शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

काँगे्रसने आंदोलन छेडले

By admin | Updated: January 20, 2015 00:08 IST

शासनविरोधी : विविध घोषणांनी जिल्हाधिकारी भवन दणाणले

सिंधुदुर्गनगरी : आम आदमी जिंदाबाद - नवीन युती सरकार मुर्दाबाद या व अशा अनेक शासनविरोधी घोषणा देत जिल्ह्यातील प्रलंबित भात खरेदी, हत्ती नुकसान, प्रलंबित शेतीपंप जोडणी आणि समस्यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी भवनासमोर धरणे आंदोलन छेडले. आंदोलनाला शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे.निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील खरेदी-विक्री संघाच्या गोदामात ३० हजार क्विंटल भात पडून आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी पिकविलेले भात शासनाने खरेदी केलेले नाही. सन २०१३-१४ मध्ये खरेदी केलेले ३० हजार क्विंटल भातही गोदामात पडून आहे. यावर्षी शासनाकडून नवीन भात खरेदीसाठी आदेश नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या विषयात काँग्रेसने लक्ष वेधले होते. शासनाकडून भात खरेदी न झाल्याने शेतकऱ्यांना खासगी दलालांकडे धाव घ्यावी लागत आहे व खासगी दलालांकडे मिळणाऱ्या दरात क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांची तफावत आहे. तरी शासनाने त्वरीत भात खरेदीचे आदेश द्यावेत व क्विंटलला २४०० रुपये दर मिळावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे.रानटी हत्तींकडून येथील शेतकऱ्यांच्या बागायतींचे नुकसान होत आहे. याबाबत शासनाने लक्ष घालावे व हत्तींना हटवावे. जिल्ह्यातील १५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी शेतीपंप कनेक्शनची मागणी केलेली आहे. त्यासाठी लागणारे डिपॉझिटही शेतकऱ्यांनी भरणा केलेले आहे. असे असूनही शेतीपंपाचे कनेक्शन अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या होत असलेल्या पीक नुकसानीला शासन जबाबदार आहे.ग्रामीण भागात २००९ नंतर ग्रामपंचायत हद्दीत बांधण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या घरांना अन्यायकारक दंड लागू करण्यात आला आहे. तो दंड त्वरीत रद्द करावा. अवकाळी पावसाने झालेल्या आंबा, काजू नुकसानीची भरपाई मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना शेती रक्षणार्थ शस्त्र परवाना मिळताना विशेषत: वारसांच्या नावे शस्त्र परवान्याची पुर्ननोंदणी होताना अनेक अडचणी येतात. त्यात सुलभता यावी अशा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्वरीत न्याय मिळावा या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन छेडले.या धरणे आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, सभापती अंकुश जाधव, गुरुनाथ पेडणेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, अस्मिता बांदेकर, स्नेहलता चोरगे, अशोक सावंत, संदीप मेस्त्री, बाळा गावडे, जिल्हा परिषद सदस्या कल्पिता मुंज आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनात आमदार नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, अस्मिता बांदेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांची भेट घेत काँग्रेस शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)आंदोलन सुरुच ठेवणार : नीतेश राणेशेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात काँग्रेसने आवाज उठवायला सुरुवात केली असून जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन हे सुरुच राहणार आहे. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी आंदोलनासाठी तयार रहा, असे आवाहनही यावेळी काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी केले.