शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

संगणक साक्षरतेचे धडे झाले स्वीच आॅफ

By admin | Updated: April 18, 2015 00:01 IST

जिल्हा परिषद : प्राथमिक शाळांसाठीचे लाखो रुपये पाण्यात

रहिम दलाल - रत्नागिरी-आजकाल सर्वच व्यवहार संगणकद्वारे केले जात असताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये संगणक असूनही अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणकीय प्रशिक्षण दिले जात नसल्याने ते धूळखात पडले आहेत. जिल्ह्यातील ३४१ प्राथमिक शाळांमधील संगणक बंद अवस्थेत असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी अनुदान नसल्याने संगणक केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. संगणकीय युगामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी लाखो रुपये खर्चून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शासनातर्फे संगणक संच देण्यात आले. त्यासाठी लोकवर्गणी आणि सर्व शिक्षा अभियानातून खर्च करण्यात आला. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून संगणकाचे ज्ञान मिळाल्यास त्यांना भविष्यात फायदा होणार असल्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले. त्यासाठी शिक्षकवर्गालाही एमएससीआयटी कोर्स करण्याची सक्ती करण्यात आली. तरीही आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील सुमारे २० टक्के शिक्षकांनी एमएससीआयटी प्रशिक्षण घेतलेले नाही. संगणकीय युग असल्याने विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संगणकीय ज्ञान मिळावे, यासाठी शासनाने प्राथमिक शाळांमध्ये संगणकाचे धडे देण्यास सुरुवात केली. बँकांचे व्यवहार, शासकीय कामकाजामध्ये संगणकाचा वापर तसेच खासगी कंपन्यांमध्ये कामकाजही संगणकाद्वारे केले जात असल्याने आता संगणक वापराशिवाय पर्याय उरलेला नाही. म्हणून विद्यार्थ्यांनाही संगणकीय प्रशिक्षण देणे क्रमप्राप्त झाले आहे. ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७३३ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी १२७९ शाळांना संगणक संच शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामध्ये काही संगणक संच लोकवर्गणीतून, तर बहुतांश संगणक संच सर्व शिक्षा अभियानातून शाळांना देण्यात आले आहेत. सन २००३-२००४ ते सन २०१२-१३ या कालावधीमध्ये संगणकांचे वाटप करण्यात आले होते. या संगणकांपैकी बहुतांश संगणक संच कालबाह्य झाले आहेत. यामधील बंद असलेल्या संगणकांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून अनुदान मिळत नाही. त्यामुळे संगणकांच्या दुरुस्तीसाठी खर्च कोण करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बंद असलेल्या संगणक संचाची दुरुस्ती करण्यास कोणी प्रयत्न केल्यास त्यासाठी लागणारे पार्टही मिळत नाहीत. त्यामुळे संगणक असूनही ते केवळ शोभेच्या वस्तू बनल्या असून लाखो रुपये पाण्यात गेले आहेत तर संगणक शिक्षणाचा बोऱ्या वाजला आहे. जिल्हा परिषदेने संगणक प्रशिक्षणाचा केलेला प्रयत्न आता निष्फळ ठरला आहे.या संगणकांमध्ये ३४१ शाळांमधील संगणक संच बंद असून, त्यांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे. तालुकाचालू बंद एकूणचिपळूण१०९ ४५ १५४दापोली ९५ २५ १२०गुहागर१३० ४८ १७८खेड१३४ ४२ १७६लांजा ७१ १५ ९६मंडणगड ५० १३ ६३राजापूर१११ ६३ १७४रत्नागिरी१२२ ३९ १६१संगमेश्वर१०६ ५१ १५७एकूण-९३८ ३४१ १२७९ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत प्राथमिक शाळांचे मूल्यांकन केले जाते. त्यामध्ये इंटरनेट, ई-मेल, संगणकाद्वारे पत्रव्यवहार, ई-लायब्ररी असे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संगणकाद्वारे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये संगणक असूनही तेथे प्रशिक्षण दिले जात नाही. लाखो रुपयांचा खर्च करून सामान्य विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने ज्या घाईने घेतला, त्या तत्परतेने त्याच्या देखभाल खर्चाची तरतूद केली नाही.जिल्हा परिषदेच्या ३४१ शाळांमधील संगणक बंद.१४५४ शाळांमध्ये संगणक नाहीत.दुरुस्तीसाठी अनुदान मिळत नाही.२० टक्के शिक्षक एमएससीआयटी प्रशिक्षणाविना.संगणक असून विद्यार्थी प्रशिक्षणापासून दूर.२७३३ पैकी १२७९ शाळांमध्ये संगणक.