शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

संतांची विभागणी करण्याचे षड्यंत्र : सदानंद मोरे

By admin | Updated: January 11, 2015 00:25 IST

शतायू ग्रंथालये व ग्रंथालय अधिवेशन कार्यक्रम

चिपळूण : मराठी साहित्य व भाषा घडविण्यात संतांचा वाटा मोठा आहे. संत साहित्याने जीवनाचे लौकिक व अलौकिक असे भाग पाडले नाहीत. माणसाचं माणूसपण जपण्यासाठी संत साहित्य वाचणे ही काळाची गरज आहे, पण याच संतांना जातीजातीत विभागण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याची खंत ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे यांनी येथे आज, शनिवारी व्यक्त केली. रिकामटेकडे या टीकेवरही त्यांनी जाता-जाता शालजोडीतला टोला हाणला.लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूणतर्फे शतायू ग्रंथालये व ग्रंथालय अधिवेशन कार्यक्रमात संत साहित्याने केलेले समाजप्रबोधन याबाबत प्रा. मिलिंद जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद जाधव यांनी प्रा. मोरे यांचे स्वागत केले.अध्यक्ष समर्थ असेल तर वर्षभर लोक समर्थपणे त्याच्याकडे बघतात. तो एक वैचारिक नेता असतो, असे सांगतानाच प्रा. मोरे यांनी रिकामटेकडेपणाच्या आरोपाचा समाचार घेतला. कुठलीही कला निर्माण होताना रिकामटेकडेपणा लागतो. टेकडे हा शब्द मान्य आहे, असा टोला त्यांनी भालचंद्र नेमाडे यांचे नाव न घेता हाणला.साहित्याच्या मुख्य प्रवाहाची दखल घेण्यास वेळ लागणार आहे. ही एक प्रक्रिया असते. एखादी गोष्ट सर्वच स्वीकारतील, असे होत नाही. साहित्यिक हा वेगवेगळ्या प्रवाहांची तमा न बाळगता वागत असतो. संत साहित्य हा मराठीचा मुख्य गाभा आहे. दैनंदिन जीवनाला माहिती देणारी पुस्तके सध्या जास्त खपतात. अशी उपयुक्त पुस्तके लिहिणे गरजेचे आहे. लोक कविता ऐकायला गर्दी करतात; परंतु पुस्तक खरेदी करत नाहीत. ऐकण व वाचन यात फरक असतो. काव्य संस्कृती वाढली पाहिजे, ती टिकली पाहिजे, असेही ते म्हणाले.मराठी माणसाच्या आशा-आकांक्षा मोठ्या आहेत, याचा विचारही व्हायला हवा. आधुनिक साहित्यांनी व्यवहारात भर टाकली आहे. दलित साहित्यामध्ये वेगळेपणा आहे. यंत्रमानव व मानव यांच्यात भविष्यात युद्ध होईल. यासाठी सावध राहण्याची गरज आहे. साहित्य हे मराठी माणसाला बाजूला करू शकत नाही. मराठी माणसांच्या आशा-आकांक्षा आहेत याचा विचार साहित्यात व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)