शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक नारळ दिन : नारळ लागवडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 16:11 IST

कल्पवृक्ष असलेल्या नारळ लागवडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक वाव आहे. जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी केरळप्रमाणे नारळ लागवड केली पाहिजे. त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढीस नारळ लागवड तारणहार ठरणार आहे, असे प्रतिपादन एम. के. गावडे यांनी केले.

ठळक मुद्देएम. के. गावडे यांनी केले आवाहन महिला काथ्या कामगार संस्थेत कामगार दिन साजरा

वेंगुर्ला : कल्पवृक्ष असलेल्या नारळ लागवडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक वाव आहे. जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी केरळप्रमाणे नारळ लागवड केली पाहिजे. त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढीस नारळ लागवड तारणहार ठरणार आहे, असे प्रतिपादन एम. के. गावडे यांनी केले.वेंगुर्ला येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेत दरवर्षीप्रमाणे जागतिक नारळ दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सल्लागार एम. के. गावडे यांनी मार्गदर्शन केले. या जागतिक नारळ दिन कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष के. जी. गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी संस्थेच्या सचिव प्रज्ञा परब, नारळ मित्र नारायण भिकाजी उर्फ रमण खानोलकर, सुजाता देसाई, स्वप्नील परब, नीतेश मयेकर, नंदगडकर, प्रदीप सावंत आदी उपस्थित हाते.संस्थेतर्फे दरवर्षी २ सप्टेंबरला नारळ दिन साजरा केला जातो. यावेळी निवडक शेतकरी व नारळ मित्र यांचा सत्कार करण्यात येतो. कोकणच्या आर्थिक उन्नतीसाठी व्यावसायिक दृष्टीने नारळ लागवड व्हावी यासाठी शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी हा यामागील उद्देश असल्याचे संस्थेच्या सचिव प्रज्ञा परब यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसेच एम. के. गावडे यांच्या मातोश्री सत्यवती गावडे यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रज्ञा परब यांनी केले.काजूप्रमाणे नारळ लागवड करा : गावडेनारळ हा कल्पवृक्ष आहे. एक नारळाचे झाड एका माणसाला संपूर्ण वर्षभर पोसू शकते. नारळाचा कोणताच भाग वाया जात नाही. झावळ, सोडणे, खोड, करवंटी सर्वच भाग हे पैसा मिळवून देणारे आहेत. तरीही आपल्याकडे नारळ लागवडीकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. आंबा, काजू लागवडीप्रमाणेच येथे नारळ लागवड मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन के. जी. गावडे यांनी केले. संस्था दरवर्षी जागतिक नारळ दिनाच्या निमित्ताने नारळ उत्पादक शेतकरी व नारळ मित्र यांना नारळ लागवडीसाठी प्रेरणा मिळावी, यासाठी करीत असलेले प्रयत्न कौतुस्कास्पद असल्याचे ते म्हणाले.रमण खानोलकर, स्वप्नील परब यांचा सत्कारयावेळी प्रातिनिधीक स्वरुपात नारळ उत्पादक शेतकरी तसेच नारळ मित्र रमण खानोलकर, स्वप्नील परब यांचा शाल, श्रीफळ व नारळाचे झाड देऊन सत्कार करण्यात आला.सिंधुफोटो ०१जागतिक नारळ दिन कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष के. जी. गावडे यांनी केले. यावेळी एम. के. गावडेही उपस्थित होते. (छाया : सावळाराम भराडकर)

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग