शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

‘आले तर सोबत, नाहीतर अकेला चलो’

By admin | Updated: October 18, 2015 23:30 IST

नारायण राणेंची भूमिका : वैभववाडी नगरपंचायत निवडणूक

वैभववाडी : एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्याचा विकास पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे मतदार वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतींची सत्ता काँग्रेसच्या हाती देतील, याची खात्री आहे. त्यामुळे आम्ही वैभववाडीत १४ जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त करीत आघाडीबाबत ‘आले तर सोबत, नाहीतर अकेला चलो’ची भूमिका स्पष्ट करताना आम्ही कोणावर ‘डिपेंड’ नाही, असे काँग्रस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे सांगितले.आमदार नीतेश राणे यांच्या येथील संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, आदी उपस्थित होते.नारायण राणे पुढे म्हणाले, अच्छे दिन येणार म्हणून सांगून शिवसेना, भाजपने सत्ता मिळवली. सत्तेवर येताच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवून जनतेला बुरे दिन दाखवायला सुरुवात केली आहे. पालकमंत्री असताना मी सुरू केलेले सर्व प्रकल्प वर्षभर बंद आहेत. रेडी बंदर विकासाला खो घातला आहे. विमानतळ, सी वर्ल्ड प्रकल्प बंद आहे. दोडामार्ग एमआयडीसीचे भूसंपादन आपण करून घेतले. वर्षभरात एकही पाऊल पुढे पडले नाही. हे पाहता दोन्ही ठिकाणचे मतदार काँग्रेसलाच सत्ता देतील, असा विश्वास व्यक्त केला.ते पुढे म्हणाले, विधानसभेत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना पालकमंत्री वाऱ्याने झाड हलते तसे हलताना दिसतात. अशा शब्दांत खिल्ली उडवत नगरपंचायतींना निधी कसा आणतात, हे वैभव नाईक यांना माहिती आहे का? असा सवाल करीत नगरविकास कायद्यानुसार निधी दिला जातो. त्याचा सत्ता असण्या-नसण्याशी काही संबंध नाही, असे स्पष्ट करीत आमदार म्हणून नीतेश राणे नगरविकास खात्याकडे पाठपुरावा करून वैभववाडीच्या विकासाचे प्रकल्प मंजूर करून घेतील, असा विश्वास नारायण राणे यांनी दिला. (प्रतिनिधी) त्यांना कोणी अडवले का?--शिवसेना आणि भाजपने दोन दिवस दहशतवादाच्या मुद्द्यावर रान उठवले आहे. याबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले, कुठे आहे दहशत तुम्हाला कुठे दिसते सांगा. प्रचारासाठी येणाऱ्या शिवसेना, भाजपवाल्यांना कोणी इकडे अडवले का? असा सवाल करीत नाकर्तेपणा झाकण्यासाठी दहशतीचे नाटक करून शिवसेना आणि भाजप जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला.