शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

जागतिक नारळ दिन : नारळ लागवडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 16:11 IST

कल्पवृक्ष असलेल्या नारळ लागवडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक वाव आहे. जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी केरळप्रमाणे नारळ लागवड केली पाहिजे. त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढीस नारळ लागवड तारणहार ठरणार आहे, असे प्रतिपादन एम. के. गावडे यांनी केले.

ठळक मुद्देएम. के. गावडे यांनी केले आवाहन महिला काथ्या कामगार संस्थेत कामगार दिन साजरा

वेंगुर्ला : कल्पवृक्ष असलेल्या नारळ लागवडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक वाव आहे. जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी केरळप्रमाणे नारळ लागवड केली पाहिजे. त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढीस नारळ लागवड तारणहार ठरणार आहे, असे प्रतिपादन एम. के. गावडे यांनी केले.वेंगुर्ला येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेत दरवर्षीप्रमाणे जागतिक नारळ दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सल्लागार एम. के. गावडे यांनी मार्गदर्शन केले. या जागतिक नारळ दिन कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष के. जी. गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी संस्थेच्या सचिव प्रज्ञा परब, नारळ मित्र नारायण भिकाजी उर्फ रमण खानोलकर, सुजाता देसाई, स्वप्नील परब, नीतेश मयेकर, नंदगडकर, प्रदीप सावंत आदी उपस्थित हाते.संस्थेतर्फे दरवर्षी २ सप्टेंबरला नारळ दिन साजरा केला जातो. यावेळी निवडक शेतकरी व नारळ मित्र यांचा सत्कार करण्यात येतो. कोकणच्या आर्थिक उन्नतीसाठी व्यावसायिक दृष्टीने नारळ लागवड व्हावी यासाठी शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी हा यामागील उद्देश असल्याचे संस्थेच्या सचिव प्रज्ञा परब यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसेच एम. के. गावडे यांच्या मातोश्री सत्यवती गावडे यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रज्ञा परब यांनी केले.काजूप्रमाणे नारळ लागवड करा : गावडेनारळ हा कल्पवृक्ष आहे. एक नारळाचे झाड एका माणसाला संपूर्ण वर्षभर पोसू शकते. नारळाचा कोणताच भाग वाया जात नाही. झावळ, सोडणे, खोड, करवंटी सर्वच भाग हे पैसा मिळवून देणारे आहेत. तरीही आपल्याकडे नारळ लागवडीकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. आंबा, काजू लागवडीप्रमाणेच येथे नारळ लागवड मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन के. जी. गावडे यांनी केले. संस्था दरवर्षी जागतिक नारळ दिनाच्या निमित्ताने नारळ उत्पादक शेतकरी व नारळ मित्र यांना नारळ लागवडीसाठी प्रेरणा मिळावी, यासाठी करीत असलेले प्रयत्न कौतुस्कास्पद असल्याचे ते म्हणाले.रमण खानोलकर, स्वप्नील परब यांचा सत्कारयावेळी प्रातिनिधीक स्वरुपात नारळ उत्पादक शेतकरी तसेच नारळ मित्र रमण खानोलकर, स्वप्नील परब यांचा शाल, श्रीफळ व नारळाचे झाड देऊन सत्कार करण्यात आला.सिंधुफोटो ०१जागतिक नारळ दिन कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष के. जी. गावडे यांनी केले. यावेळी एम. के. गावडेही उपस्थित होते. (छाया : सावळाराम भराडकर)

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग