शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजप’ सरकारविरोधात काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: May 31, 2016 00:36 IST

मालवण येथे ‘अच्छे दिना’ची पुण्यतिथी : भाजपकडून दोन वर्षांत जनतेची फसवणूक

मालवण : भाजप सरकारने दोन वर्षांत जनतेची फसवणूक केली आहे. देशातील सामान्य नागरिक तसेच गरिबांना वेगवेगळ्या योजनांची आमिषे दाखवून भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. चिपी विमानतळ व सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत स्थानिकांमध्ये संभ्रमावस्था करण्याचे काम सरकार करत आहे. याचा निषेध म्हणून मालवण तालुका काँग्रेसतर्फे सोमवारी मालवण तहसील कार्यालयाबाहेर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपच्या दोन वर्षांच्या ‘अच्छे दिना’ची पुण्यतिथी साजरी करताना केंद्र व राज्यातील भाजप-युती सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान, देशात महागाई तसेच इतर जनतेच्या विविध प्रश्नांबाबत नायब तहसीलदार एस. पी. खडपकर यांना निवेदन निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात मनाई आदेश लागू असताना जमाव करून मोर्चा काढल्याप्रकरणी ३० ते ३५ काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, पंचायत समिती सभापती हिमाली अमरे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, बाळू कोळंबकर, शहर अध्यक्ष लीलाधर पराडकर, मोहन वराडकर, राजा गावडे, उमेश मांजरेकर, संजय लुडबे, सुधीर साळसकर, अनिल कांदळकर, उदय परब, बाबू कांदळकर, अनिल न्हिवेकर, राजू परुळेकर, जिल्हा परिषद सदस्य संजीवनी लुडबे, चित्रा दळवी, सीमा परुळेकर, भाग्यता वायंगणकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर यांच्यासह तालुक्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.केणी म्हणाले, भाजप-युती सरकारबाबत जनतेच्या मनात असंतोष आहे. गरीब जनतेला चांगल्या सुविधा देऊ अशी स्वप्नेच जनतेला दाखवली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप सरकारकडे कोणतेही ‘व्हिजन’ नाही. स्थानिक प्रशासन चुकीच्या पद्धतीने कारभार हाकत आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या दोन वर्षांच्या वर्षपूर्तीनिमित ‘अच्छे दिना’ची पुण्यतिथी करण्यात आली. (प्रतिनिधी)खोट्या आश्वासनांबाबत जागृती करणारजिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले, भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. केवळ अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून जनतेचा भ्रमनिरास केला आहे. शेतकरी, गरीब जनता निष्क्रिय लोकप्रतिनिधींना कंटाळली आहे. जिल्ह्याला लाभलेले पालकमंत्री चिपी विमानतळावर २०१७ ला विमान झेपावणार अशी खोटी आश्वासने देत आहेत. सरकारच्या या धोरणांबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्याची वेळ आली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना अपेक्षित विकासाचे धोरण आम्ही पूर्ण करून दाखवू. भविष्यात महागाई कमी न झाल्यास जनतेच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सामंत यांनी दिला.