शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

५६ वर्षाच्या काळात ४५ वर्षे काँग्रेसचे वर्चस्व

By admin | Updated: October 10, 2015 23:50 IST

राष्ट्रवादी आणि सेनेलाही अल्प संधी : भाजप खाते खोलण्याच्या आशेवर

वैभव साळकर, दोडामार्ग : तालुका ठिकाणच्या ग्रामपंचायतींना दर्जा मिळाल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या कसई दोडामार्ग नगरपंचायतीची निवडणूक प्रथमच होत आहे. त्यामुळे या पहिल्या-वहिल्या निवडणुकीला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्यापूर्वी सन १९५९ ते आजमितीपर्यंतच्या ५६ वर्षाच्या इतिहासात ग्रामपंचायतीवर काँग्रेस, जनता दल व शिवसेना अशा केवळ तीनच पक्षांना सत्ता मिळविण्यात यश आले आहे. मात्र, त्यातील तब्बल ४५ वर्षे ही ग्रामपंयायत स्थापन झाल्यानंतर पहिले सरपंचपद आणि बरखास्तीवेळी शेवटचे सरपंचपही काँग्रेसनेच भुषविले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेला येथील सत्तेचा अनुभव आहे. मात्र या सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपला यंदा सत्ता मिळविण्याची आशा लागून आहे. यामुळे पहिल्या नगरपंचायतीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा तिरंगा फडकतो की सेना-भाजपचा भगवा याकडे संपूर्ण जिल्ह्यासह कोकणचे लक्ष लागून राहिले आहे. सन १९५९ ते १९७३ पर्यंत म्हणजेच सुरूवातीची १५ वर्षे ग्रामपंचायत काँगे्रसच्या हातात राहिली. सलग पंधरा वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार हाताळणाऱ्या काँग्रेसला जनता दलाने दूर केले आणि कसई दोडामार्ग सारख्या ग्रामीण भागात सूर्यकांत परमेकर यांच्या रूपाने जनता दलाने नेतृत्व उभारणीस सुरूवात केली. त्यावेळी कसई दोडामार्गचे पाचवे सरपंचपद भूषविण्याचा मान सूर्यकांत परमेकर यांना मिळाला. २९ मे १९७८ ते २२ एप्रिल १९८४ पर्यंत ते सरपंच पदावर राहिले. त्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसने मुसंडी मारली. ज्ञानेश्वर रामराव गावकर यांनी सहावे सरपंच म्हणून कामगिरी सांभाळत २३ एप्रिल १९८४ ते ३० डिसेंबर १९९२ अशी सलग आठ वर्षे सगळ्यात जास्त काळ सरपंचदावर राहण्याचा मान मिळविला. त्यानंतर आनंद दत्ताराम तांबुळकर यांनी ३१ डिसेंबर १९९२ ते ३० डिसेंबर १९९७ या काळात सातवे सरपंच म्हणून पदभार सांभाळला. त्यानंतर पुन्हा एकदा तेरा वर्षाच्या प्रदीर्घ तपश्चर्येनंतर जनता दलाने उर्मिला उल्हास साळकर यांनी सरपंचपदी विराजमान करून पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. त्यांनी ३० डिसेंबर १९९७ ते ०२ मे २००० पर्यंत सरपंचपद भुषविले. सन २००० च्या मे मध्ये झालेल्या एका वादग्रस्त आंदोलनामुळे त्यांना सरपंचदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे जनता दलाची सत्ता संपुष्टात आली. नववे सरपंच पांडुरंग बोर्डेकर यांच्यारूपाने कसई दोडामार्ग ग्रामपंचायतीवर प्रथमच शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते शिवसेनेसाठी सक्रीय झाले. त्याचीच परिणीती सत्ता स्थापन करण्यात झाली. ३ मे २००० ते ८ जून २००१ असा कार्यकाळ बोर्डेकर यांचा राहिला. त्यानंतर दहावे सरपंचपद प्रतिभा नाईक (१९ जून २००१ ते २९ डिसेंंबर २००२), अकरावे सरपंचपद यशवंत बागकर (३० डिसेंंबर २००२ ते २९ डिसेंंबर २००७) यांनी भूषविले. त्यावेळी ग्रामपंचायतीची १२ वी निवडणूक लागली. त्यावेळी कोणत्याही पक्षाला स्थान न देता गावविकास आघाडी करून निवडणूक लढविण्यात आली आणि गावविकास आघाडीचे पॅनल विजयी झाले. यावेळी राजेश शशिकांत प्रसादी यांना १२ व्या सरपंचपदी निवडण्यात आले. ३० डिसेंबर २००७ ते १ फेब्रुवारी २०११ अशी चार वर्षे ते सरपंचपदावर राहिले. याच काळात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आपसूकच पुन्हा एकदा सत्ता काँग्रेसकडे आली. त्यानंतर १३ वे सरपंच म्हणून सुरेश दादू तुळसकर (०२/०२/२०११ ते १०/०४/ २०११) दोन महिने, तर १४ वे सरपंच म्हणून प्रदिप चांदेलकर (११/४/२०११ ते २९/१२/२९१२) पावणे दोन वर्षापेक्षा अधिक काळ सरपंच पदाचा कार्यभार सांभाळला.