शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

रत्नागिरीतील गुन्हेगारीचे लखनौपर्यंत कनेक्शन

By admin | Updated: September 21, 2015 00:08 IST

ठेकेदार खून : मोईनकडून पोलिसांची दिशाभूल

रत्नागिरी : अभिजित पाटणकर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोईन काझी चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने अभिजितचा केलेला खून हा मोबाईल विक्रीच्या व्यवहारातून झाला, की आणखी काही कारणे या खुनामागे होती, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. अभिजितच्या खुनामुळे रत्नागिरीच्या गुन्हेगारीचे लखनौशी असलेले कनेक्शन उघड झाले असले, तरी गुन्हेगारीचे हे ‘नेटवर्क’ उघडे पाडणे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे. ठेकेदार स्वप्निल मोरे यांच्या निर्घृण खुनानंतर अभिजित पाटणकर या ठेकेदार तरुणाचा गोळ्या झाडून खून झाल्याने शांत रत्नागिरीच्या प्रतिमेला काळिमा फासला गेला आहे. हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमधील संघर्षातून झालेला खून असल्याचे पुढे आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेकांकडे परवाना असलेल्या बंदुका, पिस्तूल्स आहेत, परंतु गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांकडे परवाना नसलेली अनेक शस्त्रे असावीत, अशी चर्चा नेहमीच होते. ही शस्त्रे जर असतील तर ती येतात कुठून, कोणाकडून या शस्त्रांचा पुरवठा केला जातो याची खातरजमा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणेकडे काय व्यवस्था आहे, असा सवालही निर्माण झाला आहे.रत्नागिरीच्या काही ठरावीक भागात ‘राडेबाजी’चे प्रकार नेहमीच सुरू असतात. जुगाराचे अड्डेही चर्चेत आहेत. या सर्व प्रकारांना कोणाचे अभय आहे? कोणामुळे ही विषवल्ली पसरत चालली आहे? गेल्या काही वर्षांत रत्नागिरी शहर व परिसरात अफू, गांजा तसेच गर्दसारखे मादक पदार्थही उपलब्ध होत आहेत. वन्य प्राण्यांची चामडी, कासवांची तस्करी, काही दुर्मीळ व महत्त्वाच्या वनस्पतींची चोरी, तस्करी हे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे यामागे गुन्हेगारीचे आंतरराज्य रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. (प्रतिनिधी) रॅकेटची बांधणी?जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे नाव केवळ देशातच नव्हे, तर देशाबाहेरही बहुचर्चित बनले आहे. रायगडच्या औद्योगिकीकरणानंतर आता रत्नागिरीच्या औद्योगिकीकरणाचा वेग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक उद्योग येथे येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे भविष्यातील औद्योगिक रत्नागिरीत आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी काही गुन्हेगारांचे रॅकेट आतापासूनच कार्यरत झाले आहे काय, अशी चर्चाही लखनौ कनेक्शनमुळे सुरू झाली आहे.मोईन व लखनवी माफियामोईनचे लखनवी माफियाशी संबंध आहेत हे पोलिसांनी तपासात उघड केलेले सत्य आहे. त्यामुळे हे गुन्हेगारीचे रत्नागिरी ते लखनौ रॅकेट उखडून काढण्यासाठी रत्नागिरी व लखनौ पोलिसांना संयुक्तपणे प्रयत्न करावे लागणार आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमधील गुुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता ते लोण शांत असलेल्या कोकणात येऊ नये, यासाठी हे रॅकेट उखडून टाकणे महत्त्वाचे ठरणार आहे. ज्या मोईनने अभिजितचा काटा काढला त्याच्याकडे अटक केल्यानंतर चार मोबाईल, २१ सीमकार्ड व अनेक बनावट ओळखपत्र सापडणे ही बाबही गंभीर आहे.