शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : एक हजार कोटीचा आराखडा सादर

By admin | Updated: February 9, 2015 23:59 IST

विशेष निधी द्यावा

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी १ हजार कोटी खर्चाचा विकास आराखडा जिल्हा प्रशासनाने केंद्र सरकारकडे पाठविला आहे. पर्यटन जिल्हा घोषित झाल्यानंतर या जिल्ह्यात पर्यटकांसाठी सुविधा दिल्यास त्यातून फार मोठे उत्पन्नही सरकारला मिळणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आगामी पाच वर्षात हा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केंद्रसरकारकडे केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी सोमवारी दिली.सिंधु महोत्सवाच्या आयोजनानंतर जिल्हा प्रशासनाने या जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. राज्य शासनाने १९९७ साली हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर पर्यटन विकासाला चालना मिळाली. तसेच राज्य सरकारच्या निधीतून अनेक कामे जिल्ह्यात सुरु झाली. आता या जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला अधिक चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारनेही या जिल्ह्याला मदत करावी यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. यासाठी येत्या पाच वर्षात जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या सोयी व सुविधांसाठी एक हजार कोटी रुपये मिळावेत असा एक आराखडा राज्याच्या मुख्यमंत्री व वित्त विभागाच्या शिफारशीने केंद्र सरकारकडे नुकताच सादर करण्यात आला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे, सागर किनारपट्ट्या, आंबोली येथील हिल स्टेशन, गड किल्ल्यांची ठिकाणे, धबधबे व तेथील पर्यटनस्थळे विकसीत करून तेथील पर्यटन सुविधांबरोबरच आवश्यक रस्ते व अन्य नागरी सुविधा येणाऱ्या पर्यटकांसाठी निर्माण करून देण्यासाठी या एक हजार कोटींचा खर्च केल्यास सरकारलाही दरवर्षी मोठे उत्पन्न मिळेल अशा स्वरूपाचा हा आराखडा असल्याचे जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी सांगितले.सिंधुदुर्ग आणि गोवा हद्दीवरील बांदा येथे पर्यटक सुविधा केंद्र आणि सुशोभित प्रवेशद्वार यावर्षीच्या अर्थसंकल्पातून मंजूर होईल. त्यामुळे या वर्षात हे काम मार्गी लागेल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले तर कोळंबी बीज निर्मितीची हॅचरीही यावर्षी मंजूर होईल व त्यासाठी जवळपास २० कोटीतून ही दोन्ही कामे सुरु होतील असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)विशेष निधी द्यावायावर्षी ७० कोटींच्या आराखड्यावरून ती १२५ कोटी रुपयांपर्यंतच्या आराखड्यास मंजुरी देण्यास पालकमंत्र्यांना यश आले आहे. सिंधु महोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात आल्याने त्यांच्यासमोरही जिल्हा प्रशासन व पालकमंत्री यांनी पर्यटन विकासाच्या दृष्टीने विविध मुद्दे ठेवले व त्यातूनच सिंधुदुर्गला राज्य व केंद्र सरकारने पर्यटन विकासाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यास विशेष निधी देण्याबाबत विचार सुरु झाला व त्यातूनच हा एक हजार कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे सादर झाला आहे.