शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

डाटा आॅपरेटर्सची अवस्था दयनीय

By admin | Updated: April 27, 2015 00:13 IST

प्रश्न सुटेचना : प्रश्नांबाबत शासनही ढिम्मच

रत्नागिरी : मानधनाच्या प्रश्नाबरोबर अन्य मागण्यांसाठी राज्यभरातील डाटा एंट्री आॅपरेटर्सचे काम बंद आंदोलन सुरूच आहे. नोव्हेंबरपासून वारंवार आंदोलने, उपोषणे, चर्चा करण्यात येऊनसुध्दा अद्याप कोणताच निर्णय प्रशासनाकडून घेण्यात येत नसल्यामुळे डाटा एंट्री आॅपरेटर्सची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशीच झाली आहे.नोव्हेंबरपासून संगणक परिचालकांचे अद्याप मानधन काढण्यात आलेले नाही. केलेल्या कामाचा मोबदला देण्यास महाआॅनलाईन कंपनीने टाळाटाळ केल्याचे निदर्शनास येत आहे. मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सध्या मुख्यमंत्र्यांचे परदेश दौरे वाढल्यामुळे डाटा एंट्री आॅपरेटर्सचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाही.राज्यातील १७ हजार डाटा एंट्री आॅपरेटर्सनी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत मानधन व अन्य प्रश्नांसाठी आंदोलन पुकारले होते. शिवाय आझाद मैदानावर उपोषणही केले होते. त्यावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झाली नसल्याचे आॅपरेटर्सचे म्हणणे आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या डाटा एंट्री आॅपरेटर्सना निलंबित करण्यात आले होते. आंदोलन काळातील दोन महिन्यांचे काम पूर्ण केल्यानंतर मानधन अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे डाटा एंट्री आॅपरेटर्सनी अतिरिक्त तास काम करून १५ दिवसात काम पूर्ण करून दिले. मात्र, काम पूर्ण झाल्यावरही मानधन देण्यात आलेले नाही.जिल्ह्यात ८४७ ग्रामपंचायती असून ७५० डाटा एंट्री आॅपरेटर्स कार्यरत आहेत. आॅपरेटर्सना ग्रमापंचायतीकडून १३व्या वित्त आयोगातून ८८२४ रूपये मानधनासाठी दरमहा वितरीत करण्यात येतात. मात्र आॅपरेटर्सना प्रत्यक्षात ३८०० ते ४२०० रूपये इतकेच मानधन देण्यात येत होते. उर्वरित रक्कम प्रशिक्षण, स्टेशनरीसाठी वळते करून घेण्यात येतात. मात्र, प्रत्यक्षात दरमहा स्टेशनरीसाठी किती खर्च केला जातो, याबाबत साशंकता आहे. शिवाय ज्या गावामध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही तेथील डाटा एंट्री आॅपरेटर्सनाचा शेजारच्या गावात जाऊन किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन काम पूर्ण करावे लागते. त्यासाठी वैयक्तिक खर्च करावा लागतो.महागाईने रौद्ररूप धारण केलेले असताना डाटा एंट्री आॅपरेटर्सना मात्र अल्प मानधन अदा देण्यात येत आहे. शिवाय तेही वेळेवर देण्यात येत नाही. महाआॅनलाईनकडून सहा महिने डाटा एंट्री आॅपरेटर्सची पिळवणूक करण्यात येत आहे. वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात असताना शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधीकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. सध्या कामबंद आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. एकीकडे शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे गळेलठ्ठ मानधन तर दुसरीकडे मात्र अल्प मानधनावर राबवून कंत्राटी म्हणून करण्यात येणारी पिळवणूक यामुळे दरी निर्माण होत आहे. जिल्ह्यातील सातशे तर राज्यातील १७ हजार डाटा एंट्री आॅपरेटर्समधून शासनाच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)डाटा एंट्री आॅपरेटर्सचा प्रश्न प्रलंबित असताना याबाबत कंपनी व्यवस्थापनाने या कर्मचाऱ्यांना गांभिर्याने घेतले नसल्याचेच हे उदाहरण असून याबाबत शासन कधी निर्णय घेणार? असा सवाल आता केला जात आहे.