शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

१ जूनपासून नियंत्रण कक्ष

By admin | Updated: May 21, 2015 00:03 IST

गुरूनाथ पेडणेकर : जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा

सिंधुदुर्गनगरी : अत्यावश्यक रुग्णसेवा १०८ अंतर्गत अजून २ रुग्णवाहिकांची (अ‍ॅम्ब्युलन्स) मागणी आरोग्य उपसंचालकांकडे करण्यात आल्याची तर १ जूनपासून जिल्हास्तरावर व तालुक्यात साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करणार असल्याची माहिती आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी बुधवारी सभेत दिली.जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सदस्य प्रमोद कामत, संग्राम प्रभुगावकर, निकिता जाधव, कल्पिता मुंज, भारती चव्हाण, समिती सचिव व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अधिकारी, खातेप्रमुख आदी उपस्थित होते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत अत्यावश्यक रुग्ण सेवा १०८ सेवा देशात सुरु आहे. या योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला ८ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. रुग्णवाहिकांमुळे जिल्ह्यातील अनेक रुग्णांना अत्यावश्यक सेवा मिळाल्याने त्यांचा जीव वाचला आहे. अत्यावश्यक रुग्णसेवा १०८ या सेवेचा जिल्ह्यातील रुग्णांना होणारा फायदा व आवश्यकता पाहता आणखी दोन रुग्णवाहिका जिल्ह्याला मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली असून तसा प्रस्तावही आरोग्य उपसंचालकांकडे सादर करण्यात आला आहे. तसेच पावसाळा जवळ आला असून पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथरोगांवर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याच धर्तीवर कुठल्याही रुग्णाची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर व तालुक्यात १ जूनपासून साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करणार असल्याची माहिती सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी सभेत दिली. वेंगुर्ले तालुक्यातील आडेली प्राथमिक आरोग्यकेंद्र आणि प्राथमिक आरोग्यकेंद्र पणदूर या आरोग्यकेंद्रात करण्यात आलेले लाईट फिटींगचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यासाठी जुने साहित्य वापरले असल्याचा आरोप सभापती पेडणेकर यांनीच सभेत करत संबंधित ठेकेदारांना बिल अदा करू नये व त्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)सदस्यांना किंमत नाही? हिर्लोक प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या सभागृह बांधकामासंदर्भात विषय चर्चेत आला असता सदस्या निकिता जाधव आक्रमक होत संबंधित विषय दोन वर्षे सभागृहात सुरु आहे त्याचे गांभिर्य ओळखून सभागृहाचे बांधकाम एवढ्यात पूर्ण झाले होते असे सांगत सभागृहाच्या बांधकामास एवढा वेळ लावत असल्याने व सदस्यांच्या मुद्यांवर कोणी लक्ष देत नसल्याने सदस्यांना किंमत आहे की नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.