शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

गौण खनिज उत्खनन बंद करुन अहवाल सादर करा

By admin | Updated: February 26, 2015 00:08 IST

दोडामार्गमधील समस्या : प्रांताधिकाऱ्यांचे दोडामार्ग तहसीलदारांना आदेश

कसई दोडामार्ग : तालुक्यातील बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन राजरोस सुरू असल्याबाबत शिवसेनेने आवाज उठविल्यानंतर प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी कठोर भूमिका घेत गौण खनिज उत्खनन त्वरित बंद करा व दोन दिवसात अहवाल कार्यालयात सादर करा, असे आदेश तहसीलदार संतोष जाधव यांना बुधवारी दिले. यावेळी तहसीलदार जाधव यांनी गौण खनिज उत्खनन बंद असल्याचा खुलासा केला. मात्र, संजय देसाई यांनी पुरावा देऊन गौण खनिज सुरू आहे, असे पटवून दिले. यावेळी तहसीलदार जाधव यांनी नरमाईची भूमिका घेत खाण मालकावर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन प्रांतअधिकाऱ्यांनी दिले. तालुक्यात गौण खनिज उत्खननाला न्यायालयीन बंदी आहे. असे असताना महसूल विभागाच्या आशीर्वादाने हे गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. स्थानिक खाणमालकाला वेगळे नियम व गोवा राज्यातील खाणमालकाला वेगळे नियम लावले जातात. या विरोधात शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय देसाई, संघटक संजय गवस यांनी आई व माटणे भागातील खाणींना भेटी दिल्या. यावेळी खाण सुरू होती. तलाठी अजित कदम यांना याबाबत माहिती देऊन खाणी बेकायदेशीर सुरू असून त्यांचे पंचनामे करून कारवाई करा, असे सांगितले. त्यानुसार कदम यांनी कारवाई केली. मात्र, खाणी बंद न झाल्याने बुधवारी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय देसाई, संघटक संजय गवस, युवक तालुकाध्यक्ष भिवा गवस, विभागप्रमुख लक्ष्मण आयनोडकर, विजय कदम, गिरीश डिचोलकर, प्रदीप नाईक आदी उपस्थित होते. तालुक्यात बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन सुरू आहे, हे प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत प्रांताधिकारी इनामदार यांनी सांगितले की, गौण खनिजाला न्यायालयीन बंदी असल्याने तालुक्यात गौण खनिज व्यवसाय बंद आहे, असे सांगितले. मात्र, संजय देसाई व संजय गवस यांनी खाण व्यवसाय कागदावर बंद आहे, परंतु प्रत्यक्षात सुरू आहे. तहसीलदार व तलाठी यांच्या आदेशाला खाण मालक घाबरत नाही, आमचे काय ते करून घ्या, अशा शब्दात खाण मालक मिरवत आहे. स्थानिकांच्या खाण व्यवसायाला आमचा विरोध नाही. मात्र, गोव्यातील खाणमालकांना आमचा विरोध आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. गौण खनिज व गौण उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी संतोष जाधव यांना धारेवर धरले. खाण व्यवसाय सुरू असताना कारवाई का केली नाही, अहवाल का पाठवला नाही, असे प्रश्न केले. यावेळी तहसीलदार जाधव यांनी सांगितले की, खाण मालकांना दंडात्मक कारवाई केली आहे. खाणी बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या. मात्र, आमचे ऐकत नाहीत, असे जाधव यांनी सांगितले. यावेळी प्रांताधिकारी यांनी, खाण मालकाची साधनसामग्री जप्त करा, त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार करा आणि दोन दिवसात खाणी बंद करा, असे आदेश दिले. (वार्ताहर)