शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
3
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
4
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
5
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
6
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
7
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
8
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
9
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
10
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
11
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
12
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
13
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
14
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
15
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
16
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
17
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
18
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
19
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
20
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक

५६ वर्षाच्या काळात ४५ वर्षे काँग्रेसचे वर्चस्व

By admin | Updated: October 10, 2015 23:50 IST

राष्ट्रवादी आणि सेनेलाही अल्प संधी : भाजप खाते खोलण्याच्या आशेवर

वैभव साळकर, दोडामार्ग : तालुका ठिकाणच्या ग्रामपंचायतींना दर्जा मिळाल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या कसई दोडामार्ग नगरपंचायतीची निवडणूक प्रथमच होत आहे. त्यामुळे या पहिल्या-वहिल्या निवडणुकीला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्यापूर्वी सन १९५९ ते आजमितीपर्यंतच्या ५६ वर्षाच्या इतिहासात ग्रामपंचायतीवर काँग्रेस, जनता दल व शिवसेना अशा केवळ तीनच पक्षांना सत्ता मिळविण्यात यश आले आहे. मात्र, त्यातील तब्बल ४५ वर्षे ही ग्रामपंयायत स्थापन झाल्यानंतर पहिले सरपंचपद आणि बरखास्तीवेळी शेवटचे सरपंचपही काँग्रेसनेच भुषविले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेला येथील सत्तेचा अनुभव आहे. मात्र या सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपला यंदा सत्ता मिळविण्याची आशा लागून आहे. यामुळे पहिल्या नगरपंचायतीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा तिरंगा फडकतो की सेना-भाजपचा भगवा याकडे संपूर्ण जिल्ह्यासह कोकणचे लक्ष लागून राहिले आहे. सन १९५९ ते १९७३ पर्यंत म्हणजेच सुरूवातीची १५ वर्षे ग्रामपंचायत काँगे्रसच्या हातात राहिली. सलग पंधरा वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार हाताळणाऱ्या काँग्रेसला जनता दलाने दूर केले आणि कसई दोडामार्ग सारख्या ग्रामीण भागात सूर्यकांत परमेकर यांच्या रूपाने जनता दलाने नेतृत्व उभारणीस सुरूवात केली. त्यावेळी कसई दोडामार्गचे पाचवे सरपंचपद भूषविण्याचा मान सूर्यकांत परमेकर यांना मिळाला. २९ मे १९७८ ते २२ एप्रिल १९८४ पर्यंत ते सरपंच पदावर राहिले. त्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसने मुसंडी मारली. ज्ञानेश्वर रामराव गावकर यांनी सहावे सरपंच म्हणून कामगिरी सांभाळत २३ एप्रिल १९८४ ते ३० डिसेंबर १९९२ अशी सलग आठ वर्षे सगळ्यात जास्त काळ सरपंचदावर राहण्याचा मान मिळविला. त्यानंतर आनंद दत्ताराम तांबुळकर यांनी ३१ डिसेंबर १९९२ ते ३० डिसेंबर १९९७ या काळात सातवे सरपंच म्हणून पदभार सांभाळला. त्यानंतर पुन्हा एकदा तेरा वर्षाच्या प्रदीर्घ तपश्चर्येनंतर जनता दलाने उर्मिला उल्हास साळकर यांनी सरपंचपदी विराजमान करून पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. त्यांनी ३० डिसेंबर १९९७ ते ०२ मे २००० पर्यंत सरपंचपद भुषविले. सन २००० च्या मे मध्ये झालेल्या एका वादग्रस्त आंदोलनामुळे त्यांना सरपंचदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे जनता दलाची सत्ता संपुष्टात आली. नववे सरपंच पांडुरंग बोर्डेकर यांच्यारूपाने कसई दोडामार्ग ग्रामपंचायतीवर प्रथमच शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते शिवसेनेसाठी सक्रीय झाले. त्याचीच परिणीती सत्ता स्थापन करण्यात झाली. ३ मे २००० ते ८ जून २००१ असा कार्यकाळ बोर्डेकर यांचा राहिला. त्यानंतर दहावे सरपंचपद प्रतिभा नाईक (१९ जून २००१ ते २९ डिसेंंबर २००२), अकरावे सरपंचपद यशवंत बागकर (३० डिसेंंबर २००२ ते २९ डिसेंंबर २००७) यांनी भूषविले. त्यावेळी ग्रामपंचायतीची १२ वी निवडणूक लागली. त्यावेळी कोणत्याही पक्षाला स्थान न देता गावविकास आघाडी करून निवडणूक लढविण्यात आली आणि गावविकास आघाडीचे पॅनल विजयी झाले. यावेळी राजेश शशिकांत प्रसादी यांना १२ व्या सरपंचपदी निवडण्यात आले. ३० डिसेंबर २००७ ते १ फेब्रुवारी २०११ अशी चार वर्षे ते सरपंचपदावर राहिले. याच काळात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आपसूकच पुन्हा एकदा सत्ता काँग्रेसकडे आली. त्यानंतर १३ वे सरपंच म्हणून सुरेश दादू तुळसकर (०२/०२/२०११ ते १०/०४/ २०११) दोन महिने, तर १४ वे सरपंच म्हणून प्रदिप चांदेलकर (११/४/२०११ ते २९/१२/२९१२) पावणे दोन वर्षापेक्षा अधिक काळ सरपंच पदाचा कार्यभार सांभाळला.