शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

५६ वर्षाच्या काळात ४५ वर्षे काँग्रेसचे वर्चस्व

By admin | Updated: October 10, 2015 23:50 IST

राष्ट्रवादी आणि सेनेलाही अल्प संधी : भाजप खाते खोलण्याच्या आशेवर

वैभव साळकर, दोडामार्ग : तालुका ठिकाणच्या ग्रामपंचायतींना दर्जा मिळाल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या कसई दोडामार्ग नगरपंचायतीची निवडणूक प्रथमच होत आहे. त्यामुळे या पहिल्या-वहिल्या निवडणुकीला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्यापूर्वी सन १९५९ ते आजमितीपर्यंतच्या ५६ वर्षाच्या इतिहासात ग्रामपंचायतीवर काँग्रेस, जनता दल व शिवसेना अशा केवळ तीनच पक्षांना सत्ता मिळविण्यात यश आले आहे. मात्र, त्यातील तब्बल ४५ वर्षे ही ग्रामपंयायत स्थापन झाल्यानंतर पहिले सरपंचपद आणि बरखास्तीवेळी शेवटचे सरपंचपही काँग्रेसनेच भुषविले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेला येथील सत्तेचा अनुभव आहे. मात्र या सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपला यंदा सत्ता मिळविण्याची आशा लागून आहे. यामुळे पहिल्या नगरपंचायतीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा तिरंगा फडकतो की सेना-भाजपचा भगवा याकडे संपूर्ण जिल्ह्यासह कोकणचे लक्ष लागून राहिले आहे. सन १९५९ ते १९७३ पर्यंत म्हणजेच सुरूवातीची १५ वर्षे ग्रामपंचायत काँगे्रसच्या हातात राहिली. सलग पंधरा वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार हाताळणाऱ्या काँग्रेसला जनता दलाने दूर केले आणि कसई दोडामार्ग सारख्या ग्रामीण भागात सूर्यकांत परमेकर यांच्या रूपाने जनता दलाने नेतृत्व उभारणीस सुरूवात केली. त्यावेळी कसई दोडामार्गचे पाचवे सरपंचपद भूषविण्याचा मान सूर्यकांत परमेकर यांना मिळाला. २९ मे १९७८ ते २२ एप्रिल १९८४ पर्यंत ते सरपंच पदावर राहिले. त्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसने मुसंडी मारली. ज्ञानेश्वर रामराव गावकर यांनी सहावे सरपंच म्हणून कामगिरी सांभाळत २३ एप्रिल १९८४ ते ३० डिसेंबर १९९२ अशी सलग आठ वर्षे सगळ्यात जास्त काळ सरपंचदावर राहण्याचा मान मिळविला. त्यानंतर आनंद दत्ताराम तांबुळकर यांनी ३१ डिसेंबर १९९२ ते ३० डिसेंबर १९९७ या काळात सातवे सरपंच म्हणून पदभार सांभाळला. त्यानंतर पुन्हा एकदा तेरा वर्षाच्या प्रदीर्घ तपश्चर्येनंतर जनता दलाने उर्मिला उल्हास साळकर यांनी सरपंचपदी विराजमान करून पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. त्यांनी ३० डिसेंबर १९९७ ते ०२ मे २००० पर्यंत सरपंचपद भुषविले. सन २००० च्या मे मध्ये झालेल्या एका वादग्रस्त आंदोलनामुळे त्यांना सरपंचदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे जनता दलाची सत्ता संपुष्टात आली. नववे सरपंच पांडुरंग बोर्डेकर यांच्यारूपाने कसई दोडामार्ग ग्रामपंचायतीवर प्रथमच शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते शिवसेनेसाठी सक्रीय झाले. त्याचीच परिणीती सत्ता स्थापन करण्यात झाली. ३ मे २००० ते ८ जून २००१ असा कार्यकाळ बोर्डेकर यांचा राहिला. त्यानंतर दहावे सरपंचपद प्रतिभा नाईक (१९ जून २००१ ते २९ डिसेंंबर २००२), अकरावे सरपंचपद यशवंत बागकर (३० डिसेंंबर २००२ ते २९ डिसेंंबर २००७) यांनी भूषविले. त्यावेळी ग्रामपंचायतीची १२ वी निवडणूक लागली. त्यावेळी कोणत्याही पक्षाला स्थान न देता गावविकास आघाडी करून निवडणूक लढविण्यात आली आणि गावविकास आघाडीचे पॅनल विजयी झाले. यावेळी राजेश शशिकांत प्रसादी यांना १२ व्या सरपंचपदी निवडण्यात आले. ३० डिसेंबर २००७ ते १ फेब्रुवारी २०११ अशी चार वर्षे ते सरपंचपदावर राहिले. याच काळात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आपसूकच पुन्हा एकदा सत्ता काँग्रेसकडे आली. त्यानंतर १३ वे सरपंच म्हणून सुरेश दादू तुळसकर (०२/०२/२०११ ते १०/०४/ २०११) दोन महिने, तर १४ वे सरपंच म्हणून प्रदिप चांदेलकर (११/४/२०११ ते २९/१२/२९१२) पावणे दोन वर्षापेक्षा अधिक काळ सरपंच पदाचा कार्यभार सांभाळला.