शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

सहा उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली

By admin | Updated: November 16, 2014 23:47 IST

आंदोलन मागे : तिलारी प्रकल्पातील कंत्राटी कामगार रुग्णालयात दाखल

दोडामार्ग : तिलारी प्रकल्पाच्या कामावरून अचानक कमी करण्यात आल्याने पुनश्च सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या कंत्राटी कामगारांपैकी सुरेश फटी नाईक (वय ४७) यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर पाच जणांवर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, माजी आमदार प्रमोद जठार यांनी उपोषणकर्त्या कामगारांची भेट घेत त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी प्रयत्न करुन हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने कामगारांनी सायंकाळी आंदोलन मागे घेतले.गोवा आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी प्रकल्पावर सन १९८५ ते १९९२ पर्यंत हजेरीपटावर कंत्राटी कामगार कार्यरत होते. त्यांच्याकडून जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील माती चाचणी, वसाहत देखभाल दुरुस्ती व पाणी पुरवठा अशी कामे करून घेतली जात होती. परंतु १९९२ नंतर हजेरीपट ठेकेदारी पध्दतीवर ही कामे केली जाऊ लागली. याच दरम्यान कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी कंत्राटी कामगारांनी केली. परंतु त्याकडे प्रकल्प अधिकारी आणि प्रशासनाने कानाडोळा केला. तसेच दोन महिन्यांपूर्वी शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही, असे कारण सांगून काही सफाई कामगार व कर्मचाऱ्यांनार दोन महिन्यांपूर्वी कामावरून कमी करण्यात आले. तसेच उर्वरित कामगारांना ३० नोव्हेंबर २०१४ पासून कमी करण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्या. परिणामी शासनाच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात कंत्राटी कामगारांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. गेले तीन दिवस उपोषण सुरूच असून उपोषणकर्त्यांपैकी सहाजणांची प्रकृती खालावली आहे. त्यापैक्ी सुरेश फटी नाईक यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून नारायण फटी गवस, उदय नाईक, सुनील आत्माराम गवस, गणपत भिकाजी गवस व महादेव भिकाजी गवस यांच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दोडामार्गचे तहसीलदार संतोष जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. त्यानंतर माजी आमदार प्रमोद जठार यांनी उपोषणकर्त्या कामगारांची भेट घेतली. कामगारांच्या नोकरीचा प्रश्न हा भाजपचा झाला असून २१ नोव्हेंबरच्या मंत्रालयातील बैठकीत हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे सांगत जठार यांनी कामगारांना उपोषण मागे घेण्यास सांगितले. त्यांच्या आश्वासनानंतर कंत्राटी कामगारांनी उपोषण मागे घेतले. (प्रतिनिधी)