शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

‘भाजप’ सरकारविरोधात काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: May 31, 2016 00:36 IST

मालवण येथे ‘अच्छे दिना’ची पुण्यतिथी : भाजपकडून दोन वर्षांत जनतेची फसवणूक

मालवण : भाजप सरकारने दोन वर्षांत जनतेची फसवणूक केली आहे. देशातील सामान्य नागरिक तसेच गरिबांना वेगवेगळ्या योजनांची आमिषे दाखवून भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. चिपी विमानतळ व सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत स्थानिकांमध्ये संभ्रमावस्था करण्याचे काम सरकार करत आहे. याचा निषेध म्हणून मालवण तालुका काँग्रेसतर्फे सोमवारी मालवण तहसील कार्यालयाबाहेर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपच्या दोन वर्षांच्या ‘अच्छे दिना’ची पुण्यतिथी साजरी करताना केंद्र व राज्यातील भाजप-युती सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान, देशात महागाई तसेच इतर जनतेच्या विविध प्रश्नांबाबत नायब तहसीलदार एस. पी. खडपकर यांना निवेदन निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात मनाई आदेश लागू असताना जमाव करून मोर्चा काढल्याप्रकरणी ३० ते ३५ काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, पंचायत समिती सभापती हिमाली अमरे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, बाळू कोळंबकर, शहर अध्यक्ष लीलाधर पराडकर, मोहन वराडकर, राजा गावडे, उमेश मांजरेकर, संजय लुडबे, सुधीर साळसकर, अनिल कांदळकर, उदय परब, बाबू कांदळकर, अनिल न्हिवेकर, राजू परुळेकर, जिल्हा परिषद सदस्य संजीवनी लुडबे, चित्रा दळवी, सीमा परुळेकर, भाग्यता वायंगणकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर यांच्यासह तालुक्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.केणी म्हणाले, भाजप-युती सरकारबाबत जनतेच्या मनात असंतोष आहे. गरीब जनतेला चांगल्या सुविधा देऊ अशी स्वप्नेच जनतेला दाखवली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप सरकारकडे कोणतेही ‘व्हिजन’ नाही. स्थानिक प्रशासन चुकीच्या पद्धतीने कारभार हाकत आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या दोन वर्षांच्या वर्षपूर्तीनिमित ‘अच्छे दिना’ची पुण्यतिथी करण्यात आली. (प्रतिनिधी)खोट्या आश्वासनांबाबत जागृती करणारजिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले, भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. केवळ अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून जनतेचा भ्रमनिरास केला आहे. शेतकरी, गरीब जनता निष्क्रिय लोकप्रतिनिधींना कंटाळली आहे. जिल्ह्याला लाभलेले पालकमंत्री चिपी विमानतळावर २०१७ ला विमान झेपावणार अशी खोटी आश्वासने देत आहेत. सरकारच्या या धोरणांबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्याची वेळ आली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना अपेक्षित विकासाचे धोरण आम्ही पूर्ण करून दाखवू. भविष्यात महागाई कमी न झाल्यास जनतेच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सामंत यांनी दिला.