शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
15
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
16
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
17
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
18
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
19
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
20
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?

वाढीव तुकड्यांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: July 5, 2015 01:17 IST

रवींद्र वायकर : अकरावीच्या तुकड्या न वाढविण्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप

रत्नागिरी : अकरावीच्या नवीन तुकड्या न वाढविण्याचा शासनाचा निर्णय चुकीचा आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला असल्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते जिल्हा दौऱ्यावर आले असताना शहरातील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये सायन्स, कॉमर्समधील प्रवेशाचा प्रश्न निर्माण होतो. इच्छेनुसार प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा येते. त्यासाठी जिल्ह्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावीच्या तुकड्या वाढवून मिळण्यासाठी शिक्षण विभागाकडे मागणी केली होती. मात्र, शासनाने अकरावीच्या नवीन तुकड्यांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या इच्छेनुसार शिक्षण मिळालेच पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे. त्यासाठी शासनाने नवीन तुकड्यांना मान्यता न देण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून, त्याला आपला कायम विरोध राहणार आहे. त्यासाठी नवीन तुकड्यांना परवानगी मिळावी म्हणून आपण मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. सध्या शिक्षक, चतुर्थश्रेणी व इतर कर्मचाऱ्यांच्या भरती होत नसल्याने त्याचा परिणाम शासकीय कामावर होत आहे. आपण ही नोकरी भरती करण्याच्या दृष्टीने पावले उचलली असल्याचे आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये यांची अवस्था फार बिकट आहे. त्यामध्ये डॉक्टर व इतर कर्मचारी वर्ग नाहीत. याबाबत आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करून ही भरती करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, जिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टर भरती होण्यास पुढे येत नसल्याने तेथे मेडिकल कॉलेजची निर्मिती करणे आवश्यक आहे. आज खेड्यांमध्ये डॉक्टर जायला मागत नाहीत. शहराकडे त्यांचा ओढा जास्त आहे. कारण डॉक्टरी हा धंदा झालाय, पूर्वी डॉक्टरी सेवा होती, असे सांगून त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘त्या’ रुग्णालयावर कारवाई पालकमंत्र्यांनी एका खासगी रुग्णालयामध्ये रुग्ण पाठविला होता. तो बरा झाल्यानंतर त्याला बिल अदा केल्याशिवाय सोडणार नाही, अशी भूमिका रुग्णालयाच्या व्यवस्थापकाने घेतली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी संपर्क साधला असता रुग्णालयाकडून ५० हजार रुपये बिल झाल्याचे सांगण्यात आले. काही वेळाने त्यामध्ये वाढ करून ते बिल ६७ हजार रुपये सांगण्यात आले. तेही आपण भरले असून, त्याची पावतीही त्या रुग्णालयाने अद्याप दिलेली नाही. त्यामुळे संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. राज ठाकरेंना टोला पालकमंत्र्यांनी जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना शिवसेना सुपाऱ्या घेत नाही, तर थेट अ‍ॅक्शन घेते, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. शिवसेना इतर प्रकल्पांकडून सुपाऱ्या घेऊन अणुऊर्जेला विरोध करत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. आपण जैतापूर प्रकल्पाला लवकरच भेट देणार असल्याचे सांगून शिवसेना नेहमीच जनतेच्या बाजूने उभी राहिली आहे आणि पुढेही राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.