शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

...तर रत्नागिरीतून विधानसभा लढविणार

By admin | Updated: June 30, 2016 23:56 IST

भास्कर जाधव : उदय सामंत यांच्यावर टीकास्त्र; रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा

रत्नागिरी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संधी दिली तर आगामी विधानसभा निवडणूक रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून लढण्याची आपली तयारी आहे, असे विधान करून माजी मंत्री व राष्ट्रवादीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना आमदार उदय सामंत यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले. रत्नागिरीतील माळनाका येथे गुरुवारी झालेल्या तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शिबिरात जाधव बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष शेखर निकम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाप्पा सावंत, नारळ बोर्डाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये, जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी जिल्हाध्यक्ष(पान १ वरून) कुमार शेट्ये, अल्पसंख्याक सेलचे नेते बशीर मुर्तुझा, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष विक्रम जाधव, उपाध्यक्ष अजित यशवंतराव, माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये, जिल्हा परिषदेचे सदस्य बाबू पाटील, तालुकाध्यक्ष सचिन कोतवडेकर, सरचिटणीस प्रभाकर मयेकर, शहराध्यक्ष नीलेश भोसले उपस्थित होते.राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये दोन वेळा आमदार, मंत्री व पालकमंत्री झालेल्या उदय सामंत यांना आणखी काय हवे होते? भाजपमधून तीन वेळा रत्नागिरी विधानसभा निवडणूक लढवून पराभूत झालेल्या बाळ माने यांनी पक्ष सोडला नाही तर निष्ठेने त्यांच्या पक्षाचे काम केले व करीत आहेत. येथे मात्र सर्वकाही मिळूनही पक्ष सोडणाऱ्याबाबत काय आणि किती बोलावे, असा प्रश्न आहे. थापांमुळे फसवणूक झाल्याचे आता त्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांची पक्षात ‘वापसी’ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसला परिस्थिती आता अनुकूल होत आहे. रामभाऊ गराटे, बाबू पाटील यांच्यासारखे अनेक प्रामाणिक कार्यकर्ते राष्ट्रवादीत आहेत. रत्नागिरी तालुकाध्यक्ष सचिन कोतवडेकर व शहराध्यक्ष नीलेश भोसले यांच्या कसोटीचा काळ सुरू झाला आहे. त्यांनी आता घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या मूळ मतदारांना, कार्यकर्त्यांना भेटायला हवे. चूक झाली असेल तर सुधारण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, कार्यकर्ते लाईक फोंडू, सुभाष सावंत, सलमा काझी, जयप्रकाश भालेकर, बाळकृष्ण लवंदे, विकास तोडणकर, नारायण खोराटे, भाई जाधव यांनीही पक्षबांधणीबाबत सूचना केल्या आणि पक्ष कार्यालयाची मागणी केली. (प्रतिनिधी) शिवसेनेची भाजपसमोर शरणागती...सेना-भाजपच्या राजकारणात विविध प्राण्यांचा पूर आला आहे. कोण कोणाला बेडूक म्हणतय तर बोका म्हणतेय. पक्षप्रमुखांना बेडूक म्हणून भाजपने हिणवले गेले तरी सेना गप्प आहे. सेनेने कोणताही आरोप केला की भाजपकडून त्याच्या दुप्पट क्षमतेने प्रत्युत्तर दिले जात आहे. भाजपने मुंबई महापालिकेतील सेनेचा भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. त्यामुळे आत्ताच्या राजकारणात भाजप हा सेनेला वरचढ ठरला आहे. सेनेला जमत नसेल तर सरकारमधून बाहेर पडावे, असे भाजप प्रवक्ता बजावतो तरी सेनेत शांतता आहे. याचाच अर्थ शिवसेना आता बाळासाहेबांची सेना राहिलेली नसून पूर्णत: भाजपला शरण गेल्याचे स्पष्ट होत आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.