शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

संतांची विभागणी करण्याचे षड्यंत्र : सदानंद मोरे

By admin | Updated: January 11, 2015 00:25 IST

शतायू ग्रंथालये व ग्रंथालय अधिवेशन कार्यक्रम

चिपळूण : मराठी साहित्य व भाषा घडविण्यात संतांचा वाटा मोठा आहे. संत साहित्याने जीवनाचे लौकिक व अलौकिक असे भाग पाडले नाहीत. माणसाचं माणूसपण जपण्यासाठी संत साहित्य वाचणे ही काळाची गरज आहे, पण याच संतांना जातीजातीत विभागण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याची खंत ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे यांनी येथे आज, शनिवारी व्यक्त केली. रिकामटेकडे या टीकेवरही त्यांनी जाता-जाता शालजोडीतला टोला हाणला.लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूणतर्फे शतायू ग्रंथालये व ग्रंथालय अधिवेशन कार्यक्रमात संत साहित्याने केलेले समाजप्रबोधन याबाबत प्रा. मिलिंद जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद जाधव यांनी प्रा. मोरे यांचे स्वागत केले.अध्यक्ष समर्थ असेल तर वर्षभर लोक समर्थपणे त्याच्याकडे बघतात. तो एक वैचारिक नेता असतो, असे सांगतानाच प्रा. मोरे यांनी रिकामटेकडेपणाच्या आरोपाचा समाचार घेतला. कुठलीही कला निर्माण होताना रिकामटेकडेपणा लागतो. टेकडे हा शब्द मान्य आहे, असा टोला त्यांनी भालचंद्र नेमाडे यांचे नाव न घेता हाणला.साहित्याच्या मुख्य प्रवाहाची दखल घेण्यास वेळ लागणार आहे. ही एक प्रक्रिया असते. एखादी गोष्ट सर्वच स्वीकारतील, असे होत नाही. साहित्यिक हा वेगवेगळ्या प्रवाहांची तमा न बाळगता वागत असतो. संत साहित्य हा मराठीचा मुख्य गाभा आहे. दैनंदिन जीवनाला माहिती देणारी पुस्तके सध्या जास्त खपतात. अशी उपयुक्त पुस्तके लिहिणे गरजेचे आहे. लोक कविता ऐकायला गर्दी करतात; परंतु पुस्तक खरेदी करत नाहीत. ऐकण व वाचन यात फरक असतो. काव्य संस्कृती वाढली पाहिजे, ती टिकली पाहिजे, असेही ते म्हणाले.मराठी माणसाच्या आशा-आकांक्षा मोठ्या आहेत, याचा विचारही व्हायला हवा. आधुनिक साहित्यांनी व्यवहारात भर टाकली आहे. दलित साहित्यामध्ये वेगळेपणा आहे. यंत्रमानव व मानव यांच्यात भविष्यात युद्ध होईल. यासाठी सावध राहण्याची गरज आहे. साहित्य हे मराठी माणसाला बाजूला करू शकत नाही. मराठी माणसांच्या आशा-आकांक्षा आहेत याचा विचार साहित्यात व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)