शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील गुन्हेगारीचे लखनौपर्यंत कनेक्शन

By admin | Updated: September 21, 2015 00:08 IST

ठेकेदार खून : मोईनकडून पोलिसांची दिशाभूल

रत्नागिरी : अभिजित पाटणकर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोईन काझी चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने अभिजितचा केलेला खून हा मोबाईल विक्रीच्या व्यवहारातून झाला, की आणखी काही कारणे या खुनामागे होती, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. अभिजितच्या खुनामुळे रत्नागिरीच्या गुन्हेगारीचे लखनौशी असलेले कनेक्शन उघड झाले असले, तरी गुन्हेगारीचे हे ‘नेटवर्क’ उघडे पाडणे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे. ठेकेदार स्वप्निल मोरे यांच्या निर्घृण खुनानंतर अभिजित पाटणकर या ठेकेदार तरुणाचा गोळ्या झाडून खून झाल्याने शांत रत्नागिरीच्या प्रतिमेला काळिमा फासला गेला आहे. हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमधील संघर्षातून झालेला खून असल्याचे पुढे आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेकांकडे परवाना असलेल्या बंदुका, पिस्तूल्स आहेत, परंतु गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांकडे परवाना नसलेली अनेक शस्त्रे असावीत, अशी चर्चा नेहमीच होते. ही शस्त्रे जर असतील तर ती येतात कुठून, कोणाकडून या शस्त्रांचा पुरवठा केला जातो याची खातरजमा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणेकडे काय व्यवस्था आहे, असा सवालही निर्माण झाला आहे.रत्नागिरीच्या काही ठरावीक भागात ‘राडेबाजी’चे प्रकार नेहमीच सुरू असतात. जुगाराचे अड्डेही चर्चेत आहेत. या सर्व प्रकारांना कोणाचे अभय आहे? कोणामुळे ही विषवल्ली पसरत चालली आहे? गेल्या काही वर्षांत रत्नागिरी शहर व परिसरात अफू, गांजा तसेच गर्दसारखे मादक पदार्थही उपलब्ध होत आहेत. वन्य प्राण्यांची चामडी, कासवांची तस्करी, काही दुर्मीळ व महत्त्वाच्या वनस्पतींची चोरी, तस्करी हे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे यामागे गुन्हेगारीचे आंतरराज्य रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. (प्रतिनिधी) रॅकेटची बांधणी?जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे नाव केवळ देशातच नव्हे, तर देशाबाहेरही बहुचर्चित बनले आहे. रायगडच्या औद्योगिकीकरणानंतर आता रत्नागिरीच्या औद्योगिकीकरणाचा वेग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक उद्योग येथे येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे भविष्यातील औद्योगिक रत्नागिरीत आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी काही गुन्हेगारांचे रॅकेट आतापासूनच कार्यरत झाले आहे काय, अशी चर्चाही लखनौ कनेक्शनमुळे सुरू झाली आहे.मोईन व लखनवी माफियामोईनचे लखनवी माफियाशी संबंध आहेत हे पोलिसांनी तपासात उघड केलेले सत्य आहे. त्यामुळे हे गुन्हेगारीचे रत्नागिरी ते लखनौ रॅकेट उखडून काढण्यासाठी रत्नागिरी व लखनौ पोलिसांना संयुक्तपणे प्रयत्न करावे लागणार आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमधील गुुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता ते लोण शांत असलेल्या कोकणात येऊ नये, यासाठी हे रॅकेट उखडून टाकणे महत्त्वाचे ठरणार आहे. ज्या मोईनने अभिजितचा काटा काढला त्याच्याकडे अटक केल्यानंतर चार मोबाईल, २१ सीमकार्ड व अनेक बनावट ओळखपत्र सापडणे ही बाबही गंभीर आहे.