शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

‘भाजप’ सरकारविरोधात काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: May 31, 2016 00:36 IST

मालवण येथे ‘अच्छे दिना’ची पुण्यतिथी : भाजपकडून दोन वर्षांत जनतेची फसवणूक

मालवण : भाजप सरकारने दोन वर्षांत जनतेची फसवणूक केली आहे. देशातील सामान्य नागरिक तसेच गरिबांना वेगवेगळ्या योजनांची आमिषे दाखवून भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. चिपी विमानतळ व सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत स्थानिकांमध्ये संभ्रमावस्था करण्याचे काम सरकार करत आहे. याचा निषेध म्हणून मालवण तालुका काँग्रेसतर्फे सोमवारी मालवण तहसील कार्यालयाबाहेर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपच्या दोन वर्षांच्या ‘अच्छे दिना’ची पुण्यतिथी साजरी करताना केंद्र व राज्यातील भाजप-युती सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान, देशात महागाई तसेच इतर जनतेच्या विविध प्रश्नांबाबत नायब तहसीलदार एस. पी. खडपकर यांना निवेदन निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात मनाई आदेश लागू असताना जमाव करून मोर्चा काढल्याप्रकरणी ३० ते ३५ काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, पंचायत समिती सभापती हिमाली अमरे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, बाळू कोळंबकर, शहर अध्यक्ष लीलाधर पराडकर, मोहन वराडकर, राजा गावडे, उमेश मांजरेकर, संजय लुडबे, सुधीर साळसकर, अनिल कांदळकर, उदय परब, बाबू कांदळकर, अनिल न्हिवेकर, राजू परुळेकर, जिल्हा परिषद सदस्य संजीवनी लुडबे, चित्रा दळवी, सीमा परुळेकर, भाग्यता वायंगणकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर यांच्यासह तालुक्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.केणी म्हणाले, भाजप-युती सरकारबाबत जनतेच्या मनात असंतोष आहे. गरीब जनतेला चांगल्या सुविधा देऊ अशी स्वप्नेच जनतेला दाखवली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप सरकारकडे कोणतेही ‘व्हिजन’ नाही. स्थानिक प्रशासन चुकीच्या पद्धतीने कारभार हाकत आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या दोन वर्षांच्या वर्षपूर्तीनिमित ‘अच्छे दिना’ची पुण्यतिथी करण्यात आली. (प्रतिनिधी)खोट्या आश्वासनांबाबत जागृती करणारजिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले, भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. केवळ अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून जनतेचा भ्रमनिरास केला आहे. शेतकरी, गरीब जनता निष्क्रिय लोकप्रतिनिधींना कंटाळली आहे. जिल्ह्याला लाभलेले पालकमंत्री चिपी विमानतळावर २०१७ ला विमान झेपावणार अशी खोटी आश्वासने देत आहेत. सरकारच्या या धोरणांबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्याची वेळ आली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना अपेक्षित विकासाचे धोरण आम्ही पूर्ण करून दाखवू. भविष्यात महागाई कमी न झाल्यास जनतेच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सामंत यांनी दिला.