शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

‘आले तर सोबत, नाहीतर अकेला चलो’

By admin | Updated: October 18, 2015 23:30 IST

नारायण राणेंची भूमिका : वैभववाडी नगरपंचायत निवडणूक

वैभववाडी : एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्याचा विकास पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे मतदार वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतींची सत्ता काँग्रेसच्या हाती देतील, याची खात्री आहे. त्यामुळे आम्ही वैभववाडीत १४ जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त करीत आघाडीबाबत ‘आले तर सोबत, नाहीतर अकेला चलो’ची भूमिका स्पष्ट करताना आम्ही कोणावर ‘डिपेंड’ नाही, असे काँग्रस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे सांगितले.आमदार नीतेश राणे यांच्या येथील संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, आदी उपस्थित होते.नारायण राणे पुढे म्हणाले, अच्छे दिन येणार म्हणून सांगून शिवसेना, भाजपने सत्ता मिळवली. सत्तेवर येताच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवून जनतेला बुरे दिन दाखवायला सुरुवात केली आहे. पालकमंत्री असताना मी सुरू केलेले सर्व प्रकल्प वर्षभर बंद आहेत. रेडी बंदर विकासाला खो घातला आहे. विमानतळ, सी वर्ल्ड प्रकल्प बंद आहे. दोडामार्ग एमआयडीसीचे भूसंपादन आपण करून घेतले. वर्षभरात एकही पाऊल पुढे पडले नाही. हे पाहता दोन्ही ठिकाणचे मतदार काँग्रेसलाच सत्ता देतील, असा विश्वास व्यक्त केला.ते पुढे म्हणाले, विधानसभेत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना पालकमंत्री वाऱ्याने झाड हलते तसे हलताना दिसतात. अशा शब्दांत खिल्ली उडवत नगरपंचायतींना निधी कसा आणतात, हे वैभव नाईक यांना माहिती आहे का? असा सवाल करीत नगरविकास कायद्यानुसार निधी दिला जातो. त्याचा सत्ता असण्या-नसण्याशी काही संबंध नाही, असे स्पष्ट करीत आमदार म्हणून नीतेश राणे नगरविकास खात्याकडे पाठपुरावा करून वैभववाडीच्या विकासाचे प्रकल्प मंजूर करून घेतील, असा विश्वास नारायण राणे यांनी दिला. (प्रतिनिधी) त्यांना कोणी अडवले का?--शिवसेना आणि भाजपने दोन दिवस दहशतवादाच्या मुद्द्यावर रान उठवले आहे. याबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले, कुठे आहे दहशत तुम्हाला कुठे दिसते सांगा. प्रचारासाठी येणाऱ्या शिवसेना, भाजपवाल्यांना कोणी इकडे अडवले का? असा सवाल करीत नाकर्तेपणा झाकण्यासाठी दहशतीचे नाटक करून शिवसेना आणि भाजप जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला.