेम महिनाभर हिवाळी पर्यटन हंगामाचा व्यवसाय येथील व्यावसायिकांनी केला होता. त्यानंतर लगेचच कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण पर्यटन व्यवसाय बंद करण्यात आला.मे महिना हा येथील प्रमुख पर्यटन हंगामांपैकी एक हंगाम असतो. तोही होऊ शकला नाही. तसेच येत्या काळात वर्षा पर्यटनालासुद्धा प्रशासनाने परवानगी नाकारल्याने येथील पर्यटन व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.गतवर्षी वर्षा पर्यटनाचे तीन महिने अतिवृष्टीमुळे वाया गेले होते तर यावर्षी कोरोनामुळे मार्च, एप्रिल व मे हे तीन महिने येथील व्यवसाय होऊ शकला नाही. तसेच वर्षा पर्यटन हंगामाचे चार महिने असे एकूण नऊ महिने आंबोलीतील पर्यटन व्यवसाय एकही रुपयाची उलाढाल न होता बंद राहणार आहे. त्यामुळे येथील पर्यटन व्यावसायिक हतबल झाले आहेत. त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

येथील बऱ्याच व्यावसायिकांनी लाखो रुपयांची कर्जे घेऊन पर्यटन व्यवसाय सुरू केले आहेत. मोठमोठी हॉटेल्स, ग्रामीण कृषी पर्यटनासाठी विविध उपक्रम सुरू केलेले आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे या सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवल्यामुळे त्यांना एक वेगळीच चिंता सतावू लागली आहे. नऊ महिने व्यवसाय करू शकलो नसल्यामुळे बँका आपल्या व्यवसायावरती जप्ती तर आणणार नाहीत ना? अशी चिंता या व्यावसायिकांना सतावत आहे.२०१९ ते २०२० या वर्षभराच्या कालावधीत येथील पर्यटन व्यावसायिकांना तब्बल नऊ महिने पर्यटन व्यवसायाला मुकावे लागले आहे. बँकांचे हप्ते, लाईट बिल, पाणी बिल कसे भरायचे हा प्रश्न या व्यावसायिकांसमोर आ वासून उभा आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांना येत्या काळात निदान वर्षभर तरी बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये. कर्जांवरील व्याजदर वर्षभरासाठी माफ करावेत, अशी मागणी होत आहे.तसेच व्यावसायिक तत्त्वावर आकारले जाणारे पाणी बिल व लाईट बिल माफ करण्यात यावे अशी मागणीही होत आहे. येथील पर्यटन जरी सुरू झाले तरी ते स्थिरावण्यास बराच काळ लागणार आहे. पर्यटनस्थळांवरील व्यावसायिकांना प्रशासनाने या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आता गरजेचे बनले आहे.विषाणूच्या फैलावाची भीतीवर्षा पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची भीती प्रशासनाला असून त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आंबोलीच्या वर्षा पर्यटन हंगामाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. याबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आदेश दिले आहेत.दिलासा देण्याची मागणीआंबोलीतील पर्यटन व्यावसायिकांनी बँकांची कर्जे काढली आहेत. या बँकांनी तगादा लावू नये. तसेच व्यावसायिक तत्त्वावर आकारल्या जाणाऱ्यां  लाईट बिल, पाणी बिल याबाबत इतर ठिकाणांपेक्षा वेगळे निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी येथील पर्यटन व्यावसायिकांमधून होत आहे.व्यावसायिकांची उपासमारपर्यटन व्यवसायामध्ये बरेच तरुण नवनवीन उपक्रम हाती घेऊन व्यवसाय करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, कोरोनामुळे व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. वडापावच्या गाड्या, चहाच्या टपºया अशा हातावरचे पोट असलेल्या व्यावसायिकांवरही उपासमारीची वेळ आली आहे.बाजारपेठ ओस : व्यावसायिकांचे हालआंबोलीतील प्रमुख व्यवसाय हा पर्यटन असून सध्या येथील बाजारपेठ ओस पडली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता जवळपास १७ ते १८ मोठी हॉटेल्स बंद आहेत. साठच्या आसपास उपहारगृहेही पूर्णपणे बंद आहेत.

 

आंबोलीच्या पर्यटनाचा आर्थिक कणा म्हणून वर्षा पर्यटनाकडे पाहिले जाते. परंतु गतवर्षी अतिवृष्टीमुळे व यावर्षी कोरोना संक्रमणामुळे वर्षा पर्यटन होऊ शकले नाही. त्यामुळे येथील पर्यटन व्यावसायिक अडचणीत आला आहे.- विलास गावडे, उपसरपंच तथा पर्यटन व्यावसायिक,आंबोली

आम्ही लक्षावधी रुपयांची कर्जे काढून व्यवसाय सुरू केले. परंतु गेल्या पावसाळ्यापासून तब्बल नऊ ते दहा महिने व्यवसाय बंद असून शासनाने आम्हांला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जावरील व्याज वर्षभरासाठी माफ करावे.- अनिल नार्वेकर, पर्यटन व्यावसायिक, आंबोली

हातावरचे पोट असलेला आमचा व्यवसाय बंद असल्याने आम्ही मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहोत. प्रशासनाने आमच्यासारख्या व्यावसायिकांसाठी ठोस निर्णय घेऊन आम्हांला दिलासा द्यावा.- रमेश मोहिते,वडापाव विक्रेते

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग